शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

पोलीस मदत केंद्र नावापुरतेच!

By admin | Updated: May 17, 2016 02:44 IST

पोलिसांच्या संगनमताने परिसरात राजरोसपणे अनेक अवैध धंदे सुरू असल्याचे आणि गावातील पोलीस मदत केंद्र नावापुरतेच उरल्याचा आरोप होत आहे.

कामशेत : कान्हे गावात व आजूबाजूच्या परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असून, पोलिसांच्या संगनमताने परिसरात राजरोसपणे अनेक अवैध धंदे सुरू असल्याचे आणि गावातील पोलीस मदत केंद्र नावापुरतेच उरल्याचा आरोप होत आहे.कान्हे व परिसराचा गेल्या काही वर्षांत झपाट्याने विस्तार झाला असून, तेवढ्याच प्रमाणात अवैध धंदे फोफावल्याचे दिसत आहे. गावात भरवस्तीत चार ते पाच ठिकाणी विनापरवाना,अवैध दारूविक्री सुरू असून, याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. गांजाविक्री, जुगार चालवणाऱ्यांचे अड्डे, मटका बिनधास्तपणे सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. स्थानिक नागरिक विशेषत: महिला व विद्यार्थी यांना त्याचा त्रास होत आहे.बंदी असलेल्या गुटखा, सुगंधित तंबाखू, पान मसाला आदींची खुलेआम विक्री होत आहे. पोलीस आणि अन्न व प्रशासन विभागांच्या कारवाई न करण्याच्या भूमिकेमुळे गुटखाबंदीचा फज्जा उडाला असल्याचे दिसत आहे. कान्हे व परिसरात एका वर्षात पाच ते सहा खून, मारामाऱ्या व इतर अनेक गंभीर घटना घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांची सुरक्षितता तसेच कायदा व्यवस्था अबाधित राखण्यासाठी एक वर्षांपूर्वी गावात पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली. पण, नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यापेक्षा अवैध धंद्यांना अभय देऊन स्वत:चे खिसे भरण्याचे काम संबंधितांकडून सुरू असल्याचा आरोप होत आहे. मदत केंद्रात आलेल्या तक्रारदारांना वाईट वागणूक दिली जात असून, तक्रारीची नोंद केली जात नाही. नोंदवही नसल्याचे कारण सांगून तक्रारदाराला परस्पर वडगाव पोलीस ठाण्यात पिटाळले जाते. हे मदत केंद्र नावापुरतेच उरले आहे, असे नागरिक सांगतात.महामार्गावर अनेक हॉटेल व ढाबे आहेत, जे रात्री दोन दोन वाजेपर्यंत चालू असतात. येथे बिनबोभाट दारू व नशेच्या पदार्थांची विक्री होते. ‘ड्राय डे’लाही येथे हमखास दारू उपलब्ध होते. अनेक ढाब्यांवर अवैध व्यवसाय चालत असून, पेट्रोल टॅँकरमधून पेट्रोल चोरी, डांबर, आॅइल, तेल आदींचा धंदा तेजीत असल्याचे काही नागरिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. अवैध धंद्यांविषयी कोणी काही बोललेच, तर त्याला विविध मार्गांनी गप्प केले जाते. पोलीस मदत केंद्र नागरिकांसाठी कधी सक्षमपणे कार्यरत होणार? अवैध धंद्यांना आळा कधी बसणार? अशी नागरिकांकडून विचारणा होत आहे. (वार्ताहर)