शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

पोलीस मदत केंद्र नावापुरतेच!

By admin | Updated: May 17, 2016 02:44 IST

पोलिसांच्या संगनमताने परिसरात राजरोसपणे अनेक अवैध धंदे सुरू असल्याचे आणि गावातील पोलीस मदत केंद्र नावापुरतेच उरल्याचा आरोप होत आहे.

कामशेत : कान्हे गावात व आजूबाजूच्या परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असून, पोलिसांच्या संगनमताने परिसरात राजरोसपणे अनेक अवैध धंदे सुरू असल्याचे आणि गावातील पोलीस मदत केंद्र नावापुरतेच उरल्याचा आरोप होत आहे.कान्हे व परिसराचा गेल्या काही वर्षांत झपाट्याने विस्तार झाला असून, तेवढ्याच प्रमाणात अवैध धंदे फोफावल्याचे दिसत आहे. गावात भरवस्तीत चार ते पाच ठिकाणी विनापरवाना,अवैध दारूविक्री सुरू असून, याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. गांजाविक्री, जुगार चालवणाऱ्यांचे अड्डे, मटका बिनधास्तपणे सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. स्थानिक नागरिक विशेषत: महिला व विद्यार्थी यांना त्याचा त्रास होत आहे.बंदी असलेल्या गुटखा, सुगंधित तंबाखू, पान मसाला आदींची खुलेआम विक्री होत आहे. पोलीस आणि अन्न व प्रशासन विभागांच्या कारवाई न करण्याच्या भूमिकेमुळे गुटखाबंदीचा फज्जा उडाला असल्याचे दिसत आहे. कान्हे व परिसरात एका वर्षात पाच ते सहा खून, मारामाऱ्या व इतर अनेक गंभीर घटना घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांची सुरक्षितता तसेच कायदा व्यवस्था अबाधित राखण्यासाठी एक वर्षांपूर्वी गावात पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली. पण, नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यापेक्षा अवैध धंद्यांना अभय देऊन स्वत:चे खिसे भरण्याचे काम संबंधितांकडून सुरू असल्याचा आरोप होत आहे. मदत केंद्रात आलेल्या तक्रारदारांना वाईट वागणूक दिली जात असून, तक्रारीची नोंद केली जात नाही. नोंदवही नसल्याचे कारण सांगून तक्रारदाराला परस्पर वडगाव पोलीस ठाण्यात पिटाळले जाते. हे मदत केंद्र नावापुरतेच उरले आहे, असे नागरिक सांगतात.महामार्गावर अनेक हॉटेल व ढाबे आहेत, जे रात्री दोन दोन वाजेपर्यंत चालू असतात. येथे बिनबोभाट दारू व नशेच्या पदार्थांची विक्री होते. ‘ड्राय डे’लाही येथे हमखास दारू उपलब्ध होते. अनेक ढाब्यांवर अवैध व्यवसाय चालत असून, पेट्रोल टॅँकरमधून पेट्रोल चोरी, डांबर, आॅइल, तेल आदींचा धंदा तेजीत असल्याचे काही नागरिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. अवैध धंद्यांविषयी कोणी काही बोललेच, तर त्याला विविध मार्गांनी गप्प केले जाते. पोलीस मदत केंद्र नागरिकांसाठी कधी सक्षमपणे कार्यरत होणार? अवैध धंद्यांना आळा कधी बसणार? अशी नागरिकांकडून विचारणा होत आहे. (वार्ताहर)