शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

पानसरेंवरील हल्ल्यात पोलिसांचा दोष नाही - देवेंद्र फडणवीस

By admin | Updated: February 21, 2015 13:30 IST

गोविंद पानसरेंवरील हल्ला ही दुर्दैवी घटना असून या हल्ल्यासाठी पोलिसांना दोष देऊन चालणार नाही असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पोलिसांची पाठराखण केली आहे.

ऑनलाइन लोकमत 
नाशिक, दि. २१ - गोविंद पानसरेंवरील हल्ला ही दुर्दैवी घटना असून या हल्ल्यासाठी पोलिसांना दोष देऊन चालणार नाही असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पोलिसांची पाठराखण केली आहे. पानसरेंवरील हल्ल्याने व्यवस्थेला आव्हान दिले असून हे आव्हान मोडून काढण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. 
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर पाच दिवसांपूर्वी कोल्हापूर येथे दिवसाढवळ्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करुन पळ काढला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गोविंद पानसरे यांना शुक्रवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र शुक्रवारी रात्री उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नरेंद्र दाभोलकर यांचे मारकेरी शोधण्यात महाराष्ट्र पोलिस अपयशी ठरत असतानाच पानसरे यांच्यासारख्या विचारवंताची हत्या झाली. यामुळे राज्यभरात संताप व्यक्त होत असतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिसांची पाठराखण केल्याचे दिसते. 
नाशिकमधील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस यांनी पानसरे यांच्यावरील हल्ल्यासाठी पोलिस जबाबदार नाही असे सांगितले. हा हल्ला व्यक्ती किंवा विचारांवरील हल्ला नसून हा हल्ला म्हणजे व्यवस्थेला दिलेले आव्हान आहे असे फडणवीस यांनी नमूद केले. पोलिसांनी ताकद लावल्यास लवकरच मारेकरी सापडतील असेही त्यांनी स्पष्ट केले.