शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
2
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
3
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
4
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
5
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
6
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
7
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
8
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
9
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
10
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
11
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
12
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
13
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
15
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
16
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
17
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
18
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
19
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
20
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले

आमदार कन्येवर हल्ला करणा-याला 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

By admin | Updated: April 4, 2017 17:22 IST

वाकडच्या ताथवडे येथील बालाजी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या 22 वर्षीय विद्यार्थिनीवर हल्ला करणाऱ्या आरोपीला 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

ऑनलाइन लोकमत
पिंपरी-चिंचवड, दि. 4 - वाकडच्या ताथवडे येथील बालाजी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या 22 वर्षीय विद्यार्थिनीवर हल्ला करणाऱ्या आरोपीला 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एकतर्फी प्रेमातून आमदार कन्येवर सत्तुराने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना काल (दि.3) वाकडमध्ये घडली होती. या घटनेतील आरोपीला कॉलेजमधील सुरक्षारक्षक आणि मुलांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. आज त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याला 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
राजेश परवेशकुमार बक्षी (वय 25. रा. वाकड, मूळ, हरियाणा), असे आरोपीचे नाव आहे. त्याने यवतमाळ वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार  यांची मुलगी अश्विनी हिच्यावर सत्तूरने वार केला होता. राजेश आणि पीडित मुलगी एका कॉलेजमध्ये शिकतात. तु माझ्याशी का बोलत नाहीस या शुल्लक कारणावरून त्याने काल तिच्यावर हल्ला केला होता. यामध्ये मुलीच्या डाव्या हाताची करंळी निकामी झाली आहे तर तीन दात आणि ओठांना गंभीर स्वरुपाची दुखापत झाली आहे. तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून काल तिच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
 
बालाजी कॉलेजकडून खुलासा मागविणार-
वाकड येथील बालाजी इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने संबंधित विद्यार्थ्याची कॉलेजकडे तक्रार करूनही त्या विद्यार्थ्यावर कारवाई का केली गेली नाही, याचा खुलासा कॉलेजकडून मागविला जाणार आहे. त्यानंतर त्या कॉलेजविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल, असे कुलगुरू वासुदेव गाडे यांनी सोमवारी स्पष्ट केले.
 संबंधित विद्यार्थिनीने त्या विद्यार्थ्याची कॉलेजकडे तक्रार केली असल्याची माहिती उजेडात येत आहे. या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून त्या कॉलेजकडे खुलासा मागविण्यात येणार आहे. विद्यार्थिनीवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा गाडे यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केला. महाविद्यालयांच्या स्थानिक व्यवस्थापन समितीवर विद्यार्थ्यांना प्रतिनिधित्व देण्यात यावे, याच्या सूचना महाविद्यालयांना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयांमध्ये काऊन्सेलिंग सेल उभारणे आवश्यक असेल, तिथे विद्यार्थ्यांना त्यांच्या तक्रारी नोंदविता येतील, अशी माहिती वासुदेव गाडे यांनी दिली.