शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: आंदोलकांकडे कोणतीही परवानगी नाही, दुपारी ३ पर्यंत जागा रिकामी करा: मुंबई हायकोर्ट
2
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
3
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
4
बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण
5
"लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले?
6
पीटर नवारोंनी पुन्हा गरळ ओकली, मोदी-पुतिन-जिनपिंग यांच्या भेटीवर केले मोठे विधान
7
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
8
बलात्काराचा आरोप असलेला AAP आमदार गोळीबार करत पोलिसांच्या तावडीतून पळाला...
9
काय आहे शी जिनपिंग यांचा 'GGI फॉर्म्युला'?, अमेरिकेला थेट आव्हान; रशिया-भारताचा तात्काळ होकार
10
बनावट पासपोर्ट वापरल्यास कठोर शिक्षा; नवीन स्थलांतर व परदेशी नागरिक कायदा लागू
11
"भारतानं रोखलं आमचं SCO सदस्यत्व!"; मुस्लीम देश भडकला; म्हणाला, 'पाकिस्तान...'
12
Ganesh Festival 2025: 'घालीन लोटांगण' सुरू होताच स्वत:भोवती प्रदक्षिणा घालता का? थांबा, तुम्ही चुकताय
13
Lalbaugcha Raja: लालबागचा राजा मंडळाला मानवी हक्क आयोगाची नोटीस; ‘व्हीआयपी’ दर्शनाबाबत तक्रार!
14
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
15
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
16
४ शुभ योगात परिवर्तिनी एकादशी: तुळशीचा १ उपाय करा, पूर्ण पुण्य मिळवा; श्रीविष्णू कृपा करतील
17
MI च्या ताफ्यातून स्टार झालेल्या पोलार्डची शाहरुखच्या संघाकडून 'हिरोगिरी'! ८ चेंडूत ७ गगनचुंबी षटकार (VIDEO)
18
शिक्षकांना नोकरीत टिकून राहण्यासाठी टीईटी देणे अनिवार्य, राज्यांच्या याचिकांवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल
19
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
20
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?

आमदार कन्येवर हल्ला करणा-याला 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

By admin | Updated: April 4, 2017 17:22 IST

वाकडच्या ताथवडे येथील बालाजी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या 22 वर्षीय विद्यार्थिनीवर हल्ला करणाऱ्या आरोपीला 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

ऑनलाइन लोकमत
पिंपरी-चिंचवड, दि. 4 - वाकडच्या ताथवडे येथील बालाजी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या 22 वर्षीय विद्यार्थिनीवर हल्ला करणाऱ्या आरोपीला 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एकतर्फी प्रेमातून आमदार कन्येवर सत्तुराने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना काल (दि.3) वाकडमध्ये घडली होती. या घटनेतील आरोपीला कॉलेजमधील सुरक्षारक्षक आणि मुलांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. आज त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याला 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
राजेश परवेशकुमार बक्षी (वय 25. रा. वाकड, मूळ, हरियाणा), असे आरोपीचे नाव आहे. त्याने यवतमाळ वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार  यांची मुलगी अश्विनी हिच्यावर सत्तूरने वार केला होता. राजेश आणि पीडित मुलगी एका कॉलेजमध्ये शिकतात. तु माझ्याशी का बोलत नाहीस या शुल्लक कारणावरून त्याने काल तिच्यावर हल्ला केला होता. यामध्ये मुलीच्या डाव्या हाताची करंळी निकामी झाली आहे तर तीन दात आणि ओठांना गंभीर स्वरुपाची दुखापत झाली आहे. तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून काल तिच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
 
बालाजी कॉलेजकडून खुलासा मागविणार-
वाकड येथील बालाजी इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने संबंधित विद्यार्थ्याची कॉलेजकडे तक्रार करूनही त्या विद्यार्थ्यावर कारवाई का केली गेली नाही, याचा खुलासा कॉलेजकडून मागविला जाणार आहे. त्यानंतर त्या कॉलेजविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल, असे कुलगुरू वासुदेव गाडे यांनी सोमवारी स्पष्ट केले.
 संबंधित विद्यार्थिनीने त्या विद्यार्थ्याची कॉलेजकडे तक्रार केली असल्याची माहिती उजेडात येत आहे. या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून त्या कॉलेजकडे खुलासा मागविण्यात येणार आहे. विद्यार्थिनीवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा गाडे यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केला. महाविद्यालयांच्या स्थानिक व्यवस्थापन समितीवर विद्यार्थ्यांना प्रतिनिधित्व देण्यात यावे, याच्या सूचना महाविद्यालयांना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयांमध्ये काऊन्सेलिंग सेल उभारणे आवश्यक असेल, तिथे विद्यार्थ्यांना त्यांच्या तक्रारी नोंदविता येतील, अशी माहिती वासुदेव गाडे यांनी दिली.