शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

आमदार कन्येवर हल्ला करणा-याला 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

By admin | Updated: April 4, 2017 17:22 IST

वाकडच्या ताथवडे येथील बालाजी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या 22 वर्षीय विद्यार्थिनीवर हल्ला करणाऱ्या आरोपीला 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

ऑनलाइन लोकमत
पिंपरी-चिंचवड, दि. 4 - वाकडच्या ताथवडे येथील बालाजी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या 22 वर्षीय विद्यार्थिनीवर हल्ला करणाऱ्या आरोपीला 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एकतर्फी प्रेमातून आमदार कन्येवर सत्तुराने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना काल (दि.3) वाकडमध्ये घडली होती. या घटनेतील आरोपीला कॉलेजमधील सुरक्षारक्षक आणि मुलांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. आज त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याला 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
राजेश परवेशकुमार बक्षी (वय 25. रा. वाकड, मूळ, हरियाणा), असे आरोपीचे नाव आहे. त्याने यवतमाळ वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार  यांची मुलगी अश्विनी हिच्यावर सत्तूरने वार केला होता. राजेश आणि पीडित मुलगी एका कॉलेजमध्ये शिकतात. तु माझ्याशी का बोलत नाहीस या शुल्लक कारणावरून त्याने काल तिच्यावर हल्ला केला होता. यामध्ये मुलीच्या डाव्या हाताची करंळी निकामी झाली आहे तर तीन दात आणि ओठांना गंभीर स्वरुपाची दुखापत झाली आहे. तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून काल तिच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
 
बालाजी कॉलेजकडून खुलासा मागविणार-
वाकड येथील बालाजी इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने संबंधित विद्यार्थ्याची कॉलेजकडे तक्रार करूनही त्या विद्यार्थ्यावर कारवाई का केली गेली नाही, याचा खुलासा कॉलेजकडून मागविला जाणार आहे. त्यानंतर त्या कॉलेजविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल, असे कुलगुरू वासुदेव गाडे यांनी सोमवारी स्पष्ट केले.
 संबंधित विद्यार्थिनीने त्या विद्यार्थ्याची कॉलेजकडे तक्रार केली असल्याची माहिती उजेडात येत आहे. या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून त्या कॉलेजकडे खुलासा मागविण्यात येणार आहे. विद्यार्थिनीवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा गाडे यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केला. महाविद्यालयांच्या स्थानिक व्यवस्थापन समितीवर विद्यार्थ्यांना प्रतिनिधित्व देण्यात यावे, याच्या सूचना महाविद्यालयांना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयांमध्ये काऊन्सेलिंग सेल उभारणे आवश्यक असेल, तिथे विद्यार्थ्यांना त्यांच्या तक्रारी नोंदविता येतील, अशी माहिती वासुदेव गाडे यांनी दिली.