शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

महामार्गाच्या सुरक्षेला पोलिसांची नकारघंटा !

By admin | Updated: June 24, 2014 00:58 IST

महामार्गावरील वाढत्या अपघातामुळे वाहतूक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी गृहविभागाने महामार्ग पोलीस दल तैनात केले आहे. मात्र या दलाकडे गृहविभागाचे दुर्लक्ष होते आहे. विभागातील कर्मचारी

अधिकाऱ्यांचा तुटवडा : गृहविभागाचे दुर्लक्ष नागपूर : महामार्गावरील वाढत्या अपघातामुळे वाहतूक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी गृहविभागाने महामार्ग पोलीस दल तैनात केले आहे. मात्र या दलाकडे गृहविभागाचे दुर्लक्ष होते आहे. विभागातील कर्मचारी कार्य करण्यास अनिच्छुक आहे. वाहतुकीच्या तुलनेत पोलीस दलाची यंत्रणा कमकुवत आहे. नागपूर आणि अमरावती विभाग मिळून एक पोलीस अधीक्षक, दोन उपअधीक्षक, चार पोलीस निरीक्षकांची मंजुरी आहे. मात्र विदर्भात महामार्ग पोलिसांक डे अधीक्षक आणि उपअधीक्षकही नाही. पीआयकडे प्रभारी डीवायएसपीची जबाबदारी आहे. नागपूर विभागात नऊ पोलीस चौकी आहे. प्रत्येक पोलीस चौकीकडे २०० किलोमीटर क्षेत्राची जबाबदारी आहे. प्रत्येक चौकीत एक एपीआय, तीन पीएसआय व अन्य पोलीस शिपाई अशा २० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. सध्या प्रत्येक चौकीत ५० टक्केही कर्मचारी नाही. प्रत्येक चौकीकडे फक्त एकच वाहन आहे. अपघातग्रस्तांना मदत करणे, वाहतूक जाम झाल्यास सुरळीत करणे, वाहनात बिघाड असल्यास चालान करणे, या जबाबदाऱ्या पोलिसांना पार पाडाव्या लागतात. नियमांकडे दुर्लक्ष औद्योगीकरणामुळे महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या वाहतुकीबरोबरच महामार्गावर सुधारणाही करण्यात आल्या आहे. दुपदरी असलेले महामार्ग सहा पदरी झाले आहे. वाहतूक सुरळीत होईल, अपघात कमी होती, अशी अपेक्षा होती. मात्र वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याने अपघाताच्या संख्येत वाढ झाली. नागपुरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ कोलकाता - मुंबई आणि महामार्ग क्रमांक ७ जबलपूर - हैद्राबाद जातो. विदर्भातील कोळशाच्या खाणी, औद्योगीकरण, प्रवासी वाहतूक आणि छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशच्या सीमा जवळ असल्याने, जड वाहतुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. (प्रतिनिधी)