शहरं
Join us  
Trending Stories
1
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
2
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
3
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
4
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
5
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
6
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
7
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
8
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
9
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
10
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
11
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
12
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
13
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
14
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
15
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
16
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
17
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
18
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
19
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
20
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक

पोलिसांवरील फौजदारी खटला रद्द

By admin | Updated: April 2, 2015 04:56 IST

खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ नारायण पाटील, निरीक्षक सुनील बलभीम दरेकर आणि सहाय्यक निरीक्षक संजय शंकर लोखंडे

मुंबई : खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ नारायण पाटील, निरीक्षक सुनील बलभीम दरेकर आणि सहाय्यक निरीक्षक संजय शंकर लोखंडे यांच्याविरुद्ध एका वकिलाने केलेल्या फिर्यादीवर पनवेल येथील दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार नोंदविण्यात आलेला अपहरण व मारहाणीचा गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला आहे.खारघर येथील एक वकील विनोद दिपचंद गंगवाल यांनी या पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध अनेक प्रकारचे आरोप करणारे एक पत्र गेल्या वर्षी १२ डिसेंबर रोजी राष्ट्रपतींपासून अनेक बड्या सरकारी पदांवरील व्यक्तींना पाठविले होते. त्या पत्राची एक प्रत गंगवाल यांनी पनवेल येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनाही पाठविली होती व ही माफी फौजदारी फिर्याद आहे असे मानून योग्य ते कायदेशीर आदेश द्यावेत, अशी विनंती स्वहस्ताक्षरात लिहिली होती.पनवेल येथील दुसऱ्या न्यायालयाच्या न्याय दंडाधिकाऱ्यांनी गंगवाल यांच्या या पत्राची लगेच त्याच दिवशी दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी वरिष्ठ तपास अधिकारी नेमून याचा तपास करावा, असा आदेश दिला होता. यावरून पाटील, दरेकर व लोखंडे यांच्यावर खारघर पोलीस ठाण्यात भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.याविरुद्ध या तिन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी केलेली रिट याचिका मंजूर करून न्या. रणजीत मोरे व न्या. अनुजा प्रभूदेसाई यांनी त्यांच्याविरुद्ध नोंदविलेला गुन्हा व फिर्याद रद्द केली. हवे असल्यास गंगवाल या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार करू शकतात, अशी मुभा न्यायालयाने दिली व अशी तक्रार केली गेल्यास अधीक्षकांनी त्यावर कायद्यानुसार कारवाई करावी, असे निर्देश दिले. खंंडपीठाने हा निकाल प्रामुख्याने दोन मुद्द्यांवर दिला. एक, गंगवाल यांच्या आरोपांनुसार या पोलीस अधिकाऱ्यांनी जी काही बेकायदा कृत्ये केली ती त्यांनी पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य पार पाडताना केली होती. त्यामुळे त्यांच्याविरुद्धच्या गुन्ह्यांची दखल घेण्यापूर्वी राज्य सरकारची संमती आवश्यक होती. परंतु अशी संमती नसतानाच दंडाधिकाऱ्यांनी कारवाई केली.दोन, दंडाधिकाऱ्यांनी केवळ पोस्ट आॅफिस असल्याप्रमाणे यंत्रवत काम करणे अपेक्षित नाही. समोर आलेल्या फिर्यादीच्या सत्यतेविषयी त्यांनी आधी स्वत:चे प्रथमदर्शनी तरी समाधान करून घ्यायला हवे. अशा वेळी दंडाधिकाऱ्यांनी हवे तर प्राथमिक चौकशीचे आदेश द्यावेत, असे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहेत. पण दंडाधिकाऱ्यांनी समोर आलेली फिर्याद परिपूर्ण व सत्य आहे,असे मानून लगेच गुन्हा नोंदवून तपासााचे आदेश दिले.