शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

'राजा'च्या दरबारात पोलीस- कार्यकर्त्यांत खडाजंगी

By admin | Updated: September 11, 2016 23:57 IST

दरवर्षीप्रमाणे लालबागचा राजाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमधील हाणामारीचे सत्र यावर्षीही सुरू आहे. शनिवारी रात्री राजाच्या दरबारातच पोलीस आणि कार्यकर्ते भिडल्याची घटना सीसीटीव्हीमुळे समोर आली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ११ -  दरवर्षीप्रमाणे लालबागचा राजाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमधील हाणामारीचे सत्र यावर्षीही सुरू आहे. शनिवारी रात्री राजाच्या दरबारातच पोलीस आणि कार्यकर्ते भिडल्याची घटना सीसीटीव्हीमुळे समोर आली आहे. पोलिसाने केलेल्या बेदम मारहाणीमुळे कार्यकर्त्याच्या कानाचा पडदा फाटल्याचा आरोप मंडळाने केला आहे, तर दोषींवर नक्कीच कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे.

यासंदर्भात मंडळाने दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, गौरी-गणपतींचे विसर्जन झाल्याने शनिवारी मुंबईसह राजाच्या दराबारातही प्रचंड गर्दी झाली होती. यासंदर्भात एक महिला पत्रकार मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांची प्रतिक्रिया घेण्यास स्टेजवर येत होती. मात्र यावेळी भायखळा पोलीस ठाण्याचे पीएसआय सत्यवान पवार यांनी पत्रकाराला रोखले. शिवाय एका पोलीस शिपाईच्यानातेवाईकांनी उलट दिशेने दर्शनासाठी सोडले. दरम्यान, मंडळाचा कार्यकर्ता रोहित श्रीवास्तव याने पत्रकाराला सोडण्यास सांगितले. यावरूनच दोघांमध्ये वाद निर्माण झाला. वादात पवार यांनी रोहितला बेदम मारहाण केली. 

उपचारासाठी रोहितला केईएम रूग्णालयात घेऊन गेले असता, त्याच्या कानाचा पडदा फाटल्याचे कळाले. पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी मंडळाने केली होती. मात्र गुन्हा दाखल न करता पोलिसांनी केवळ अर्ज स्वीकार केला. त्यामुळे याप्रकरणी पोलीस आयुक्त आणि गृहमंत्री यांकडे तक्रार करणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले.

यावर काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप उगले म्हणाले की, मंडळाने केलेल्या तक्रारीनुसार त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू आहे. सध्या बहुतांश फौजफाटा गणेशोत्सवाच्या बंदोबस्तमध्ये व्यस्त आहे. तरी लालबागचा राजा मंडपातील सीसीटीव्हीच्या मदतीने कार्यकर्ता आणि पोलीस अधिकारी यांमध्ये झालेल्या वादाची पाहणी केली जाईल. त्यात जो कोणी दोषी आढळेल, त्यावर निश्चित कारवाई केली जाईल.

शुक्रवारपासून रविवारपर्यंत बहुतांश गणपतींसह गौरींचे विसर्जन झालेले आहे. त्यामुळे पुढील चार दिवस लालबाग राजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीत अधिक भर पडणार आहे. त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबतच पोलिसांनाही गर्दीला आवरण्यासाठी अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे.

 
आणखी वाचा 
 
 
पत्रकाराला एसीपीची धक्काबुक्की

पत्रकार उदय जाधव यांना लालबागचा राजा मंडळ परिसरात एसीपी अजय पाटणकर यांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे. माध्यमांसाठी असलेल्या विशेष कक्षाकडे जाताना पाटणकर यांनी अडवले. ओळखपत्र दाखवल्यानंतरही पाटणकर यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप उदय जाधव यांनी केला आहे. याप्रकरणी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांकडे तक्रार केल्यानंतर उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सीसीटीव्ही चित्रण तपासून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.