शहरं
Join us  
Trending Stories
1
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
2
वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
3
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
4
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
5
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
6
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
7
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
8
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
9
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
10
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
12
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
13
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
14
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
15
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
16
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
17
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
18
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
19
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
20
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”

दीडशे जणांना विषबाधा

By admin | Updated: March 27, 2016 01:26 IST

तालुक्यातील कुंबळे गावातील मोहल्ल्यामध्ये शनिवारी झालेल्या लग्न समारंभातील जेवणामधून सुमारे १५० जणांना विषबाधा झाली आहे. त्यांच्यावर महाडमधील सरकारी

महाड/दासगाव : तालुक्यातील कुंबळे गावातील मोहल्ल्यामध्ये शनिवारी झालेल्या लग्न समारंभातील जेवणामधून सुमारे १५० जणांना विषबाधा झाली आहे. त्यांच्यावर महाडमधील सरकारी रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात तत्काळ उपचार सुरु केल्याने परिस्थिती आटोक्यात आली आहे.महाड तालुक्यातील कुंबळे येथील व्यवसायिक जैनुद्दीन कादरी यांच्या मुलगा नबील याचा निकाह शनिवार दुपारी पार पडला. यावेळी उपस्थित वऱ्हाडी मंडळींनी जेवण केले आणि काही तासानंतर अनेकांना उलटी व जुलाबाचा त्रास होऊ लागला. या लग्नाच्या जेवणाचे कंत्राट महाडमधील ए वन कॅटरर्स यांना देण्यात आले होते. उलटी जुलाबाचा त्रास झालेल्यांमधील अनेकजण महाड तालुक्यातील असल्याने त्यांना ताबडतोब महाडमधील शासकीय रुग्णालय तसेच डॉ. देशमुख हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. अनेक पाहुणे महाड सोडून आपल्या गावी गेले आहेत. यामुळे रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.महाड ट्रॉमा केअर सेंटरमध्ये १२ रुग्णांवर उपचार सुरु करण्यात आल्याची माहिती ट्रामा केअर सेंटरचे अधिक्षक डॉ. भास्कर जगताप यांनी दिली. महाडमधील डॉ. देशमुख यांच्या रुग्णालयात जवळपास १०० च्यावर तर डॉ. शेठ यांच्या हॉस्पिटलमध्ये देखील अनेक रुग्ण उपचाराकरिता दाखल झाले आहेत. कुंबळे गावाच्या शेजारी असलेल्या तुडील गावातील डॉ. ताजीर यांच्या दवाखान्यात देखील काही रुग्णांनी उपचार घेतले आहेत. याबाबत अद्याप निश्चित आकडा प्राप्त झालेला नाही. महाडमधील ज्या कुंबळे गावात ही घटना झाली त्या ठिकाणी देखील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे यांनी आपले एक पथक पाठवून दिले आहे. कुंबळे गावात या पथकाने प्राथमिक शाळेत रुग्णांवर उपचार सुरु केले आहेत. (प्रतिनिधी)महिला अधिककुंबळे गावासह पंचक्रोशीतील म्हाप्रळ, जुई, तुडील, वऱ्हाळी, वलंग, चिंभाव आदी गावातील अनेकांना लग्नातील जेवणावळीतून विषबाधा झाली आहे. यात महिलांची संख्या अधिक आहे. मैनुद्दीन शेखनाग, मैमुना शेखनाग, आफरीन शेखनाग, आमिर शेखनाग, शगुफ्ता मुकादम, आमिर शेख आदींना अधिक त्रास झाला असला तरी आता त्यांची प्रकृती सुधारत आहे. या प्रकरणी महाड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. लग्नसमारंभातील विषबाधेबाबत पोलीस ठाण्याला सूचना दिली आहे. लग्नातील जेवणाचे नमुने ताब्यात घेतले जातील. त्यानंतर हे नमुने मुंबई येथे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येतील. अहवाल आल्यावर विषबाधेचे कारण कळेल. - डॉ. राजेंद्र शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी