शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दीडशे जणांना विषबाधा

By admin | Updated: March 27, 2016 01:26 IST

तालुक्यातील कुंबळे गावातील मोहल्ल्यामध्ये शनिवारी झालेल्या लग्न समारंभातील जेवणामधून सुमारे १५० जणांना विषबाधा झाली आहे. त्यांच्यावर महाडमधील सरकारी

महाड/दासगाव : तालुक्यातील कुंबळे गावातील मोहल्ल्यामध्ये शनिवारी झालेल्या लग्न समारंभातील जेवणामधून सुमारे १५० जणांना विषबाधा झाली आहे. त्यांच्यावर महाडमधील सरकारी रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात तत्काळ उपचार सुरु केल्याने परिस्थिती आटोक्यात आली आहे.महाड तालुक्यातील कुंबळे येथील व्यवसायिक जैनुद्दीन कादरी यांच्या मुलगा नबील याचा निकाह शनिवार दुपारी पार पडला. यावेळी उपस्थित वऱ्हाडी मंडळींनी जेवण केले आणि काही तासानंतर अनेकांना उलटी व जुलाबाचा त्रास होऊ लागला. या लग्नाच्या जेवणाचे कंत्राट महाडमधील ए वन कॅटरर्स यांना देण्यात आले होते. उलटी जुलाबाचा त्रास झालेल्यांमधील अनेकजण महाड तालुक्यातील असल्याने त्यांना ताबडतोब महाडमधील शासकीय रुग्णालय तसेच डॉ. देशमुख हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. अनेक पाहुणे महाड सोडून आपल्या गावी गेले आहेत. यामुळे रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.महाड ट्रॉमा केअर सेंटरमध्ये १२ रुग्णांवर उपचार सुरु करण्यात आल्याची माहिती ट्रामा केअर सेंटरचे अधिक्षक डॉ. भास्कर जगताप यांनी दिली. महाडमधील डॉ. देशमुख यांच्या रुग्णालयात जवळपास १०० च्यावर तर डॉ. शेठ यांच्या हॉस्पिटलमध्ये देखील अनेक रुग्ण उपचाराकरिता दाखल झाले आहेत. कुंबळे गावाच्या शेजारी असलेल्या तुडील गावातील डॉ. ताजीर यांच्या दवाखान्यात देखील काही रुग्णांनी उपचार घेतले आहेत. याबाबत अद्याप निश्चित आकडा प्राप्त झालेला नाही. महाडमधील ज्या कुंबळे गावात ही घटना झाली त्या ठिकाणी देखील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे यांनी आपले एक पथक पाठवून दिले आहे. कुंबळे गावात या पथकाने प्राथमिक शाळेत रुग्णांवर उपचार सुरु केले आहेत. (प्रतिनिधी)महिला अधिककुंबळे गावासह पंचक्रोशीतील म्हाप्रळ, जुई, तुडील, वऱ्हाळी, वलंग, चिंभाव आदी गावातील अनेकांना लग्नातील जेवणावळीतून विषबाधा झाली आहे. यात महिलांची संख्या अधिक आहे. मैनुद्दीन शेखनाग, मैमुना शेखनाग, आफरीन शेखनाग, आमिर शेखनाग, शगुफ्ता मुकादम, आमिर शेख आदींना अधिक त्रास झाला असला तरी आता त्यांची प्रकृती सुधारत आहे. या प्रकरणी महाड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. लग्नसमारंभातील विषबाधेबाबत पोलीस ठाण्याला सूचना दिली आहे. लग्नातील जेवणाचे नमुने ताब्यात घेतले जातील. त्यानंतर हे नमुने मुंबई येथे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येतील. अहवाल आल्यावर विषबाधेचे कारण कळेल. - डॉ. राजेंद्र शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी