शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
5
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
6
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
7
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
8
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
9
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
10
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
11
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
12
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
13
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
14
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
15
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
16
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
17
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
18
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?
19
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

दूध पाजूनही सापाने अखेर विषच ओकले...-भास्कर जाधव :

By admin | Updated: October 12, 2014 23:31 IST

राष्ट्रवादीच्या प्रचार मेळाव्यात सर्वच पदाधिकाऱ्यांची उदय सामंत यांच्यावर टीका

रत्नागिरी : सापाला दूध पाजले तर त्याच्या तोंडातून अमृत थोडेच बाहेर पडणार आहे? पक्षातीलच काही मंडळींनी हा साप पोसला होता. पक्षाने सर्व काही देऊनही गद्दारी करीत पक्षाबाहेर पडला व पक्षाच्या विरोधातच गरळ ओकला. त्यामुळे रत्नागिरीतील लढत ही गद्दार विरुध्द निष्ठावंत अशी असून, गद्दाराला एकदाच गाडून टाका, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे माजी मंत्री भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या उदय सामंत यांच्यावर केला. राष्ट्रवादीचे उमेदवार बशीर मुर्तुझा यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत जाधव बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पक्षाचे प्रदेश सरचिटणीस केशवराव भोसले, बाप्पा सावंत, माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये, उमेदवार बशीर मुर्तुझा, नगरसेवक सुदेश मयेकर, रामभाऊ गराटे, यासीन मामू आदी पदाधिकारी उपस्थित होते. जाधव म्हणाले, पक्षाने याला काय दिले नाही, दोनवेळा आमदारकी, राज्याच्या युवक शाखेचे प्रदेशाध्यक्षपद, मंत्रिपद देऊनही पक्षाशी गद्दारी केली. तिसऱ्यांदा उमेदवारी देऊनही पक्षाने पैसे मागितल्याचे सांगत बदनामी करणाऱ्याला त्याची जागा मतदारांनी दाखवून द्यावी. सांमत राष्ट्रवादीतून सेनेत गेल्यावर जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांना मी विचारले, जो राष्ट्रवादीचा, स्वत:च्या कुटुंबाचा होऊ शकला नाही, तो शिवसेनेचा होईल? त्यावर महाडिक म्हणाले, आम्ही त्यांना स्वीकारले आहेच, परंतु खांद्यावरही बसविले आहे. त्यावर मी म्हणालो, आमच्याकडे हेच झाले. काहींनी त्यांना खांद्यावर बसविले, त्यांचे कपडे घाण झाले. तुम्ही कान सांभाळा, असा सल्ला दिला आहे. मी पण २००४ मध्ये शिवसेना पक्ष सोडला होता. मला दिलेली उमेदवारी अचानक काढून घेतली. त्यामुळे मी पक्षाच्याच कार्यालयात बसून रितसर राजीनामा दिला होता. माझ्या पक्षाचा एबी फॉर्म घेऊन मी दुसऱ्या पक्षात गेलो नाही. येथे तर पक्षाने सर्वकाही दिले. तिसऱ्या वेळचा उमेदवारीचा एबी फॉर्मही दिला तरी गद्दारी झाली हे न पटणारेच आहे, असेही ते म्हणाले.पक्षाने अन्याय केला, उमेदवारीसाठी पैसे मागितले असे जर भाषण करताना भास्कर जाधव रडलेपाच वर्षांपूर्वी पावसमध्ये राष्ट्रवादीची सभा झाली होती. त्यावेळी एकाच व्यासपीठावर असताना तटकरे मला उद्देशून बोलले होते की, माझ्या निष्ठेबाबतच त्यांनी संशय घेतला होता. त्यावेळी मी प्रचंड अस्वस्थ झालो. पवारांवर निष्ठा असलेल्या माझ्यावर असा आरोप भर सभेत व्हावा, हे दुर्दैवी होते. त्याचक्षणी मला वाटले पक्ष सोडावा. परंतु कुमार शेट्ये यांनी मला सावरले. मात्र, माझ्या निष्ठेबद्दल शंका घेणाऱ्यांची निष्ठा खरी की, माझी खरी, हे स्वामी स्वरुपानंद व शारदादेवीवरच सोपवले. मी गद्दार असेन तर मला शिक्षा व्हावी, जर दुसरा कोणी असेल तो जगासमोर येऊदे. २६ सप्टेंबर २०१४ रोजी गद्दार कोण हे जगासमोर आलेच. पालकमंत्रीपदाच्या माझ्या साडेतीन वर्षांच्या काळात या माणसाने विरोधकांशी हातमिळवणी करीत मला प्रचंड त्रास दिला, असे म्हणत भास्कर जाधव ओक्साबोक्सी रडले. त्यामुळे भावविवश झालेल्या कार्यकर्त्यांनी लगेचच जोरदार घोषणाबाजी केली.