शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

काळजाला भिडते सुर्वेची कविता

By admin | Updated: August 20, 2014 00:20 IST

सहजपणाने काळजाला भिडणारी नारायण सुर्वेची कविता आहे. ती सरळ आणि साधी आहे. दु:खितांचे, कष्टितांचे प्रतिनिधित्व करते.

ना. धों. महानोर : नारायण सुव्रे काव्यजागर संमेलन
पिंपरी : सहजपणाने काळजाला भिडणारी नारायण सुर्वेची कविता आहे. ती सरळ आणि साधी आहे. दु:खितांचे, कष्टितांचे प्रतिनिधित्व करते. समाजवाद आणि साम्यवाद त्यातून व्यक्त होतो. अशा मित्रच्या नावाचा पुरस्कार मिळाला, हा माङया दृष्टीने परमोच्च आनंदाचा क्षण आहे, असे भावोद्गार कविवर्य ना. धों. महानोर यांनी चिंचवड येथे काढले.
नारायण सुव्रे साहित्य कला अकादमीच्या वतीने चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात आयोजित नारायण सुव्रे काव्यजागर संमेलनात ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ. मुं. शिंदे, माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, चित्रपट दिग्दर्शक नागनाथ मंजुळे, रवींद्र जैन, पुरुषोत्तम सदाफुले, कैलास आवटे, बाजीराव सातपुते, सुव्रे यांची कन्या कल्पना घारे आदी उपस्थित होते. भाई वैद्य यांच्या हस्ते महानोर यांना नारायण सुव्रे स्नेहबंध पुरस्कार, मंजुळे यांना काव्यप्रतिभा पुरस्कार, जैन यांना साहित्ययात्री पुरस्कार, ज्ञानदीप विद्यालयास प्रगतिशील शिक्षण संस्था पुरस्कार देऊन सन्मानित केले.   
डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, सामान्यांतल्या सामान्य माणसाला आपला वाटणारा कवी म्हणजे सुव्रे होत. कष्टक:यांचे भावविश्व त्यांच्या कवितेत होते. सुव्रे, महानोर, करंदीकर, पाडगावकर यांच्या कविता ऐकून, वाचून आम्ही मोठे झालो. आज लोक वाचत नाहीत, हे वास्तव आहे. अभिव्यक्तीला वाट न मिळाल्याने सामाजिक प्रश्न निर्माण होतात. 
मंजुळे म्हणाले, ‘‘मी कविता लिहितो. पण ती सादर करण्याची भीती वाटते. कवितेसाठी सुव्रे यांच्या नावाचा पुरस्कार मिळणो ही माङया दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. आज सुव्रे आपल्यात नाहीत यावर माझा विश्वासच बसत नाहीत. कारण कवी, कलावंत हा त्याच्या कलाकृतीच्या निमित्ताने सदैव आपल्यासोबत असतो.’’ त्यांनी मित्र, अ आणि ब ही कविता सादर करून दाद घेतली. (प्रतिनिधी)
 
मानसिकता चुकीची
साहित्यिक, कवींच्या मानसिकतेविषयी महानोर आणि कोत्तापल्ले यांनी भाष्य केले. महानोर म्हणाले, ‘‘दुस:यांना प्रतिभावंत म्हणण्याची मानसिकता नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. चांगल्याचे कौतुक करण्याची मानसिकता वाढीला लागायला हवी. पुस्तके वाचण्यापेक्षा माणसे वाचायला हवीत. माणसे वाचणारा, साहित्यावर प्रेम करणारा कवी सुव्रे होते. त्यांचे निस्सीम प्रेम तराजूत मोजणो कठीण आहे.’’ नवकवींबाबत कोत्तापल्ले म्हणाले, ‘‘नवकवी व्यासपीठावर यायला लागला की, त्याच्या नरडीला नख कसे लावता येईल, याचा विचार सिनियर करीत असतात. हे चुकीचे आहे. आज सादर झालेल्या कविता खरोखरच चिंतनशील आहेत.’’