शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

निधी कंत्राटदारांच्या खिशात

By admin | Updated: May 3, 2016 04:12 IST

राज्यात दुष्काळासारखा गंभीर प्रश्न असतानाही सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेचा भंपकपणा सुरू आहे. प्रत्येक बाबतीत सतत खोटे बोलत राहण्याचा एककलमी कार्यक्रम भाजपा

मुंबई : राज्यात दुष्काळासारखा गंभीर प्रश्न असतानाही सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेचा भंपकपणा सुरू आहे. प्रत्येक बाबतीत सतत खोटे बोलत राहण्याचा एककलमी कार्यक्रम भाजपा राबवित असून विहिरींच्या नावाखाली कोट्यवधी रुपये कंत्राटदारांच्या खिशात घालण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. दुष्काळी भागात ३३ हजार विहीरी खोदल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. प्रत्यक्षात मुख्यमंत्री कार्यालयासह सरकारच्या कोणत्याच विभागाकडे या विहिरींची माहिती उपलब्ध नसल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे, असे राज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. गुढी पाडवा मेळाव्यात आपण राज्य सरकारला ३३ हजार विहिरींचे पुरावे दाखविण्याची मागणी केली होती. यावर, या विहिरींची, त्याच्या लाभार्थ्यांच्या नाव-पत्त्यासह नोंद उपलब्ध असल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला होता. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर आम्ही मुख्यमंत्री कार्यालयाकडे माहिती अधिकारात विहिरींचा तपशील विचारला. यावर तशी माहितीच मुख्यमंत्री कार्यालयाकडे नसल्याचे लेखी उत्तर देण्यात आले, असे सांगून ते म्हणाले, असाच प्रकार जलसंधारण, जलसंपदा, नियोजन आणि रोहयो या सर्व विभागांनी विहिरींबाबत माहिती नसल्याचे लेखी उत्तर दिले आहे.शासनाचा कोणताच विभाग या विहिरींची नोंद ठेवत नसेल तर मुख्यमंत्री कोणत्या हिमतीने आणि अधिकाराने विहिरींची तसेच त्यांच्या लाभार्थ्यांची नावे, पत्ते देण्याची भाषा करतात, असा सवाल त्यांनी केला. या केवळ कागदावरच आहेत. अनेक ठिकाणी जुन्या विहिरींभोवती कठडे बांधून विहीर खोदल्याचा खोटारडेपणा केल्याचे राज यांनी सांगितले. १ मे रोजी हुतात्मा चौकात सजावट होतेच. पालिका आणि राज्य सरकारच्या वादात १ मे रोजी हुतात्मा चौकात सजावट झाली नाही. हा हुतात्म्यांचा अपमान असून भाजपा आणि शिवसेनेने याबाबत जनतेची माफी मागायला हवी, असे राज म्हणाले. (प्रतिनिधी)सामंजस्य कराराचा देखावाप्रत्येक विषयात सतत खोटे बोलत राहण्याचे धोरण भाजपाकडून राबविले जात आहे. मेक इन इंडिया सप्ताहात परदेशी भांडवल मिळवून देण्याच्या नावाखाली प्रत्येक जिल्ह्यातून छोट्या उद्योजकांना गोळा करण्यात आले. ज्या उद्योजकाने २ कोटींची मागणी केली त्याच्यासोबत २०० कोटींचा तर ६ कोटींची मागण्या करणाऱ्या उद्योजकासोबत ६०० कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला. अशा भंपकबाजीतून दीड लाख कोटींच्या सामंजस्य करार झाल्याचा देखावा उभारला गेल्याचा आरोप राज यांनी केला. फडणवीसांनी राजीनामा द्यावावेगळ्या विदर्भासाठी मतदान करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसण्याचा अधिकार आहे का, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. स्वत: फडणवीस अथवा सरकार विदर्भाबाबत भूमिका स्पष्ट करत नाहीत. अ‍ॅड. श्रीहरी अणे आणि मा. गो. वैद्यांच्या माध्यमातून अंदाज घेतला जात आहे. आधी विदर्भ, मग मराठवाडा आणि शेवटी मुंबईच महाराष्ट्रापासून तोडण्याचा हा डाव आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राज यांनी केली.‘लोकमत’चा दाखला : मराठवाड्यातील लातूर, बीड, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यांतील १०० विहिरींची प्रत्यक्ष पाहणी करून ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेला ग्राऊंड रिपोर्ट पुरेसा बोलका असून सरकारच्या दाव्याचा पोलखोल करणारा आहे, असे राज यांनी सांगितले.