शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएमपी’ येतेय नियंत्रणात

By admin | Updated: November 2, 2016 00:32 IST

बसेसवर ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) आणि इंटिलिजंट ट्रान्झिट मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) या यंत्रणांची करडी नजर फायदेशीर ठरू लागली आहे.

पुणे : बसथांब्यांवर न थांबणाऱ्या तसेच मर्यादेपेक्षा अधिक वेग असलेल्या बीआरटी मार्गावरील बसेस आणि इतर मार्गांवरील बसेसवर ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) आणि इंटिलिजंट ट्रान्झिट मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) या यंत्रणांची करडी नजर फायदेशीर ठरू लागली आहे. या यंत्रणांमुळे नियम मोडणाऱ्या चालकांवर पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) कारवाई करणे शक्य झाले असून, अनियंत्रित बसेसवर नियंत्रण ठेवणे सोपे होत आहे.‘पीएमपी’च्या ताफ्यातील सुमारे ५७५ बसेसला ‘आयटीएमएस’ यंत्रणा बसविण्यात आली आहे. बीआरटी मार्गावरून धावणाऱ्या बसेसवर ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. मागील वर्षभरात ‘पीएमपी’ने संगमवाडी-विश्रांतवाडी, येरवडा-वाघोली, नाशिक फाटा-वाकड आणि सांगवी-किवळे या बीआरटी मार्गावर ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. तर सुमारे १०३० बसेसवर जीपीएस यंत्रणा आहे. टप्प्याटप्प्याने जीपीएसच्या कक्षेत सर्वच बसेस घेण्याचा पीएमपी प्रशासनाचे नियोजन आहे. ‘बीआरटी’सह इतर मार्गावरील बसेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही यंत्रणा फायदेशीर ठरत आहे. या दोन्ही यंत्रणांच्या आधारे बसेसवर देखरेख करण्यासाठी स्वारगेट येथील पीएमपी मुख्यालयाच्या आवारात स्वतंत्र अद्ययावत नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षातून दोन्ही यंत्रणा बसविलेल्या बसेसवर नियंत्रण ठेवणे शक्य होत आहे. बीआरटी मार्गातून जाताना काही वेळा चालक प्रवासी असूनही बस थांब्यावर न थांबविताना तशीच पुढे दामटतात. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. तसेच या मार्गातून जाताना वेगाचीही मर्यादा घालण्यात आली आहे. मात्र, काही चालक वेगमर्यादेचे भान न ठेवता बस भरधाव वेगात चालवितात. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. ‘आयटीएमएस’ यंत्रणेच्या आधारे बसथांबा सोडणे किंवा वेगमर्यादा न पाळणाऱ्या चालकांवर ‘पीएमपी’ने कारवाई सुरू केली आहे. बीआरटी मार्गावरील सर्व बसेस खासगी ठेकेदाराच्या आहेत. त्यामुळे नियम मोडणाऱ्या चालकांच्या ठेकेदारांना आर्थिक दंड करण्यात येत आहे. या चालकांकडून नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. (प्रतिनिधी)।ठेकेदारांचा दंड भरण्यास नकार‘आयटीएमएस’ यंत्रणेच्या आधारे कारवाई करण्यास सुरुवात केल्यानंतर ठेकेदारांना दररोज हजारो रुपयांचा दंड होऊ लागला. त्यामध्ये बीआरटी मार्गावरील थांब्यांवर बस न थांबविणे, याचे प्रमाण अधिक आहे. मात्र, त्यासाठी चुकीचा निकष लावला जात असल्याचा दावा ठेकेदारांनी केला आहे. बसथांब्यावर प्रवाशी नसल्यास किंवा प्रवाशी उतरणार नसल्यास बस थांबवली जात नाही. तसेच बीआरटी थांब्यांवर बस थांबविण्याचा कालावधी अधिक आहे, असे ठेकेदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी दंड भरण्यास नकार देत बस न सोडण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सध्या पीएमपी प्रशासनाने ही कारवाई थांबविली असल्याचे समजते.‘पीएमपी’कडून प्रत्येक मार्ग निश्चित करण्यात आलेला आहे. चालकांनी या मार्गावरूनच बस पुढे नेणे आवश्यक आहे. मात्र, असे असतानाही काही चालक मार्ग बदलून बस पुढे नेतात. त्यामुळे मुख्य मार्गावरील प्रवाशांना बसची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागते. त्याचा फटका ‘पीएमपी’ला बसतो. ‘जीपीएस’ यंत्रणेमुळे आता अशा चालकांवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे. त्यामुळे चालकांना शिस्त लागली आहे. पुढील काळात प्रत्येक बसवर ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे.।कारवाई करणारनियंत्रण कक्षामध्ये आयटीएमएस आणि जीपीएस यंत्रणांच्या आधारे बसेसवर देखरेख ठेवली जात आहे. कक्षामध्ये समोर मोठा पडदा लावण्यात आला असून, त्यावर विविध रंगांमध्ये बीआरटी व इतर मार्ग तसेच त्यावरून धावणाऱ्या बसेस दिसतात. त्यावर बसेसच्या क्रमांकासह त्यांचा मार्ग स्पष्टपणे दिसतो. एखाद्या चालकाने मार्ग बदलल्यास किंवा बीआरटी मार्गात वेगाने चालल्यास, थांब्यावर न थांबल्यास पडद्यावर दिसून येते. त्याआधारे संंबंधित बसचालकावर कारवाई केली जाते.