शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

‘पीएमपी’ येतेय नियंत्रणात

By admin | Updated: November 2, 2016 00:32 IST

बसेसवर ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) आणि इंटिलिजंट ट्रान्झिट मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) या यंत्रणांची करडी नजर फायदेशीर ठरू लागली आहे.

पुणे : बसथांब्यांवर न थांबणाऱ्या तसेच मर्यादेपेक्षा अधिक वेग असलेल्या बीआरटी मार्गावरील बसेस आणि इतर मार्गांवरील बसेसवर ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) आणि इंटिलिजंट ट्रान्झिट मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) या यंत्रणांची करडी नजर फायदेशीर ठरू लागली आहे. या यंत्रणांमुळे नियम मोडणाऱ्या चालकांवर पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) कारवाई करणे शक्य झाले असून, अनियंत्रित बसेसवर नियंत्रण ठेवणे सोपे होत आहे.‘पीएमपी’च्या ताफ्यातील सुमारे ५७५ बसेसला ‘आयटीएमएस’ यंत्रणा बसविण्यात आली आहे. बीआरटी मार्गावरून धावणाऱ्या बसेसवर ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. मागील वर्षभरात ‘पीएमपी’ने संगमवाडी-विश्रांतवाडी, येरवडा-वाघोली, नाशिक फाटा-वाकड आणि सांगवी-किवळे या बीआरटी मार्गावर ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. तर सुमारे १०३० बसेसवर जीपीएस यंत्रणा आहे. टप्प्याटप्प्याने जीपीएसच्या कक्षेत सर्वच बसेस घेण्याचा पीएमपी प्रशासनाचे नियोजन आहे. ‘बीआरटी’सह इतर मार्गावरील बसेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही यंत्रणा फायदेशीर ठरत आहे. या दोन्ही यंत्रणांच्या आधारे बसेसवर देखरेख करण्यासाठी स्वारगेट येथील पीएमपी मुख्यालयाच्या आवारात स्वतंत्र अद्ययावत नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षातून दोन्ही यंत्रणा बसविलेल्या बसेसवर नियंत्रण ठेवणे शक्य होत आहे. बीआरटी मार्गातून जाताना काही वेळा चालक प्रवासी असूनही बस थांब्यावर न थांबविताना तशीच पुढे दामटतात. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. तसेच या मार्गातून जाताना वेगाचीही मर्यादा घालण्यात आली आहे. मात्र, काही चालक वेगमर्यादेचे भान न ठेवता बस भरधाव वेगात चालवितात. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. ‘आयटीएमएस’ यंत्रणेच्या आधारे बसथांबा सोडणे किंवा वेगमर्यादा न पाळणाऱ्या चालकांवर ‘पीएमपी’ने कारवाई सुरू केली आहे. बीआरटी मार्गावरील सर्व बसेस खासगी ठेकेदाराच्या आहेत. त्यामुळे नियम मोडणाऱ्या चालकांच्या ठेकेदारांना आर्थिक दंड करण्यात येत आहे. या चालकांकडून नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. (प्रतिनिधी)।ठेकेदारांचा दंड भरण्यास नकार‘आयटीएमएस’ यंत्रणेच्या आधारे कारवाई करण्यास सुरुवात केल्यानंतर ठेकेदारांना दररोज हजारो रुपयांचा दंड होऊ लागला. त्यामध्ये बीआरटी मार्गावरील थांब्यांवर बस न थांबविणे, याचे प्रमाण अधिक आहे. मात्र, त्यासाठी चुकीचा निकष लावला जात असल्याचा दावा ठेकेदारांनी केला आहे. बसथांब्यावर प्रवाशी नसल्यास किंवा प्रवाशी उतरणार नसल्यास बस थांबवली जात नाही. तसेच बीआरटी थांब्यांवर बस थांबविण्याचा कालावधी अधिक आहे, असे ठेकेदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी दंड भरण्यास नकार देत बस न सोडण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सध्या पीएमपी प्रशासनाने ही कारवाई थांबविली असल्याचे समजते.‘पीएमपी’कडून प्रत्येक मार्ग निश्चित करण्यात आलेला आहे. चालकांनी या मार्गावरूनच बस पुढे नेणे आवश्यक आहे. मात्र, असे असतानाही काही चालक मार्ग बदलून बस पुढे नेतात. त्यामुळे मुख्य मार्गावरील प्रवाशांना बसची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागते. त्याचा फटका ‘पीएमपी’ला बसतो. ‘जीपीएस’ यंत्रणेमुळे आता अशा चालकांवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे. त्यामुळे चालकांना शिस्त लागली आहे. पुढील काळात प्रत्येक बसवर ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे.।कारवाई करणारनियंत्रण कक्षामध्ये आयटीएमएस आणि जीपीएस यंत्रणांच्या आधारे बसेसवर देखरेख ठेवली जात आहे. कक्षामध्ये समोर मोठा पडदा लावण्यात आला असून, त्यावर विविध रंगांमध्ये बीआरटी व इतर मार्ग तसेच त्यावरून धावणाऱ्या बसेस दिसतात. त्यावर बसेसच्या क्रमांकासह त्यांचा मार्ग स्पष्टपणे दिसतो. एखाद्या चालकाने मार्ग बदलल्यास किंवा बीआरटी मार्गात वेगाने चालल्यास, थांब्यावर न थांबल्यास पडद्यावर दिसून येते. त्याआधारे संंबंधित बसचालकावर कारवाई केली जाते.