शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीच्या ५४४ गाड्या भंगारात ?

By admin | Updated: May 19, 2016 01:23 IST

प्रवाशांची गैरसोय होत असल्याच्या नावाखाली पीएमपीला नवीन बाराशे गाड्या घेण्यास संचालक मंडळाने मान्यता दिली आहे.

पुणे : प्रवाशांची गैरसोय होत असल्याच्या नावाखाली पीएमपीला नवीन बाराशे गाड्या घेण्यास संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. मात्र, या गाड्या कधी येतील, याचा काहीच नेम नसला तरी, पुढील एक ते दीड वर्षात पीएमपीच्या तब्बल ५४४ गाड्या भंगारात काढाव्या लागणार आहेत. या गाड्या १० वर्षे जुन्या झाल्याने त्यांचे आयुर्मान संपले असून नवीन गाड्या नसल्याने नाईलाजास्तव या धोकादायक गाड्यांवर लाखो रुपयांचा दुरुस्तीचा खर्च करून त्या रस्त्यावर उतरविल्या जात आहेत. ज्या गाड्या आठ लाख ४० हजार किमी धावल्या आहेत अथवा त्यांचे १२ वर्षे वापरात असलेल्या भंगारात काढण्याचे नियमावलीत असून संचालक मंडळाचा ठरावही झाला आहे.शहरात दररोज १० लाख प्रवासी पीएमपीने प्रवास करतात. त्यांच्यासाठी प्रत्यक्षात पीएमपीला ३ हजार गाड्यांची आवश्यकता असली तरी पीएमपीच्या मालकीच्या केवळ १२०० बस आहेत, तर ८०० बस भाडेकराराने घेण्यात आलेल्या आहेत. या पीएमपीच्या मालकीच्या बसमधील सुमारे ३२४ गाड्या या १० वर्षे जुन्या असून २४० बसेस या १२ वर्षे जुन्या आहेत. त्यामुळे पुढील दोन वर्षांत प्रशासना ५४४ बसेस भंगारात काढाव्या लागणार असून पीएमपीकडे केवळ मालकीच्या ६५६ बसेस शिल्लक राहणार आहेत. (प्रतिनिधी)>दहाव्या वर्षीच गाडी स्क्रॅप करणे गरजेचे संचालक मंडळाच्या ठरावानुसार आठ लाख ४० हजार किमी पूर्ण किंवा १२ वर्षे वापरात असलेल्या गाड्या स्क्रॅप करणे गरजेचे आहे. मात्र गाड्या उपलब्ध नसल्याने दुरवस्था झालेल्या बसही वापरण्यात येत आहेत. नवी बस दाखल झाल्यानंतर त्यांचे मार्ग ठरविण्यात येतात. तसेच या गाड्या दोन शिफ्टमध्ये चालविण्यात येतात. शहरात आणि इतर रस्त्यांवर गाड्या चालवित असताना त्यांची होणारी झीजही वेगवेगळी आहे. त्यामुळे एसटीच्या गाड्या तुलनेने जास्त दिवस चावतात. मात्र गाड्यांची झीज आणि त्यांच्या वापराचा विचार करता पीएमपीच्या गाड्या १० वर्षांतच स्क्रॅप करणे गरजेचे आहे.>नवीन खरेदीचे निर्णय होईनात २०१२ नंतर पीएमपीच्या ताफ्यात एकही नवीन बस उपलब्ध झालेली नाही. तत्कालीन केंद्र शासनाकडून पीएमपीला जेएनएनयुआयएम योजनेअंतर्गत ५०० बसेस देण्याचा निर्णय झालेला होता. मात्र, केंद्रात सत्ताबदल होताच ही योजना बंद झाली. त्यानंतर दोन वर्षांचा कालावधी गेला तरी नवीन बससाठी हालचाल झालेली नाही. गेल्या दोन वर्षांत केवळ कर्ज कोणाकडून घ्यायचे, बससाठी पैसे कोण देणार, बस खरेदी करायच्या की भाडेकराराने घ्यायच्या, केवळ यावरच चर्चा सुरू आहे.