शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

पीएमसी ‘केअर’ नव्हे ‘केअरलेस’

By admin | Updated: July 15, 2016 00:19 IST

महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात पुणेकरांना सहभागी करून घेण्यासाठी, तसेच पुणेकरांच्या दैनंदिन समस्या त्यांनी महापालिकेत न येता मेसेज, फोन, ई-मेल, तसेच विविध सोशल मीडियाच्या

पुणे : महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात पुणेकरांना सहभागी करून घेण्यासाठी, तसेच पुणेकरांच्या दैनंदिन समस्या त्यांनी महापालिकेत न येता मेसेज, फोन, ई-मेल, तसेच विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून महापालिकेस कळविल्यानंतर त्यांची जबाबदारी निश्चित करून त्या तातडीने मार्गी लावण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पालिकेने सुरू केलेली ‘पीएमसी केअर’ सुविधेचा अनागोंदी कारभार ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आला आहे.या सुविधेतील महापालिकेने दिलेल्या 1800 1030 222 टोल फ्री क्रमांकावर लोकमतच्या तीन प्रतिनिधींनी शहरातील तीन भागांमधील तक्रारी दिल्या होत्या. मात्र, त्यातील एक तक्रार महापालिकेने परस्पर निकाली लावली, तर एका तक्रारीच्या अनुषंगाने शहरात भलतीकडेच संबंधित स्थळाची शोधमोहीम राबविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे ही सेवा म्हणजे पीएमसी केअर नव्हे तर अजूनही पीएमसी केअरलेसच असल्याचा अनुभव या प्रकारामधून समोर आला आहे. नागरिकांनी दैनंदिन समस्या घरबसल्या फोन अथवा मेलच्या माध्यमातून पालिकेला कळवाव्यात यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांचा निपटारा करण्यासाठी बसविलेली यंत्रणा अनागोंदी कारभार करीत असल्याचे दिसून आले आहे. परस्परच तक्रार निकाली पहिली तक्रार ‘लोकमत’च्या महिला प्रतिनिधीने केली. सिंहगड रस्ता परिसरात हिंगणे परिसरात या प्रतिनिधी राहतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात डासांचा उपद्रव असल्याने त्यांनी पीएमसी केअरच्या टोल फ्री क्रमांकावर फोन केला. हेल्पलाईनवरून विचारण्यात आल्या प्रमाणे त्यांनी आपले नाव, मोबाईल क्रमांक आणि पत्ताही दिला. त्यानंतर त्यांना तुम्हाला दहा मिनिटांत सी २0३५ तक्रार क्रमांक दिला जाईल असे सांगण्यात आले. तसेच तुमची तक्रार पुढील चार ते पाच दिवसांत निकाली निघेल असेही संबंधित हेल्पलाईनवरील कर्मचाऱ्याने सांगितले. त्यांतर दुसऱ्याच दिवशी तक्रार सोडवल्याचा मेसेजही आला. आणि तीन दिवसांनी लोकमतच्या प्रतिनिधीला पुन्हा महापालिकेमधून फोन आला, तुमची तक्रार चुकून औंध क्षेत्रीय कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली असून, आम्ही ती निकाली काढली आहे. त्यामुळे आता पुढे काहीच करता येणार नाही. तुम्ही पुन्हा तक्रार करा, आम्ही ती टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठवू, असे सांगण्यात आले. तोपर्यंत आठ दिवसांचा कालावधी निघून गेला होता. आणि डासांचा उपद्रवही संपलेला होता.किरकोळ कामांसाठीही चार दिवसांचा वेळ : पुणेकरांना परिसरातील तक्रारी करण्यासाठी महापालिका भवनात यावे लागू नये, त्यांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा व्हावा यासाठी ही सुविधा सुरू करण्याची अट स्मार्ट सिटी योजनेतच टाकण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेकडून ही सुविधा सुरू करण्यात आली असून, त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेले आहे. मात्र, नागरिकांच्या तक्रारींचा किती दिवसांत निपटारा करायचा याबाबत कालमर्यादा तसेच जबाबदारी निश्चित करण्यास पालिका विसरली असल्याचे या प्रकारामुळे समोर येते. कर्वेनगर येथे कचरा जाळत असल्याची तक्रार असताना प्रत्यक्षात त्या ठिकाणी तातडीने महापालिकेची यंत्रणा जाणे आवश्यक होते. मात्र फोनवरून चार दिवस लागतील, असे सांगण्यात आले. तर दुसऱ्या दोन्ही तक्रारींमध्ये डासांबाबत तक्रार होती. त्यामुळे तातडीने डासांची पैदास-ठिकाणे शोधून ती नष्ट करणे आवश्यक आहे. मात्र, नंतरच्या तक्रारीमध्येही निवारणासाठी चार दिवसांचा कालावधी सांगण्यात आला. त्यामुळे महापालिकेला नक्की स्मार्ट सेवा द्यायच्या आहेत का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दत्तवाडीमध्ये राहणाऱ्या लोकमतच्या आणखी एका प्रतिनिधीने याच टोल फ्री क्रमांकावर फोन केला. गेल्या काही दिवसांपासून आमच्या परिसरात डास वाढले असून, औषध फवारणी करावी अशी तक्रार दिली. या प्रतिनिधीला पुढील १0 मिनिटांमध्ये तक्रार क्रमांक सी २0३६ हा आला. त्यानंतर पुढील चार ते पाच दिवसांनंतर हे कर्मचारी आले. त्यांनी औषध फवारणी करून तक्रार निवारण अर्जावर सही घेतली आणि ते निघून गेले. या फवारणीनंतर आम्ही महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला. तसेच फवारणीची तक्रार दिल्यास किती दिवसांत फवारणी केली जाते याबाबत विचारणा केली असता, कोणत्याही तक्रारी नंतर अवघ्या चोवीस तासांत फवारणी केली जात असल्याचे सांगण्यात आले. तक्रार कर्वेनगरची, शोध मात्र बिबवेवाडीतसिंहगड रस्ता परिसरातच राहणाऱ्या दुसऱ्या प्रतिनिधीने याच क्रमांकावर फोन केला. आपण विठ्ठल मंदिराच्या परिसरात राहात असून, नदीकाठी मोठ्या प्रमाणात कचरा जाळला जात आहे. या शिवाय नदीच्या पलीकडील बाजूस कर्वेनगरच्या बाजूला असलेल्या अमृतकलश सोसायटीच्या मागील बाजूस कचऱ्याचा ढीग जाळला जात असून, मोठा धूर निघत असल्याची तक्रार दिली. त्यानंतर दहा मिनिटांत तक्रार क्रमांक मिळेल असे सांगण्यात आले. लोकमतच्या प्रतिनिधीने घनकचरा विभाग गाठला आणि कर्वेनगरच्या तक्रारीचे काय झाले याची विचारणा केली. आम्हाला ही तक्रार बिबवेवाडीची आहे असे कळविण्यात आले. म्हणून आम्ही संपूर्ण बिबवेवाडी पिंजून काढली. पण अमृत कलश सोसायटी सापडली नसल्याचे सांगितले.