शहरं
Join us  
Trending Stories
1
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
2
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
3
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
4
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
5
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
6
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
7
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
8
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
9
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
10
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
11
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
12
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
13
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
14
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
15
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
16
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
17
Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यात 'गुगल' दाखवणार गर्दीतून वाट; अडीच हजार CCTV ची शहरावर नजर
18
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
19
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
20
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद

पंतप्रधानांना स्मार्टसिटीसाठी वेळ, दुष्काळ पाहणीसाठी नाही - वळसे पाटील यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2016 21:51 IST

राज्यात यावर्षी मोठा दुष्काळ पडला. केंद्र सरकारने दुष्काळनिवारणासाठी पाहिजे तशी मदत केली नाही. दिवंगत पंतप्रधान पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी त्यांच्या काळात दुष्काळाच्या

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 21-  राज्यात यावर्षी मोठा दुष्काळ पडला. केंद्र सरकारने दुष्काळनिवारणासाठी पाहिजे तशी मदत केली नाही. दिवंगत पंतप्रधान पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी त्यांच्या काळात दुष्काळाच्या वेळी महाराष्ट्रात येऊन पाहणी केली. दिलासा दिला. मात्र, महाराष्ट्रात लोकसभा व निवडणुकीच्या प्रचारसभांचा धडाका लावणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी एवढा भीषण दुष्काळ पडला असताना महाराष्ट्रात फिरकले नाहीत. आता २५ जून रोजी पुण्यात ते स्मार्ट सिटीच्या उद्घाटनाला येण्यासाठी मात्र त्यांच्याकडे वेळ आहे. यावरून शेतकऱ्यांप्रति पंतप्रधान किती गंभीर आहे हे दिसून येते, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे नेते व नागपूर जिल्हा प्रभारी दिलीप वळसे पाटील यांनी केली. वळसे पाटील यांन नागपुरात शहर व ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र व राज्यातील भाजपचे सरकार सर्वच आघाड्यांवर नापास झाल्याचे टीकास्त्र सोडले. वळसे पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या काळात खोटी आश्वासने देऊन भाजप सत्तेत आले. मात्र, त्यानंतर त्यांचा आलेख घसरत चालला आहे. आसाम वघळता पाच राज्यात भाजपचा पराभव झाला आहे. मात्र, केवळ आसामचा गवगवा करून लाट कायम असल्याचे भासविले जात आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा लगेच जनतेवर निवडणुका लादल्या जावू नये म्हणून राष्ट्रवादीने भाजपला पाठबळ देण्याची भूमिका घेतली होती. मात्र, राष्ट्रवादी भविष्यात कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही. काँग्रेस हाच आपला नैसर्गिक मित्र असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षसंघटनेची पुनर्रचना केली जाणार आहे. रिक्त असलेल्या पदांवर लवकरच नियुक्त्या केल्या जातील. ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत करून मेळावे, शिबिर, प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जातील. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारचे अपयश जनतेसमोर मांडले जाईल, असेही त्यांनी सांगितले. पक्षात कुठलिही गटबाजी नसून सर्वजण एकदिलाने काम करीत असल्याचा दावा त्यांनी केला. या वेळी नागपूर शहर अध्यक्ष अनिल देशमुख, ग्रामीण जिल्हाध्यक्ष रमेश बंग, आ. प्रकाश गजभिये, माजी आ. दीनानाथ पडोळे, अजय पाटील, राजाभाऊ ताकसांडे, अतुल लोंढे आदी उपस्थित होते.भाजप-सेनेचा वाद की रणनीती- भाजप व शिवसेनेत वाद असल्याचे दाखविले जाते. कल्याण- डोंबीवली महापालिकेच्या निवडणुकीतही असेच झाले. निवडणुकीनंतर दोन्ही पक्ष एकत्र बसले. त्यामुळे सत्ताधारी व विरोधक या दोन्ही जागा बळकवायची भाजप- सेनेची रणनीती असू शकते, अशी शंका वळसे पाटील यांनी व्यक्त केली.आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर- महापालिकेच्या आगामी निवडणुकीत काँग्रेसची आघाडी करायची की स्वबळावर लढायचे याचा निर्णय स्थानिक पातळीवरील पक्षाचे नेते घेतील, असे स्पष्ट करीत स्वबळावर सर्व जागा लढण्याच्या दृष्टीने पक्षाची तयारी सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.