शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

पंतप्रधानांना स्मार्टसिटीसाठी वेळ, दुष्काळ पाहणीसाठी नाही - वळसे पाटील यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2016 21:51 IST

राज्यात यावर्षी मोठा दुष्काळ पडला. केंद्र सरकारने दुष्काळनिवारणासाठी पाहिजे तशी मदत केली नाही. दिवंगत पंतप्रधान पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी त्यांच्या काळात दुष्काळाच्या

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 21-  राज्यात यावर्षी मोठा दुष्काळ पडला. केंद्र सरकारने दुष्काळनिवारणासाठी पाहिजे तशी मदत केली नाही. दिवंगत पंतप्रधान पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी त्यांच्या काळात दुष्काळाच्या वेळी महाराष्ट्रात येऊन पाहणी केली. दिलासा दिला. मात्र, महाराष्ट्रात लोकसभा व निवडणुकीच्या प्रचारसभांचा धडाका लावणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी एवढा भीषण दुष्काळ पडला असताना महाराष्ट्रात फिरकले नाहीत. आता २५ जून रोजी पुण्यात ते स्मार्ट सिटीच्या उद्घाटनाला येण्यासाठी मात्र त्यांच्याकडे वेळ आहे. यावरून शेतकऱ्यांप्रति पंतप्रधान किती गंभीर आहे हे दिसून येते, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे नेते व नागपूर जिल्हा प्रभारी दिलीप वळसे पाटील यांनी केली. वळसे पाटील यांन नागपुरात शहर व ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र व राज्यातील भाजपचे सरकार सर्वच आघाड्यांवर नापास झाल्याचे टीकास्त्र सोडले. वळसे पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या काळात खोटी आश्वासने देऊन भाजप सत्तेत आले. मात्र, त्यानंतर त्यांचा आलेख घसरत चालला आहे. आसाम वघळता पाच राज्यात भाजपचा पराभव झाला आहे. मात्र, केवळ आसामचा गवगवा करून लाट कायम असल्याचे भासविले जात आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा लगेच जनतेवर निवडणुका लादल्या जावू नये म्हणून राष्ट्रवादीने भाजपला पाठबळ देण्याची भूमिका घेतली होती. मात्र, राष्ट्रवादी भविष्यात कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही. काँग्रेस हाच आपला नैसर्गिक मित्र असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षसंघटनेची पुनर्रचना केली जाणार आहे. रिक्त असलेल्या पदांवर लवकरच नियुक्त्या केल्या जातील. ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत करून मेळावे, शिबिर, प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जातील. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारचे अपयश जनतेसमोर मांडले जाईल, असेही त्यांनी सांगितले. पक्षात कुठलिही गटबाजी नसून सर्वजण एकदिलाने काम करीत असल्याचा दावा त्यांनी केला. या वेळी नागपूर शहर अध्यक्ष अनिल देशमुख, ग्रामीण जिल्हाध्यक्ष रमेश बंग, आ. प्रकाश गजभिये, माजी आ. दीनानाथ पडोळे, अजय पाटील, राजाभाऊ ताकसांडे, अतुल लोंढे आदी उपस्थित होते.भाजप-सेनेचा वाद की रणनीती- भाजप व शिवसेनेत वाद असल्याचे दाखविले जाते. कल्याण- डोंबीवली महापालिकेच्या निवडणुकीतही असेच झाले. निवडणुकीनंतर दोन्ही पक्ष एकत्र बसले. त्यामुळे सत्ताधारी व विरोधक या दोन्ही जागा बळकवायची भाजप- सेनेची रणनीती असू शकते, अशी शंका वळसे पाटील यांनी व्यक्त केली.आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर- महापालिकेच्या आगामी निवडणुकीत काँग्रेसची आघाडी करायची की स्वबळावर लढायचे याचा निर्णय स्थानिक पातळीवरील पक्षाचे नेते घेतील, असे स्पष्ट करीत स्वबळावर सर्व जागा लढण्याच्या दृष्टीने पक्षाची तयारी सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.