शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यांकडून शेतकऱ्यांची लूट

By admin | Updated: October 26, 2016 03:16 IST

खताच्या नावाखाली जणू माती विकणाऱ्या दुय्यम मिश्र खतांचे ५४४ पैकी तब्बल ५०८ नमुने रासायनिक प्रयोगशाळेने बाद ठरविले आहेत. त्यामुळे या खतांची गुणवत्ता

- राजेश निस्ताने, यवतमाळखताच्या नावाखाली जणू माती विकणाऱ्या दुय्यम मिश्र खतांचे ५४४ पैकी तब्बल ५०८ नमुने रासायनिक प्रयोगशाळेने बाद ठरविले आहेत. त्यामुळे या खतांची गुणवत्ता नसल्याचे सिद्ध झाले असून त्याचे उत्पादन करणाऱ्या राज्यातील १३४ कारखान्यांचे परवाना नूतनीकरण करू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे.कृषी विभागाने जुलै-आॅगस्टमध्ये राज्यभर मोहीम राबवून दुय्यम मिश्र खताचे तब्बल ५४४ नमुने घेतले. ते प्रयोगशाळांमध्ये तपासणीला पाठविण्यात आले. यापैकी ५४१ नमुन्यांचे अहवाल कृषी आयुक्तालयाला प्राप्त झाले आहेत. यातील तब्बल ५०८ नमुन्यांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. मुळात या कारखान्यांना दिलेले परवानेच चुकीचे होते, ही बाबसुद्धा या अहवालांनी अधोरेखित केली. सखोल चौकशी कराकेंद्राला मिश्र खत मान्य नसताना राज्यात काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात चक्क दुय्यम मिश्र खत कारखान्यांना परवाने दिले गेले. देशात केवळ महाराष्ट्रात हे परवाने देण्यात आले आहेत. या कारखान्यांनी हे खत राज्यातील शेतकऱ्यांच्या माथी मारून खुलेआम लूट केली. याला जबाबदार असलेल्या कृषी आयुक्तालयातील गुणवत्ता नियंत्रण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.- अहवाल नकारात्मक आल्याने कृषी आयुक्तालयाने संबंधित कारखान्यांना नोटीस बजावून कारवाईची तयारी चालविली आहे. हे दर्जाहीन खत विकत घेतलेल्या हजारो शेतकऱ्यांची या कंपन्यांनी फसवणूक केली असून त्यांना पुन्हा मिश्र खतनिर्मितीची परवानगी देऊ नये, अशी मागणी कृषीतज्ज्ञांमधून होत आहे. अशी आहे नमुन्यांची स्थिती विभाग घेतलेले नमुनेफेल नमुनेपुणे १०२ ८९ नाशिक ६० ४८औरंगाबाद ९४ ९४अमरावती १५९ १४९कोल्हापूर १२९ १२८एकूण : ५४४ ५०८राज्यातील कारखाने विभागसंख्याठाणे ०२पुणे ३१नाशिक २२कोल्हापूर ४६औरंगाबाद १०लातूर १२अमरावती ०८नागपूर ०३एकूण १३४