शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

पळवाटा बिल्डरांच्या फायद्याच्या!

By admin | Updated: June 24, 2015 02:15 IST

युती सरकारने आणलेल्या गृहनिर्माण धोरणातील पळवाटा बिल्डरांच्या फायद्याच्या आहेत असे आक्षेप या विभागातील अधिकारीच घेत आहेत.

अतुल कुलकर्णी, मुंबईयुती सरकारने आणलेल्या गृहनिर्माण धोरणातील पळवाटा बिल्डरांच्या फायद्याच्या आहेत असे आक्षेप या विभागातील अधिकारीच घेत आहेत. एमएमआरडीच्या सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावरील योजनेचे पुनरुज्जीवन करून राज्यभर ही योजना राबवण्याची भूमिका या धोरणाने मांडली आहे; मात्र हे उघड उघड बिल्डरांचा फायदा करून देणारे नवे स्कॅम ठरेल असे अधिकाऱ्यांचे मत आहे.भाडेतत्त्वावरील घरांची यापूर्वीची योजना यशस्वी झालेली नाही. तसेच एमएमआरडीएने यापुढे ही योजना चालवू नये असे नगर विकास विभागाने कळवले असतानाही मुंबईसह सर्व महापालिकांमध्ये व नागरी क्षेत्रात अशा योजना राबवू असे या धोरणात म्हटले आहे. छोट्या शहरात जेथे लोकांना माफक दरात स्वत:च्या हक्काचे घर हवे असते तेथे भाड्याची घरे कोण घेणार? पण अशी घरे बांधणाऱ्या खाजगी बिल्डरांना त्या बदल्यात काही भाग व्यावसायिक तत्त्वावर दिल्यास ते नवेच दुकान सुरू होईल असेही तो अधिकारी म्हणाला. परवडणाऱ्या घरांच्या निर्माणासाठी माहिती तंत्रज्ञान सेवा निवासस्थाने केली जातील व त्यासाठी खाजगी बिल्डरांना प्रोत्साहन देण्यात येईल, शिवाय अशा योजनांना एकूण भूखंड क्षेत्राच्या किमान ३ ते ४ एफएसआय मंजूर केला जाईल आणि अशा सर्व प्रकल्पांना रेडी रेकनरच्या ६० टक्के शुल्क आकारून अतिरिक्त एफएसआय देण्यात येईल असे या धोरणात म्हटले आहे. याचा अर्थ सरळ सरळ बिल्डरांचा फायदा करून देण्यासारखे आहे; शिवाय नगर विकास विभागाने यापूर्वी निर्गमित केलेल्या आॅगस्ट २०१४ च्या अ‍ॅर्फोडेबल हाउसिंग स्कीम संदर्भातील अधिसूचनेमध्ये हा विषय घेण्यात आला होता. त्यापेक्षा ही योजना वेगळी आहे का? हेदेखील यात स्पष्ट केलेले नाही.म्हाडाच्या वसाहतीसाठी राज्यभर ३३ (९) लागू राहील असे या धोरणात म्हटले आहे; पण मुंबईतील ३३ (९)चे निकष राज्यभरातील इमारतींबाबत अंतिम करण्यापूर्वी त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीचा कोणताही विचार या धोरणात मांडला गेलेला नाही. याशिवाय स्मार्ट सिटी विकासामध्ये विकासकाने प्रकल्प अर्धवट सोडला तर त्याबाबत कोणतीही उपाययोजना नमूद करण्यात आलेली नाही. पायाभूत सुविधा देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेशच्या धर्तीवर एमएमआरडीएने पायाभूत सुविधा निधी संकलन, वितरण व विनियोग करण्याचे काम मुंबईबाहेरील कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या बळाअभावी कसे होणार याचे कोणतेही स्पष्टीकरण या धोरणातून होत नाही. कारण सध्या अशी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही.