शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

पळवाटा बिल्डरांच्या फायद्याच्या!

By admin | Updated: June 24, 2015 02:15 IST

युती सरकारने आणलेल्या गृहनिर्माण धोरणातील पळवाटा बिल्डरांच्या फायद्याच्या आहेत असे आक्षेप या विभागातील अधिकारीच घेत आहेत.

अतुल कुलकर्णी, मुंबईयुती सरकारने आणलेल्या गृहनिर्माण धोरणातील पळवाटा बिल्डरांच्या फायद्याच्या आहेत असे आक्षेप या विभागातील अधिकारीच घेत आहेत. एमएमआरडीच्या सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावरील योजनेचे पुनरुज्जीवन करून राज्यभर ही योजना राबवण्याची भूमिका या धोरणाने मांडली आहे; मात्र हे उघड उघड बिल्डरांचा फायदा करून देणारे नवे स्कॅम ठरेल असे अधिकाऱ्यांचे मत आहे.भाडेतत्त्वावरील घरांची यापूर्वीची योजना यशस्वी झालेली नाही. तसेच एमएमआरडीएने यापुढे ही योजना चालवू नये असे नगर विकास विभागाने कळवले असतानाही मुंबईसह सर्व महापालिकांमध्ये व नागरी क्षेत्रात अशा योजना राबवू असे या धोरणात म्हटले आहे. छोट्या शहरात जेथे लोकांना माफक दरात स्वत:च्या हक्काचे घर हवे असते तेथे भाड्याची घरे कोण घेणार? पण अशी घरे बांधणाऱ्या खाजगी बिल्डरांना त्या बदल्यात काही भाग व्यावसायिक तत्त्वावर दिल्यास ते नवेच दुकान सुरू होईल असेही तो अधिकारी म्हणाला. परवडणाऱ्या घरांच्या निर्माणासाठी माहिती तंत्रज्ञान सेवा निवासस्थाने केली जातील व त्यासाठी खाजगी बिल्डरांना प्रोत्साहन देण्यात येईल, शिवाय अशा योजनांना एकूण भूखंड क्षेत्राच्या किमान ३ ते ४ एफएसआय मंजूर केला जाईल आणि अशा सर्व प्रकल्पांना रेडी रेकनरच्या ६० टक्के शुल्क आकारून अतिरिक्त एफएसआय देण्यात येईल असे या धोरणात म्हटले आहे. याचा अर्थ सरळ सरळ बिल्डरांचा फायदा करून देण्यासारखे आहे; शिवाय नगर विकास विभागाने यापूर्वी निर्गमित केलेल्या आॅगस्ट २०१४ च्या अ‍ॅर्फोडेबल हाउसिंग स्कीम संदर्भातील अधिसूचनेमध्ये हा विषय घेण्यात आला होता. त्यापेक्षा ही योजना वेगळी आहे का? हेदेखील यात स्पष्ट केलेले नाही.म्हाडाच्या वसाहतीसाठी राज्यभर ३३ (९) लागू राहील असे या धोरणात म्हटले आहे; पण मुंबईतील ३३ (९)चे निकष राज्यभरातील इमारतींबाबत अंतिम करण्यापूर्वी त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीचा कोणताही विचार या धोरणात मांडला गेलेला नाही. याशिवाय स्मार्ट सिटी विकासामध्ये विकासकाने प्रकल्प अर्धवट सोडला तर त्याबाबत कोणतीही उपाययोजना नमूद करण्यात आलेली नाही. पायाभूत सुविधा देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेशच्या धर्तीवर एमएमआरडीएने पायाभूत सुविधा निधी संकलन, वितरण व विनियोग करण्याचे काम मुंबईबाहेरील कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या बळाअभावी कसे होणार याचे कोणतेही स्पष्टीकरण या धोरणातून होत नाही. कारण सध्या अशी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही.