शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बेरजेच्या राजकारणाची मुहूर्तमेढ

By admin | Updated: October 2, 2014 22:55 IST

सेनेच्या वाटय़ाला आलेत तिथे प्रतिस्पर्धी पक्षातील मातब्बर असंतुष्टांना सेनेची उमेदवारी बहाल करून प्रतिस्पध्र्यानाच जेरीस आणणारे बेरजेचे राजकारण शिवसेनाप्रमुखांनी केले.

नंदकुमार टेणी - ठाणो
जिथे शिवसेनेचा प्रभाव नाही परंतु, जे मतदारसंघ सेनेच्या वाटय़ाला आलेत तिथे प्रतिस्पर्धी पक्षातील मातब्बर असंतुष्टांना सेनेची उमेदवारी बहाल करून प्रतिस्पध्र्यानाच जेरीस आणणारे बेरजेचे राजकारण शिवसेनाप्रमुखांनी केले. रुपाली निलंगेकर आणि रजनी पाटील अशी त्याची उदाहरणो आहेत. परंतु, आपला 
बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात असे बेरजेचे राजकारण करण्याचा धाडसी प्रयोग शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे  यांनी ठाण्यात केला असून तो साकार करण्याची किमया जिल्हाप्रमुख व आमदार एकनाथ शिंदे यांनी करून दाखवली आहे. शिवसेनेच्या आजवरच्या राजकारणात हा अत्यंत महत्वाचा असा प्रयोग आहे.
केवळ निष्ठा या एकाच निकषावर मतांचे राजकारण करता येत नाही आणि सत्ताही मिळविता येत नाही. त्यासाठी निवडून येण्याची क्षमता हाच निकष सर्व पक्ष महत्वाचा मानतात. त्यानुसारच उमेदवारी देतात. काँग्रेस, राष्ट्रवादी यांनीही त्यासाठीच अन्य पक्षातून ठिकठिकाणी उमेदवार ठरू शकणारे नेते आपल्या पक्षात सामावून घेतले होते. त्यात या वेळी आघाडी आणि युती नसल्याने राजकीय आव्हान खूपच बदललेले होते. राजकारणात जो स्थितीनुसार बदलातो तोच टिकून राहतो. हे लक्षात घेऊनच मातोश्रींच्या अनुमतीने या भगव्या बेरजेच्या राजकारणाचा प्रयोग जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी केला. त्याचा शुभारंभ गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळीच झाला. त्यामुळेच प्रताप सरनाईकांसारखा मोहरा सेनेच्या हाती लागला. भाईंदर ते ओवळा-माजीवडा येथील भगव्याचे बस्तान त्यांनी कसे मजबूत केले हे ठाण्याने पाहिले आहे.  राजन विचारे खासदार झाल्यामुळे सेनेच्या वाटय़ाचा रिकामा झालेला मतदारसंघ निष्ठावंताला 
देण्याऐवजी तो कॉंग्रेसमधून सात नगरसेवकांसह शिवसेनेत 
अगदी अलीकडे आलेल्या रवी फाटक यांना देण्याची खेळी 
त्यातूनच साकारली आहे. निष्ठा महत्वाचीच परंतु, निवडणुकीचे अर्थकारण आणि त्यासोबत इतरही पात्रता या अधिक महत्त्वाच्या हे लक्षात घेऊनच ही खेळी खेळली गेली. 
 
4बंडखोर निष्ठावंताना मातोश्रीने बोलावून समजावण्याचा आणि पुरस्कृत करण्याचा जो पवित्र घेतला तोदेखील याच भगव्या बेरजेच्या राजकारणाचा एक भाग आहे. 
4सेनेच्या या प्रयोगाची धास्ती मित्रपक्ष असलेल्या भाजपापासून सगळ्य़ांनीच घेतली आहे. हा विस्तारीत प्रयोग यशस्वी झाला तर जिल्हाप्रमुख तसेच आमदार आणि जिल्हासंपर्क नेते एकनाथ शिंदे यांच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला जाणार आहे. 
4आता निवडून येण्याची क्षमता असलेल्यांना संधी आणि एकदा सत्ता आली की, निष्ठावंतांना त्या सत्तेत मानाचे पान अशीही खेळी यात दडलेली आहे.
 
राजकारणात जो स्थितीनुसार बदलतो तोच टिकून राहतो. हे लक्षात घेऊनच मातोश्रींच्या अनुमतीने या भगव्या बेरजेच्या राजकारणाचा प्रयोग जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी केला. त्याचा शुभारंभ गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळीच झाला.
 
आपला बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात असे बेरजेचे राजकारण करण्याचा धाडसी प्रयोग शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे  यांनी ठाण्यात केला असून तो साकार करण्याची किमया जिल्हाप्रमुख व आमदार एकनाथ शिंदे यांनी ओवळा-माजीवडय़ात करून दाखवली आहे.
 
4ही निवडणूक चारही पक्ष प्रचंड ईर्षेने लढविणार आहेत. त्यामुळे त्यात तुल्यबळ ठरणारा उमेदवार देणो आवश्यक होते. त्यातूनच हे बेरजेचे राजकारण साकारले.
4एकाच वेळी निष्ठावंताना चुचकारणो, त्यांचे सहकार्य निवडणुकीसाठी मिळविणो आणि त्याच वेळी शिवसेनेचे विधानसभेतले संख्याबळ जो वाढवू  शकेल अशाला सेनेत आणून उमेदवारी देणो असे एका दगडात दोन पक्षी मारणारे हे बेरजेचे राजकारण यशस्वी ठरले तर याच प्रयोगाचे अनुकरण राज्यात होईल त्याचे श्रेय जिल्हाप्रमुखांना मिळेल.