शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

बेरजेच्या राजकारणाची मुहूर्तमेढ

By admin | Updated: October 2, 2014 22:55 IST

सेनेच्या वाटय़ाला आलेत तिथे प्रतिस्पर्धी पक्षातील मातब्बर असंतुष्टांना सेनेची उमेदवारी बहाल करून प्रतिस्पध्र्यानाच जेरीस आणणारे बेरजेचे राजकारण शिवसेनाप्रमुखांनी केले.

नंदकुमार टेणी - ठाणो
जिथे शिवसेनेचा प्रभाव नाही परंतु, जे मतदारसंघ सेनेच्या वाटय़ाला आलेत तिथे प्रतिस्पर्धी पक्षातील मातब्बर असंतुष्टांना सेनेची उमेदवारी बहाल करून प्रतिस्पध्र्यानाच जेरीस आणणारे बेरजेचे राजकारण शिवसेनाप्रमुखांनी केले. रुपाली निलंगेकर आणि रजनी पाटील अशी त्याची उदाहरणो आहेत. परंतु, आपला 
बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात असे बेरजेचे राजकारण करण्याचा धाडसी प्रयोग शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे  यांनी ठाण्यात केला असून तो साकार करण्याची किमया जिल्हाप्रमुख व आमदार एकनाथ शिंदे यांनी करून दाखवली आहे. शिवसेनेच्या आजवरच्या राजकारणात हा अत्यंत महत्वाचा असा प्रयोग आहे.
केवळ निष्ठा या एकाच निकषावर मतांचे राजकारण करता येत नाही आणि सत्ताही मिळविता येत नाही. त्यासाठी निवडून येण्याची क्षमता हाच निकष सर्व पक्ष महत्वाचा मानतात. त्यानुसारच उमेदवारी देतात. काँग्रेस, राष्ट्रवादी यांनीही त्यासाठीच अन्य पक्षातून ठिकठिकाणी उमेदवार ठरू शकणारे नेते आपल्या पक्षात सामावून घेतले होते. त्यात या वेळी आघाडी आणि युती नसल्याने राजकीय आव्हान खूपच बदललेले होते. राजकारणात जो स्थितीनुसार बदलातो तोच टिकून राहतो. हे लक्षात घेऊनच मातोश्रींच्या अनुमतीने या भगव्या बेरजेच्या राजकारणाचा प्रयोग जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी केला. त्याचा शुभारंभ गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळीच झाला. त्यामुळेच प्रताप सरनाईकांसारखा मोहरा सेनेच्या हाती लागला. भाईंदर ते ओवळा-माजीवडा येथील भगव्याचे बस्तान त्यांनी कसे मजबूत केले हे ठाण्याने पाहिले आहे.  राजन विचारे खासदार झाल्यामुळे सेनेच्या वाटय़ाचा रिकामा झालेला मतदारसंघ निष्ठावंताला 
देण्याऐवजी तो कॉंग्रेसमधून सात नगरसेवकांसह शिवसेनेत 
अगदी अलीकडे आलेल्या रवी फाटक यांना देण्याची खेळी 
त्यातूनच साकारली आहे. निष्ठा महत्वाचीच परंतु, निवडणुकीचे अर्थकारण आणि त्यासोबत इतरही पात्रता या अधिक महत्त्वाच्या हे लक्षात घेऊनच ही खेळी खेळली गेली. 
 
4बंडखोर निष्ठावंताना मातोश्रीने बोलावून समजावण्याचा आणि पुरस्कृत करण्याचा जो पवित्र घेतला तोदेखील याच भगव्या बेरजेच्या राजकारणाचा एक भाग आहे. 
4सेनेच्या या प्रयोगाची धास्ती मित्रपक्ष असलेल्या भाजपापासून सगळ्य़ांनीच घेतली आहे. हा विस्तारीत प्रयोग यशस्वी झाला तर जिल्हाप्रमुख तसेच आमदार आणि जिल्हासंपर्क नेते एकनाथ शिंदे यांच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला जाणार आहे. 
4आता निवडून येण्याची क्षमता असलेल्यांना संधी आणि एकदा सत्ता आली की, निष्ठावंतांना त्या सत्तेत मानाचे पान अशीही खेळी यात दडलेली आहे.
 
राजकारणात जो स्थितीनुसार बदलतो तोच टिकून राहतो. हे लक्षात घेऊनच मातोश्रींच्या अनुमतीने या भगव्या बेरजेच्या राजकारणाचा प्रयोग जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी केला. त्याचा शुभारंभ गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळीच झाला.
 
आपला बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात असे बेरजेचे राजकारण करण्याचा धाडसी प्रयोग शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे  यांनी ठाण्यात केला असून तो साकार करण्याची किमया जिल्हाप्रमुख व आमदार एकनाथ शिंदे यांनी ओवळा-माजीवडय़ात करून दाखवली आहे.
 
4ही निवडणूक चारही पक्ष प्रचंड ईर्षेने लढविणार आहेत. त्यामुळे त्यात तुल्यबळ ठरणारा उमेदवार देणो आवश्यक होते. त्यातूनच हे बेरजेचे राजकारण साकारले.
4एकाच वेळी निष्ठावंताना चुचकारणो, त्यांचे सहकार्य निवडणुकीसाठी मिळविणो आणि त्याच वेळी शिवसेनेचे विधानसभेतले संख्याबळ जो वाढवू  शकेल अशाला सेनेत आणून उमेदवारी देणो असे एका दगडात दोन पक्षी मारणारे हे बेरजेचे राजकारण यशस्वी ठरले तर याच प्रयोगाचे अनुकरण राज्यात होईल त्याचे श्रेय जिल्हाप्रमुखांना मिळेल.