शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

बेरजेच्या राजकारणाची मुहूर्तमेढ

By admin | Updated: October 2, 2014 22:55 IST

सेनेच्या वाटय़ाला आलेत तिथे प्रतिस्पर्धी पक्षातील मातब्बर असंतुष्टांना सेनेची उमेदवारी बहाल करून प्रतिस्पध्र्यानाच जेरीस आणणारे बेरजेचे राजकारण शिवसेनाप्रमुखांनी केले.

नंदकुमार टेणी - ठाणो
जिथे शिवसेनेचा प्रभाव नाही परंतु, जे मतदारसंघ सेनेच्या वाटय़ाला आलेत तिथे प्रतिस्पर्धी पक्षातील मातब्बर असंतुष्टांना सेनेची उमेदवारी बहाल करून प्रतिस्पध्र्यानाच जेरीस आणणारे बेरजेचे राजकारण शिवसेनाप्रमुखांनी केले. रुपाली निलंगेकर आणि रजनी पाटील अशी त्याची उदाहरणो आहेत. परंतु, आपला 
बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात असे बेरजेचे राजकारण करण्याचा धाडसी प्रयोग शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे  यांनी ठाण्यात केला असून तो साकार करण्याची किमया जिल्हाप्रमुख व आमदार एकनाथ शिंदे यांनी करून दाखवली आहे. शिवसेनेच्या आजवरच्या राजकारणात हा अत्यंत महत्वाचा असा प्रयोग आहे.
केवळ निष्ठा या एकाच निकषावर मतांचे राजकारण करता येत नाही आणि सत्ताही मिळविता येत नाही. त्यासाठी निवडून येण्याची क्षमता हाच निकष सर्व पक्ष महत्वाचा मानतात. त्यानुसारच उमेदवारी देतात. काँग्रेस, राष्ट्रवादी यांनीही त्यासाठीच अन्य पक्षातून ठिकठिकाणी उमेदवार ठरू शकणारे नेते आपल्या पक्षात सामावून घेतले होते. त्यात या वेळी आघाडी आणि युती नसल्याने राजकीय आव्हान खूपच बदललेले होते. राजकारणात जो स्थितीनुसार बदलातो तोच टिकून राहतो. हे लक्षात घेऊनच मातोश्रींच्या अनुमतीने या भगव्या बेरजेच्या राजकारणाचा प्रयोग जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी केला. त्याचा शुभारंभ गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळीच झाला. त्यामुळेच प्रताप सरनाईकांसारखा मोहरा सेनेच्या हाती लागला. भाईंदर ते ओवळा-माजीवडा येथील भगव्याचे बस्तान त्यांनी कसे मजबूत केले हे ठाण्याने पाहिले आहे.  राजन विचारे खासदार झाल्यामुळे सेनेच्या वाटय़ाचा रिकामा झालेला मतदारसंघ निष्ठावंताला 
देण्याऐवजी तो कॉंग्रेसमधून सात नगरसेवकांसह शिवसेनेत 
अगदी अलीकडे आलेल्या रवी फाटक यांना देण्याची खेळी 
त्यातूनच साकारली आहे. निष्ठा महत्वाचीच परंतु, निवडणुकीचे अर्थकारण आणि त्यासोबत इतरही पात्रता या अधिक महत्त्वाच्या हे लक्षात घेऊनच ही खेळी खेळली गेली. 
 
4बंडखोर निष्ठावंताना मातोश्रीने बोलावून समजावण्याचा आणि पुरस्कृत करण्याचा जो पवित्र घेतला तोदेखील याच भगव्या बेरजेच्या राजकारणाचा एक भाग आहे. 
4सेनेच्या या प्रयोगाची धास्ती मित्रपक्ष असलेल्या भाजपापासून सगळ्य़ांनीच घेतली आहे. हा विस्तारीत प्रयोग यशस्वी झाला तर जिल्हाप्रमुख तसेच आमदार आणि जिल्हासंपर्क नेते एकनाथ शिंदे यांच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला जाणार आहे. 
4आता निवडून येण्याची क्षमता असलेल्यांना संधी आणि एकदा सत्ता आली की, निष्ठावंतांना त्या सत्तेत मानाचे पान अशीही खेळी यात दडलेली आहे.
 
राजकारणात जो स्थितीनुसार बदलतो तोच टिकून राहतो. हे लक्षात घेऊनच मातोश्रींच्या अनुमतीने या भगव्या बेरजेच्या राजकारणाचा प्रयोग जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी केला. त्याचा शुभारंभ गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळीच झाला.
 
आपला बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात असे बेरजेचे राजकारण करण्याचा धाडसी प्रयोग शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे  यांनी ठाण्यात केला असून तो साकार करण्याची किमया जिल्हाप्रमुख व आमदार एकनाथ शिंदे यांनी ओवळा-माजीवडय़ात करून दाखवली आहे.
 
4ही निवडणूक चारही पक्ष प्रचंड ईर्षेने लढविणार आहेत. त्यामुळे त्यात तुल्यबळ ठरणारा उमेदवार देणो आवश्यक होते. त्यातूनच हे बेरजेचे राजकारण साकारले.
4एकाच वेळी निष्ठावंताना चुचकारणो, त्यांचे सहकार्य निवडणुकीसाठी मिळविणो आणि त्याच वेळी शिवसेनेचे विधानसभेतले संख्याबळ जो वाढवू  शकेल अशाला सेनेत आणून उमेदवारी देणो असे एका दगडात दोन पक्षी मारणारे हे बेरजेचे राजकारण यशस्वी ठरले तर याच प्रयोगाचे अनुकरण राज्यात होईल त्याचे श्रेय जिल्हाप्रमुखांना मिळेल.