शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ‘प्लाझ्मा फ्रॅक्शनेशन प्लांट’

By admin | Updated: June 14, 2016 03:44 IST

राज्यात गेल्या पाच वर्षांत जनजागृतीमुळे ऐच्छिक रक्तदानाचा टक्का वाढला आहे. रक्ताची कमतरता भासत नसली तरीही रक्तघटकांची कमतरता आहे. त्यामुळेच रक्तघटक वेगळे

मुंबई: राज्यात गेल्या पाच वर्षांत जनजागृतीमुळे ऐच्छिक रक्तदानाचा टक्का वाढला आहे. रक्ताची कमतरता भासत नसली तरीही रक्तघटकांची कमतरता आहे. त्यामुळेच रक्तघटक वेगळे करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर पुण्यात ‘प्लाझ्मा फ्रॅक्शनेशन प्लाण्ट’ उभारला जाणार आहे. देशातील अशाप्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे. राज्यात इम्युनोग्लोबिन, अल्गोमीन, फॅक्टर ८ आणि ९ यांची गरज असते. पण, प्लाझ्मामधील हे घटक देशात वेगळे करणे शक्य होत नाही. त्यामुळे गरजेनुसार हे घटक परदेशातून मागवावे लागतात. त्यामुळे राज्यातच ‘प्लाझ्मा फ्रॅक्शनेशन प्लाण्ट’ उभारण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. पुण्यात हा प्लाण्ट उभा करण्यात येणार असल्याची माहिती राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. गिरीष चौधरी यांनी दिली. सध्या राज्यात जिल्हा स्तरावर ११ ठिकाणी रक्तघटक विलगीकरण केंद्र सुरू आहेत. राष्ट्रीय ग्रामीण योजनेंतर्गत २०७ ग्रामीण रुग्णालयात रक्त साठवण केंद्र आहेत. राज्यात ऐच्छिक रक्तदानाचा टक्का वाढत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या ११ कोटी २३ लाख इतकी आहे. अंदाजे लोकसंख्येच्या १ टक्का रक्ताची आवश्यकता असते. त्यामुळे राज्यात ११ लाख २३ हजार रक्त पिशव्यांची आवश्यकता आहे. पण, २०१५ साली १५ लाख ६६ हजार रक्तपिशव्या संकलित झाल्या. राज्यात सध्या रक्ताची गरज पूर्ण होत आहे. फक्त दिवाळी आणि उन्हाळ््याच्या सुटीत महाविद्यालये बंद असल्याने रक्ताची कमतरता भासते. पण, अशावेळी धार्मिक संघटनांना रक्तदानाचे आवाहन करण्यात येते, असे डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)मेट्रो रक्तपेढ्या राज्यात रक्त आणि रक्तघटकांचा पुरवठा सहज आणि सुलभरित्या करण्यासाठी राज्य शासनाने १० ठिकाणी ‘स्टेट आॅफ आर्ट’ रक्तपेढ्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा रुग्णालय, ठाणे, नाशिक, अहमदनगर, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, परभणी, जळगाव, सातारा आणि पुणे येथे स्वयंचलित मशीनद्वारे ब्लड गु्रपिंग, क्रॉस मॅचिंग करण्यात येणार आहे. त्याचबरोबर एलायझा टेस्टिंग करण्यात येणार आहे. राज्यात एकूण ३१८ रक्तपेढ्या आहेत. त्यापैकी मुंबईत ८० रक्तपेढ्या आहेत. राज्यातील एकूण रक्तपेढ्यांपैकी ४८ टक्के रक्तपेढ्या मुंबई, ठाणे, पुणे परिसरात आहेत. ग्रामीण भागात १४५ रक्त साठवणूक केंद्र आहेत.