शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

राज्यात ‘प्लाझ्मा फ्रॅक्शनेशन प्लांट’

By admin | Updated: June 14, 2016 03:44 IST

राज्यात गेल्या पाच वर्षांत जनजागृतीमुळे ऐच्छिक रक्तदानाचा टक्का वाढला आहे. रक्ताची कमतरता भासत नसली तरीही रक्तघटकांची कमतरता आहे. त्यामुळेच रक्तघटक वेगळे

मुंबई: राज्यात गेल्या पाच वर्षांत जनजागृतीमुळे ऐच्छिक रक्तदानाचा टक्का वाढला आहे. रक्ताची कमतरता भासत नसली तरीही रक्तघटकांची कमतरता आहे. त्यामुळेच रक्तघटक वेगळे करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर पुण्यात ‘प्लाझ्मा फ्रॅक्शनेशन प्लाण्ट’ उभारला जाणार आहे. देशातील अशाप्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे. राज्यात इम्युनोग्लोबिन, अल्गोमीन, फॅक्टर ८ आणि ९ यांची गरज असते. पण, प्लाझ्मामधील हे घटक देशात वेगळे करणे शक्य होत नाही. त्यामुळे गरजेनुसार हे घटक परदेशातून मागवावे लागतात. त्यामुळे राज्यातच ‘प्लाझ्मा फ्रॅक्शनेशन प्लाण्ट’ उभारण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. पुण्यात हा प्लाण्ट उभा करण्यात येणार असल्याची माहिती राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. गिरीष चौधरी यांनी दिली. सध्या राज्यात जिल्हा स्तरावर ११ ठिकाणी रक्तघटक विलगीकरण केंद्र सुरू आहेत. राष्ट्रीय ग्रामीण योजनेंतर्गत २०७ ग्रामीण रुग्णालयात रक्त साठवण केंद्र आहेत. राज्यात ऐच्छिक रक्तदानाचा टक्का वाढत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या ११ कोटी २३ लाख इतकी आहे. अंदाजे लोकसंख्येच्या १ टक्का रक्ताची आवश्यकता असते. त्यामुळे राज्यात ११ लाख २३ हजार रक्त पिशव्यांची आवश्यकता आहे. पण, २०१५ साली १५ लाख ६६ हजार रक्तपिशव्या संकलित झाल्या. राज्यात सध्या रक्ताची गरज पूर्ण होत आहे. फक्त दिवाळी आणि उन्हाळ््याच्या सुटीत महाविद्यालये बंद असल्याने रक्ताची कमतरता भासते. पण, अशावेळी धार्मिक संघटनांना रक्तदानाचे आवाहन करण्यात येते, असे डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)मेट्रो रक्तपेढ्या राज्यात रक्त आणि रक्तघटकांचा पुरवठा सहज आणि सुलभरित्या करण्यासाठी राज्य शासनाने १० ठिकाणी ‘स्टेट आॅफ आर्ट’ रक्तपेढ्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा रुग्णालय, ठाणे, नाशिक, अहमदनगर, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, परभणी, जळगाव, सातारा आणि पुणे येथे स्वयंचलित मशीनद्वारे ब्लड गु्रपिंग, क्रॉस मॅचिंग करण्यात येणार आहे. त्याचबरोबर एलायझा टेस्टिंग करण्यात येणार आहे. राज्यात एकूण ३१८ रक्तपेढ्या आहेत. त्यापैकी मुंबईत ८० रक्तपेढ्या आहेत. राज्यातील एकूण रक्तपेढ्यांपैकी ४८ टक्के रक्तपेढ्या मुंबई, ठाणे, पुणे परिसरात आहेत. ग्रामीण भागात १४५ रक्त साठवणूक केंद्र आहेत.