शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

राज्यात ‘प्लाझ्मा फ्रॅक्शनेशन प्लांट’

By admin | Updated: June 14, 2016 03:44 IST

राज्यात गेल्या पाच वर्षांत जनजागृतीमुळे ऐच्छिक रक्तदानाचा टक्का वाढला आहे. रक्ताची कमतरता भासत नसली तरीही रक्तघटकांची कमतरता आहे. त्यामुळेच रक्तघटक वेगळे

मुंबई: राज्यात गेल्या पाच वर्षांत जनजागृतीमुळे ऐच्छिक रक्तदानाचा टक्का वाढला आहे. रक्ताची कमतरता भासत नसली तरीही रक्तघटकांची कमतरता आहे. त्यामुळेच रक्तघटक वेगळे करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर पुण्यात ‘प्लाझ्मा फ्रॅक्शनेशन प्लाण्ट’ उभारला जाणार आहे. देशातील अशाप्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे. राज्यात इम्युनोग्लोबिन, अल्गोमीन, फॅक्टर ८ आणि ९ यांची गरज असते. पण, प्लाझ्मामधील हे घटक देशात वेगळे करणे शक्य होत नाही. त्यामुळे गरजेनुसार हे घटक परदेशातून मागवावे लागतात. त्यामुळे राज्यातच ‘प्लाझ्मा फ्रॅक्शनेशन प्लाण्ट’ उभारण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. पुण्यात हा प्लाण्ट उभा करण्यात येणार असल्याची माहिती राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. गिरीष चौधरी यांनी दिली. सध्या राज्यात जिल्हा स्तरावर ११ ठिकाणी रक्तघटक विलगीकरण केंद्र सुरू आहेत. राष्ट्रीय ग्रामीण योजनेंतर्गत २०७ ग्रामीण रुग्णालयात रक्त साठवण केंद्र आहेत. राज्यात ऐच्छिक रक्तदानाचा टक्का वाढत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या ११ कोटी २३ लाख इतकी आहे. अंदाजे लोकसंख्येच्या १ टक्का रक्ताची आवश्यकता असते. त्यामुळे राज्यात ११ लाख २३ हजार रक्त पिशव्यांची आवश्यकता आहे. पण, २०१५ साली १५ लाख ६६ हजार रक्तपिशव्या संकलित झाल्या. राज्यात सध्या रक्ताची गरज पूर्ण होत आहे. फक्त दिवाळी आणि उन्हाळ््याच्या सुटीत महाविद्यालये बंद असल्याने रक्ताची कमतरता भासते. पण, अशावेळी धार्मिक संघटनांना रक्तदानाचे आवाहन करण्यात येते, असे डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)मेट्रो रक्तपेढ्या राज्यात रक्त आणि रक्तघटकांचा पुरवठा सहज आणि सुलभरित्या करण्यासाठी राज्य शासनाने १० ठिकाणी ‘स्टेट आॅफ आर्ट’ रक्तपेढ्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा रुग्णालय, ठाणे, नाशिक, अहमदनगर, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, परभणी, जळगाव, सातारा आणि पुणे येथे स्वयंचलित मशीनद्वारे ब्लड गु्रपिंग, क्रॉस मॅचिंग करण्यात येणार आहे. त्याचबरोबर एलायझा टेस्टिंग करण्यात येणार आहे. राज्यात एकूण ३१८ रक्तपेढ्या आहेत. त्यापैकी मुंबईत ८० रक्तपेढ्या आहेत. राज्यातील एकूण रक्तपेढ्यांपैकी ४८ टक्के रक्तपेढ्या मुंबई, ठाणे, पुणे परिसरात आहेत. ग्रामीण भागात १४५ रक्त साठवणूक केंद्र आहेत.