शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

पर्यटनस्थळांवर लागणार फलक

By admin | Updated: November 7, 2016 06:39 IST

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबापुरीचे सर्वांनाच आकर्षण वाटते. मुंबई प्रेक्षणीय स्थळांमुळे आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या स्थळांमुळेही प्रसिद्ध आहे.

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबापुरीचे सर्वांनाच आकर्षण वाटते. मुंबई प्रेक्षणीय स्थळांमुळे आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या स्थळांमुळेही प्रसिद्ध आहे. रोज शेकडो पर्यटक या प्रेक्षणीय स्थळांना आणि ऐतिहासिक वास्तूंना भेटी देत असतात. नागरिकांनी आणि पर्यटकांनी या स्थळांविषयीची इत्थंभूत माहिती मिळावी, म्हणून या ठिकाणी माहिती फलक लावण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.महापालिकेत झालेल्या बैठकीत आयुक्त अजय मेहता यांनी पर्यटन स्थळांवर माहिती फलक लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबईतील पर्यटनाला नक्कीच फायदा होईल. स्मार्ट सिटी म्हणून मुंबईचा विकास व्हावा, म्हणून सध्या प्लॅनिंग सुरू आहे. अन्य राज्यात आणि परदेशातील प्रेक्षणीय स्थळांवर अथवा ऐतिहासिक वास्तूंना भेट दिल्यावर त्या ठिकाणी लावलेल्या फलकांवर त्या स्थळांची माहिती लिहिलेली असते, पण मुंबईत पर्यटक अथवा नागरिक फिरतात, तेव्हा त्यांना त्या स्थळाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी गाइडची आवश्यकता लागते. मुंबईतील गेट वे आॅफ इंडिया, कमला नेहरू पार्क, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, राजाबाई टॉवर, टाउन हॉल, छोटा काश्मीर, जुहू चौपाटी, नरिमन पॉइंट, नेहरु विज्ञान केंद्र, नेहरु तारांगण अशा ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते, पण अनेक ठिकाणांवर माहिती फलक नसल्याने, त्या स्थळाविषयी पर्यटक, नागरिकांना माहिती मिळत नाही. ऐतिहासिक वास्तूंवरही हे फलक लावण्यात येणार आहेत. नावासह माहिती फलक लावल्यामुळे त्याचा पर्यटकांना फायदा होणार आहे. यापुढे मुंबईतील पर्यटन आणि ऐतिहासिक वास्तू पाहताना त्याचा इतिहास व महत्त्व समजणार आहे. (प्रतिनिधी)