शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या रक्षा विसर्जना ऐवजी वृक्षारोपण

By admin | Updated: March 17, 2017 19:25 IST

रक्षविसर्जनाच्या विधींमुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी धनगाव (ता. पलूस) येथील साळुंखे परिवाराने धाडसी पाऊल उचलले.

ऑनलाइन लोकमत 
भिलवडी, दि. 17 - जन्माबरोबर मृत्यूही अटळ आहे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. मात्र मृत्यूनंतर अंत्यसंस्कार आणि रक्षविसर्जनाच्या विधींमुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी धनगाव (ता. पलूस) येथील साळुंखे परिवाराने धाडसी पाऊल उचलले. रक्षांचे विसर्जन कृष्णा नदीपात्रात न करता, दोन खड्ड्यात रक्षा ठेवून त्यामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
 
धनगावचे माजी उपसरपंच संभाजी साळुंखे यांच्या पत्नी व साहित्यभूषण म. भा. भोसले सार्वजनिक वाचनालयाच्या संचालिका सौ. सरिता साळुंखे यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. केवळ दहा वर्षांचा संसार आणि पहिलीत शिकणारा मुलगा पदरी. सरिता यांच्या मृत्यूमुळे या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
 
कृष्णेच्या पात्रात रक्षाविसर्जन केल्याने होणारे जलप्रदूषण रोखावे, यासाठी रक्षा नदीत विसर्जित न करण्याबाबत गावातील तरुण मंडळींनी पुढाकार घेतला. संभाजी साळुंखे व त्यांच्या परिवाराने सहमती दर्शविली. हा निर्णय ज्येष्ठांच्या कानावर घातला. या परिसरात अशा पद्धतीने प्रथमच रक्षाविसर्जन होत आहे, ही गोष्ट समाज कितपत स्वीकारेल, याबाबत शंका होती. पण परंपरेच्या अंधानुकरणापेक्षाही जलप्रदूषण रोखणे महत्त्वाचे असल्याचा विचार मराठा समाजाने केला. धनगाव ग्रामपंचायतीने वृक्षांची उपलब्धता करून दिली. दोन खड्ड्यांत रक्षा ठेवून त्यात दोन वृक्षांची लागवड करून, पसायदान म्हणण्यात आले.
 
सातत्य ठेवणार
धनगावमधील नागरिक आता अशाच पद्धतीने कृष्णा नदीघाटावर वृक्षारोपण करून, जलप्रदूषण रोखून पर्यावरणाचा समतोल राखण्यात सातत्य ठेवणार आहेत.
 
मरावे परि वृक्षरूपी उरावे...
पत्नीची आठवण वृक्षाच्या माध्यमातून चिरंतन टिकविण्यासाठी हा निर्णय घेतला असून, या झाडांचे संगोपनही परिवाराच्यावतीने करण्यात येईल.
- संभाजी साळुंखे, धनगाव