शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पत्नीच्या रक्षा विसर्जना ऐवजी वृक्षारोपण

By admin | Updated: March 17, 2017 19:25 IST

रक्षविसर्जनाच्या विधींमुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी धनगाव (ता. पलूस) येथील साळुंखे परिवाराने धाडसी पाऊल उचलले.

ऑनलाइन लोकमत 
भिलवडी, दि. 17 - जन्माबरोबर मृत्यूही अटळ आहे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. मात्र मृत्यूनंतर अंत्यसंस्कार आणि रक्षविसर्जनाच्या विधींमुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी धनगाव (ता. पलूस) येथील साळुंखे परिवाराने धाडसी पाऊल उचलले. रक्षांचे विसर्जन कृष्णा नदीपात्रात न करता, दोन खड्ड्यात रक्षा ठेवून त्यामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
 
धनगावचे माजी उपसरपंच संभाजी साळुंखे यांच्या पत्नी व साहित्यभूषण म. भा. भोसले सार्वजनिक वाचनालयाच्या संचालिका सौ. सरिता साळुंखे यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. केवळ दहा वर्षांचा संसार आणि पहिलीत शिकणारा मुलगा पदरी. सरिता यांच्या मृत्यूमुळे या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
 
कृष्णेच्या पात्रात रक्षाविसर्जन केल्याने होणारे जलप्रदूषण रोखावे, यासाठी रक्षा नदीत विसर्जित न करण्याबाबत गावातील तरुण मंडळींनी पुढाकार घेतला. संभाजी साळुंखे व त्यांच्या परिवाराने सहमती दर्शविली. हा निर्णय ज्येष्ठांच्या कानावर घातला. या परिसरात अशा पद्धतीने प्रथमच रक्षाविसर्जन होत आहे, ही गोष्ट समाज कितपत स्वीकारेल, याबाबत शंका होती. पण परंपरेच्या अंधानुकरणापेक्षाही जलप्रदूषण रोखणे महत्त्वाचे असल्याचा विचार मराठा समाजाने केला. धनगाव ग्रामपंचायतीने वृक्षांची उपलब्धता करून दिली. दोन खड्ड्यांत रक्षा ठेवून त्यात दोन वृक्षांची लागवड करून, पसायदान म्हणण्यात आले.
 
सातत्य ठेवणार
धनगावमधील नागरिक आता अशाच पद्धतीने कृष्णा नदीघाटावर वृक्षारोपण करून, जलप्रदूषण रोखून पर्यावरणाचा समतोल राखण्यात सातत्य ठेवणार आहेत.
 
मरावे परि वृक्षरूपी उरावे...
पत्नीची आठवण वृक्षाच्या माध्यमातून चिरंतन टिकविण्यासाठी हा निर्णय घेतला असून, या झाडांचे संगोपनही परिवाराच्यावतीने करण्यात येईल.
- संभाजी साळुंखे, धनगाव