शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

पत्नीच्या रक्षा विसर्जना ऐवजी वृक्षारोपण

By admin | Updated: March 17, 2017 19:25 IST

रक्षविसर्जनाच्या विधींमुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी धनगाव (ता. पलूस) येथील साळुंखे परिवाराने धाडसी पाऊल उचलले.

ऑनलाइन लोकमत 
भिलवडी, दि. 17 - जन्माबरोबर मृत्यूही अटळ आहे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. मात्र मृत्यूनंतर अंत्यसंस्कार आणि रक्षविसर्जनाच्या विधींमुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी धनगाव (ता. पलूस) येथील साळुंखे परिवाराने धाडसी पाऊल उचलले. रक्षांचे विसर्जन कृष्णा नदीपात्रात न करता, दोन खड्ड्यात रक्षा ठेवून त्यामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
 
धनगावचे माजी उपसरपंच संभाजी साळुंखे यांच्या पत्नी व साहित्यभूषण म. भा. भोसले सार्वजनिक वाचनालयाच्या संचालिका सौ. सरिता साळुंखे यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. केवळ दहा वर्षांचा संसार आणि पहिलीत शिकणारा मुलगा पदरी. सरिता यांच्या मृत्यूमुळे या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
 
कृष्णेच्या पात्रात रक्षाविसर्जन केल्याने होणारे जलप्रदूषण रोखावे, यासाठी रक्षा नदीत विसर्जित न करण्याबाबत गावातील तरुण मंडळींनी पुढाकार घेतला. संभाजी साळुंखे व त्यांच्या परिवाराने सहमती दर्शविली. हा निर्णय ज्येष्ठांच्या कानावर घातला. या परिसरात अशा पद्धतीने प्रथमच रक्षाविसर्जन होत आहे, ही गोष्ट समाज कितपत स्वीकारेल, याबाबत शंका होती. पण परंपरेच्या अंधानुकरणापेक्षाही जलप्रदूषण रोखणे महत्त्वाचे असल्याचा विचार मराठा समाजाने केला. धनगाव ग्रामपंचायतीने वृक्षांची उपलब्धता करून दिली. दोन खड्ड्यांत रक्षा ठेवून त्यात दोन वृक्षांची लागवड करून, पसायदान म्हणण्यात आले.
 
सातत्य ठेवणार
धनगावमधील नागरिक आता अशाच पद्धतीने कृष्णा नदीघाटावर वृक्षारोपण करून, जलप्रदूषण रोखून पर्यावरणाचा समतोल राखण्यात सातत्य ठेवणार आहेत.
 
मरावे परि वृक्षरूपी उरावे...
पत्नीची आठवण वृक्षाच्या माध्यमातून चिरंतन टिकविण्यासाठी हा निर्णय घेतला असून, या झाडांचे संगोपनही परिवाराच्यावतीने करण्यात येईल.
- संभाजी साळुंखे, धनगाव