शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

नियोजनबद्ध काम सुरू - राम शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:28 IST

औरंगाबाद येथे जलसंधारण आयुक्तालय सुरू करताना ते उत्तम प्रकारे कार्यान्वित करण्यासाठी काय योजना आहे, या राजेंद्र दर्डा यांनी टाकलेल्या गुगलीवर राम

औरंगाबाद येथे जलसंधारण आयुक्तालय सुरू करताना ते उत्तम प्रकारे कार्यान्वित करण्यासाठी काय योजना आहे, या राजेंद्र दर्डा यांनी टाकलेल्या गुगलीवर राम शिंदे यांनी सफाईदारपणे उत्तर दिले. शिंदे म्हणाले की, दिवंगत मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी या खात्याची निर्मिती केली. २५ वर्षांपर्यंत या खात्याला स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा नव्हती. मुख्यमंत्र्यांनी या खात्याचे नाव बदली करत मृद व जलसंधारण विभाग केले. त्यामुळे १६ हजार ४७९ स्वतंत्र आस्थापने निर्माण करत औरंगाबाद येथे त्याचे आयुक्तालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. वाल्मी या आॅटोनॉमस बॉडीच्या ठिकाणीच आयुक्तालयाचे कार्यालय उघडले. त्या ठिकाणी एक वरिष्ठ सनदी अधिकारी नेमण्याचे कॅबिनेट नोटमध्ये नमूद केले आहे. जलसंधारणाची कामे जलशिवार योजनेतून सुरू आहेत. आयुक्तालयाचा चार्ज संचालकांना दिला आहे. १५ जुलैपर्यंत विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईल. जलयुक्त शिवाराचा गवगवा झाल्यानंतर आता त्याचा उत्साह कमी झाला आहे का, या प्रश्नावर राम शिंदे म्हणाले की, सलग तीन वर्षे दुष्काळ पडल्याने खूप कामे झाली. दोन वर्षे खूप कामे झाल्यावर पाऊस पडल्याने कामाचा वाव कमी झाला आहे. प्रशासकीय पातळीवर संपूर्ण नियोजन झालेले आहे. आता नियोजनबद्ध काम सुरू असून मुख्यमंत्री व मी स्वत: त्याचा आढावा घेत असतो. पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी दरवर्षी ५ हजार गावांनुसार २५ हजार गावांतील दुष्काळ संपुष्टात आणण्याच्या दृष्टीतून सरकार पातळीवर बारकाईने आढावा घेतला जातो. १५ दिवसांनी उच्च अधिकार समिती रिपोर्ट करत असते. काम वेळेत पूर्ण करण्यासाठी विशेष निधीही दिलेला आहे.