शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘वन महोत्सवा’चे नियोजन कोलमडले

By admin | Updated: June 28, 2016 01:18 IST

शासनाच्या महसूल व वन विभागांचा ‘वन महोत्सव’ वृक्षलागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम अवघ्या ४ दिवसांवर येऊन ठेपला आहे.

इंदापूर : शासनाच्या महसूल व वन विभागांचा ‘वन महोत्सव’ वृक्षलागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम अवघ्या ४ दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, तहसील कार्यालय, सामाजिक वनीकरण विभाग वा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तो तितकासा महत्त्वाचा वाटत नसल्याने त्याचे नियोजन आत्ताच कोलमडून गेल्याचे प्रत्यक्ष पाहणीनंतरचे चित्र आहे.वैश्विक उष्णतेत होणारी वाढ, हवामानातील बदल यांच्यातील तीव्रता, परिणामकारक कमी करण्याचा एक भाग म्हणून १ ते ७ जुलैदरम्यान राज्यात दोन कोटी वृक्षलागवड करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘वन महोत्सवा’चे आयोजन केले आहे. दि. ३१ मार्च रोजी घेतलेल्या शासन निर्णयात राज्यापासून ग्रामीण भागापर्यंतचे सर्व नियोजन व्यवस्थित आखण्यात आले आहे. तहसील कार्यालय, सामाजिक वनीकरण व वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे, वन महोत्सवासंदर्भात तालुक्याला दिलेल्या उद्दिष्टाची धड आकडेवारी नव्हती. तहसीलदार वर्षा लांडगे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी लिपिक राहुल पारेकर यांच्याकडे माहिती आहे, असे सांगितले. पारेकर यांनी बारामतीचे लागवड अधिकारी रा. ह. झगडे यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. झगडे यांनी इंदापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. सातपुते हे समन्वयक म्हणून काम करीत आहेत, असे सांगून जबाबदारी झटकली. सातपुते एका माहिती अधिकारातील अपिलाच्या सुनावणीसाठी पुण्यात होते. त्यांनी इंदापूरच्या सामाजिक वनीकरण विभागातील लिपिकाशी संपर्क साधावा, असे सांगितले. हा लिपिक त्याच्या मॅडम रजेवर असल्याने काम करून त्रस्त झाला होता. त्याला त्यामुळे उद्दिष्टाची आकडेवारीच सापडेना. तालुकास्तरावर भयावह दुष्काळी परिस्थितीत या योजनेकरिता रोपे कुठून आणायची, हा यक्षप्रश्न आहे. इंदापूर तालुक्यापुरता विचार केला, तर तालुक्यात तरंगवाडी व कांदलगाव या ठिकाणी शासकीय रोपवाटिका आहेत. त्यांपैकी तरंगवाडी येथील रोपवाटिकेमधील दोन शेडनेटपैकी एकीमध्ये एकही रोप नाही. उन्हाळ्यातील कमालीची उष्णता, रखरखीत दुष्काळ, पाण्याची कमतरता यांमुळे रोपे तयार करता आली नाहीत. जी तयार झाली, ती जळून गेली हे वास्तव्य आहे. राज्यस्तरीय महोत्सव असल्याने सर्वांकडूनच रोपांची मागणी होणार; मात्र आडातच नाही तर पोहऱ्यात कोठून येणार? असा प्रकार झाला असल्याने वन महोत्सवाच्या प्रत्यक्षातील यशस्वितेबद्दल साशंकताच वाटत आहे. (वार्ताहर)सर्व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्थांना या महोत्सवात सहभागी करून घेण्यात आले आहे. नियोजनाकरिता, राज्य स्तरावर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली, तर जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समिती नेमण्यात आली आहे.दोन महिन्यांचा दीर्घ कालावधी हातात असूनदेखील ग्रामीण भागातील शासन यंत्रणेमध्ये एक प्रकारची अनास्था असल्याने अपवाद वगळता ‘शासकीय कर्तव्य’ म्हणूनदेखील जबाबदारी पार पाडण्यास अधिकारी व कर्मचारी तयार नसल्याचे आज दिसून आले.