शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

‘वन महोत्सवा’चे नियोजन कोलमडले

By admin | Updated: June 28, 2016 01:18 IST

शासनाच्या महसूल व वन विभागांचा ‘वन महोत्सव’ वृक्षलागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम अवघ्या ४ दिवसांवर येऊन ठेपला आहे.

इंदापूर : शासनाच्या महसूल व वन विभागांचा ‘वन महोत्सव’ वृक्षलागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम अवघ्या ४ दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, तहसील कार्यालय, सामाजिक वनीकरण विभाग वा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तो तितकासा महत्त्वाचा वाटत नसल्याने त्याचे नियोजन आत्ताच कोलमडून गेल्याचे प्रत्यक्ष पाहणीनंतरचे चित्र आहे.वैश्विक उष्णतेत होणारी वाढ, हवामानातील बदल यांच्यातील तीव्रता, परिणामकारक कमी करण्याचा एक भाग म्हणून १ ते ७ जुलैदरम्यान राज्यात दोन कोटी वृक्षलागवड करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘वन महोत्सवा’चे आयोजन केले आहे. दि. ३१ मार्च रोजी घेतलेल्या शासन निर्णयात राज्यापासून ग्रामीण भागापर्यंतचे सर्व नियोजन व्यवस्थित आखण्यात आले आहे. तहसील कार्यालय, सामाजिक वनीकरण व वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे, वन महोत्सवासंदर्भात तालुक्याला दिलेल्या उद्दिष्टाची धड आकडेवारी नव्हती. तहसीलदार वर्षा लांडगे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी लिपिक राहुल पारेकर यांच्याकडे माहिती आहे, असे सांगितले. पारेकर यांनी बारामतीचे लागवड अधिकारी रा. ह. झगडे यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. झगडे यांनी इंदापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. सातपुते हे समन्वयक म्हणून काम करीत आहेत, असे सांगून जबाबदारी झटकली. सातपुते एका माहिती अधिकारातील अपिलाच्या सुनावणीसाठी पुण्यात होते. त्यांनी इंदापूरच्या सामाजिक वनीकरण विभागातील लिपिकाशी संपर्क साधावा, असे सांगितले. हा लिपिक त्याच्या मॅडम रजेवर असल्याने काम करून त्रस्त झाला होता. त्याला त्यामुळे उद्दिष्टाची आकडेवारीच सापडेना. तालुकास्तरावर भयावह दुष्काळी परिस्थितीत या योजनेकरिता रोपे कुठून आणायची, हा यक्षप्रश्न आहे. इंदापूर तालुक्यापुरता विचार केला, तर तालुक्यात तरंगवाडी व कांदलगाव या ठिकाणी शासकीय रोपवाटिका आहेत. त्यांपैकी तरंगवाडी येथील रोपवाटिकेमधील दोन शेडनेटपैकी एकीमध्ये एकही रोप नाही. उन्हाळ्यातील कमालीची उष्णता, रखरखीत दुष्काळ, पाण्याची कमतरता यांमुळे रोपे तयार करता आली नाहीत. जी तयार झाली, ती जळून गेली हे वास्तव्य आहे. राज्यस्तरीय महोत्सव असल्याने सर्वांकडूनच रोपांची मागणी होणार; मात्र आडातच नाही तर पोहऱ्यात कोठून येणार? असा प्रकार झाला असल्याने वन महोत्सवाच्या प्रत्यक्षातील यशस्वितेबद्दल साशंकताच वाटत आहे. (वार्ताहर)सर्व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्थांना या महोत्सवात सहभागी करून घेण्यात आले आहे. नियोजनाकरिता, राज्य स्तरावर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली, तर जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समिती नेमण्यात आली आहे.दोन महिन्यांचा दीर्घ कालावधी हातात असूनदेखील ग्रामीण भागातील शासन यंत्रणेमध्ये एक प्रकारची अनास्था असल्याने अपवाद वगळता ‘शासकीय कर्तव्य’ म्हणूनदेखील जबाबदारी पार पाडण्यास अधिकारी व कर्मचारी तयार नसल्याचे आज दिसून आले.