शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
4
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
5
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
6
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
7
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
8
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
9
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
10
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
11
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
12
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
13
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
14
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
15
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
16
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
17
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
18
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
19
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी

शेतकऱ्यांच्या नियोजित संपात फूट

By admin | Updated: May 17, 2017 01:29 IST

शेतकऱ्यांनी १ जून रोजी राज्यव्यापी संप पुकारला असून, त्यामध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई/औरंगाबाद : शेतकऱ्यांनी १ जून रोजी राज्यव्यापी संप पुकारला असून, त्यामध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर, नियोजित संपातून माघार घेतली आहे. मात्र, इतर जिल्ह्यांतील शेतकरी संपावर ठाम असल्याचे किसान क्रांतीने म्हटले आहे. या संदर्भात बुधवारी औरंगाबादेत राज्यव्यापी बैठक होत आहे.शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोफत वीज द्यावी. मालाला योग्य हमीभाव मिळावा आदी मागण्यांसाठी १ जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय ४० गावांतील शेतकऱ्यांनी घेतला होता. पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांनी फडणवीस यांच्याशी मंगळवारी मुंबईत तासभर चर्चा केली. एक कोटीहून अधिक शेतकरी नियमितपणे कर्ज भरणारे आहेत. ३१ लाख शेतकऱ्यांचे कर्ज काही ना काही कारणाने थकीत आहे. त्यामुळे या दोन्ही घटकांसाठी योजना तयार करण्याचे काम सरकार करीत आहे. योजना लवकरच जाहीर होईल, यापूर्वीही कर्जमाफी झाली, परंतु शेतकरी पुन्हा कर्जात गेला. शेतीच्या क्षेत्रात गुंतवणुकीला प्राथमिकता असल्याचे मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले. धनंजय धनवटे, सुभाष वहाडणे, विजय धनवटे आदी शेतकऱ्यांनी कांदा निर्यातीसाठी केंद्र सरकारकडे चर्चा करा, १ जूनपूर्वी हमीभाव जाहीर करण्याच्या मागण्या केल्या. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेअंती संप स्थगित करण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांनी जाहीर केले. पुणतांबा म्हणजे राज्य नव्हे!शेतकरी संप मोहीम तथा किसान क्रांतीचे राज्य समन्वयक जयाजीराव सूर्यवंशी म्हणाले, ‘शेतकरी संघटनांमध्ये कुठलीही फूट पडलेली नाही. पुणतांबा येथील शेतकरी म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी नाहीत. विरोधी पक्षनेते डॉ. राधाकृष्ण विखे यांना हाताशी धरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी संपात फूट पाडण्याचा प्रयत्न केला,’ असा आरोपही त्यांनी केला. ४० ते ५० शेतकरी संघटनांनी एकत्रित येऊन हा संप पुकारला आहे. मुख्यमंत्र्यांचा फूट पाडण्याचा डाव हाणून पाडला जाईल. मुख्यमंत्र्यांनी संप समन्वय समितीशी चर्चा करणे अपेक्षित होते, परंतु त्यांनी तसे केले नाही. विरोधक आणि सत्ताधारी सोबत असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. बुधवारी सकाळी औरंगाबादला राज्यव्यापी बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा होईल.