शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या नियोजित संपात फूट

By admin | Updated: May 17, 2017 01:29 IST

शेतकऱ्यांनी १ जून रोजी राज्यव्यापी संप पुकारला असून, त्यामध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई/औरंगाबाद : शेतकऱ्यांनी १ जून रोजी राज्यव्यापी संप पुकारला असून, त्यामध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर, नियोजित संपातून माघार घेतली आहे. मात्र, इतर जिल्ह्यांतील शेतकरी संपावर ठाम असल्याचे किसान क्रांतीने म्हटले आहे. या संदर्भात बुधवारी औरंगाबादेत राज्यव्यापी बैठक होत आहे.शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोफत वीज द्यावी. मालाला योग्य हमीभाव मिळावा आदी मागण्यांसाठी १ जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय ४० गावांतील शेतकऱ्यांनी घेतला होता. पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांनी फडणवीस यांच्याशी मंगळवारी मुंबईत तासभर चर्चा केली. एक कोटीहून अधिक शेतकरी नियमितपणे कर्ज भरणारे आहेत. ३१ लाख शेतकऱ्यांचे कर्ज काही ना काही कारणाने थकीत आहे. त्यामुळे या दोन्ही घटकांसाठी योजना तयार करण्याचे काम सरकार करीत आहे. योजना लवकरच जाहीर होईल, यापूर्वीही कर्जमाफी झाली, परंतु शेतकरी पुन्हा कर्जात गेला. शेतीच्या क्षेत्रात गुंतवणुकीला प्राथमिकता असल्याचे मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले. धनंजय धनवटे, सुभाष वहाडणे, विजय धनवटे आदी शेतकऱ्यांनी कांदा निर्यातीसाठी केंद्र सरकारकडे चर्चा करा, १ जूनपूर्वी हमीभाव जाहीर करण्याच्या मागण्या केल्या. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेअंती संप स्थगित करण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांनी जाहीर केले. पुणतांबा म्हणजे राज्य नव्हे!शेतकरी संप मोहीम तथा किसान क्रांतीचे राज्य समन्वयक जयाजीराव सूर्यवंशी म्हणाले, ‘शेतकरी संघटनांमध्ये कुठलीही फूट पडलेली नाही. पुणतांबा येथील शेतकरी म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी नाहीत. विरोधी पक्षनेते डॉ. राधाकृष्ण विखे यांना हाताशी धरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी संपात फूट पाडण्याचा प्रयत्न केला,’ असा आरोपही त्यांनी केला. ४० ते ५० शेतकरी संघटनांनी एकत्रित येऊन हा संप पुकारला आहे. मुख्यमंत्र्यांचा फूट पाडण्याचा डाव हाणून पाडला जाईल. मुख्यमंत्र्यांनी संप समन्वय समितीशी चर्चा करणे अपेक्षित होते, परंतु त्यांनी तसे केले नाही. विरोधक आणि सत्ताधारी सोबत असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. बुधवारी सकाळी औरंगाबादला राज्यव्यापी बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा होईल.