शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

शेतकऱ्यांच्या नियोजित संपात फूट

By admin | Updated: May 17, 2017 01:29 IST

शेतकऱ्यांनी १ जून रोजी राज्यव्यापी संप पुकारला असून, त्यामध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई/औरंगाबाद : शेतकऱ्यांनी १ जून रोजी राज्यव्यापी संप पुकारला असून, त्यामध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर, नियोजित संपातून माघार घेतली आहे. मात्र, इतर जिल्ह्यांतील शेतकरी संपावर ठाम असल्याचे किसान क्रांतीने म्हटले आहे. या संदर्भात बुधवारी औरंगाबादेत राज्यव्यापी बैठक होत आहे.शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोफत वीज द्यावी. मालाला योग्य हमीभाव मिळावा आदी मागण्यांसाठी १ जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय ४० गावांतील शेतकऱ्यांनी घेतला होता. पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांनी फडणवीस यांच्याशी मंगळवारी मुंबईत तासभर चर्चा केली. एक कोटीहून अधिक शेतकरी नियमितपणे कर्ज भरणारे आहेत. ३१ लाख शेतकऱ्यांचे कर्ज काही ना काही कारणाने थकीत आहे. त्यामुळे या दोन्ही घटकांसाठी योजना तयार करण्याचे काम सरकार करीत आहे. योजना लवकरच जाहीर होईल, यापूर्वीही कर्जमाफी झाली, परंतु शेतकरी पुन्हा कर्जात गेला. शेतीच्या क्षेत्रात गुंतवणुकीला प्राथमिकता असल्याचे मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले. धनंजय धनवटे, सुभाष वहाडणे, विजय धनवटे आदी शेतकऱ्यांनी कांदा निर्यातीसाठी केंद्र सरकारकडे चर्चा करा, १ जूनपूर्वी हमीभाव जाहीर करण्याच्या मागण्या केल्या. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेअंती संप स्थगित करण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांनी जाहीर केले. पुणतांबा म्हणजे राज्य नव्हे!शेतकरी संप मोहीम तथा किसान क्रांतीचे राज्य समन्वयक जयाजीराव सूर्यवंशी म्हणाले, ‘शेतकरी संघटनांमध्ये कुठलीही फूट पडलेली नाही. पुणतांबा येथील शेतकरी म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी नाहीत. विरोधी पक्षनेते डॉ. राधाकृष्ण विखे यांना हाताशी धरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी संपात फूट पाडण्याचा प्रयत्न केला,’ असा आरोपही त्यांनी केला. ४० ते ५० शेतकरी संघटनांनी एकत्रित येऊन हा संप पुकारला आहे. मुख्यमंत्र्यांचा फूट पाडण्याचा डाव हाणून पाडला जाईल. मुख्यमंत्र्यांनी संप समन्वय समितीशी चर्चा करणे अपेक्षित होते, परंतु त्यांनी तसे केले नाही. विरोधक आणि सत्ताधारी सोबत असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. बुधवारी सकाळी औरंगाबादला राज्यव्यापी बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा होईल.