शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

श्रीमलंग परिसराचा होणार नियोजनबद्ध विकास

By admin | Updated: April 25, 2017 16:47 IST

सोयीसुविधा नसल्यामुळे श्रीमलंग परिसराचा तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत विकास करावा, यासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे करत असलेल्या प्रयत्नांना यश आले

ऑनलाइन लोकमतठाणे, दि. 25 - श्रीमलंग गडावर दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. मात्र, त्या तुलनेत येथे पुरेशा सोयीसुविधा नसल्यामुळे श्रीमलंग परिसराचा तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत विकास करावा, यासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे करत असलेल्या प्रयत्नांना यश आले असून, श्रीमलंग परिसर विकासासाठी १० कोटींचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिले. त्याचप्रमाणे येथे होणाऱ्या मुसळधार पावसाचे पाणी अडवण्यासाठीही स्वतंत्र आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी जिल्ह्यातील विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खा. कपिल पाटील, आ. किसन कथोरे, सुभाष भोईर, शांताराम मोरे, रुपेश म्हात्रे, पांडुरंग बरोरा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भिमनवार आदी उपस्थित होते.श्रीमलंग गडाचा समावेश राज्य शासनाच्या तीर्थक्षेत्र विकासाच्या ब गटात करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसराचा नियोजनबद्ध विकास व्हावा, यासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे गेली तीन वर्षे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यासाठी जिल्हा परिषद तसेच वनविभागाकडे अनेक बैठकाही त्यांनी घेतल्या. मात्र, वनविभाग आणि जिल्हा परिषद यांच्या कार्यक्षेत्रातील वादामुळे या परिसराचा विकास रखडला होता.सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत खा. डॉ. शिंदे यांनी यासंदर्भात होणाऱ्या दिरंगाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. सातत्याने पाठपुरावा करून देखील प्रशासकीय पातळीवर उदासीनता दाखवली जात असल्याची तक्रार त्यांनी केली. श्रीमलंग गड हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे, तसेच येथे पर्यटन विकासालाही भरपूर वाव आहे. या परिसराचा विकास होण्याबरोबरच स्थानिकांनाही मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊन येथील अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर या परिसराच्या विकासासाठी नियोजनबद्ध आराखडा सादर करण्याची मागणी त्यांनी केली.या मागणीची दखल घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्हा परिषद आणि वनविभाग यांनी कार्यक्षेत्राचा बागुलबुवा उभा न करता या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी तातडीने १० कोटींचा आराखडा सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. तसेच, पावसाचे पाणी अडवण्यासाठीही सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.पाणीटंचाईबाबत खासदारांनी खडसावलेश्रीमलंगगड परिसरात पडणारे पावसाचे पाणी अडवण्याच्या संदर्भात प्रशासकीय यंत्रणेकडून दाखवल्या जात असलेल्या  उदासीनतेबाबतही खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. या परिसरात भरपूर पाऊस होऊनही दरवर्षी तीव्र पाणीटंचाई भेडसावते. गेल्या वर्षी मी स्वत: १० गावांमधले बंधारे आणि तलावांमधील गाळ काढला. त्यामुळे पाणी साठवण्याची क्षमता लाखो लीटरने वाढली. त्याचवेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी या परिसरातील बंधाऱ्यांची डागडुजी, त्यांची उंची वाढवणे, आवश्यक त्या ठिकाणी नव्या बंधाऱ्यांचे बांधकाम यांचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर गेले वर्षभर सातत्याने पाठपुरावा करूनही अद्याप याबाबत काहीही हालचाल झाली नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच, या परिसरातील गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई असूनही नादुरुस्त बोअर आणि हँडपंपची दुरुस्ती केली जात नाही. येथील काही गावांमध्ये नळपाणी योजना असल्याचे कागदोपत्री दाखवले गेले आहे, प्रत्यक्षात जागेवर नळपाणी योजना अस्तित्वात नाही, याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली.