शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीमलंग परिसराचा होणार नियोजनबद्ध विकास

By admin | Updated: April 25, 2017 16:47 IST

सोयीसुविधा नसल्यामुळे श्रीमलंग परिसराचा तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत विकास करावा, यासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे करत असलेल्या प्रयत्नांना यश आले

ऑनलाइन लोकमतठाणे, दि. 25 - श्रीमलंग गडावर दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. मात्र, त्या तुलनेत येथे पुरेशा सोयीसुविधा नसल्यामुळे श्रीमलंग परिसराचा तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत विकास करावा, यासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे करत असलेल्या प्रयत्नांना यश आले असून, श्रीमलंग परिसर विकासासाठी १० कोटींचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिले. त्याचप्रमाणे येथे होणाऱ्या मुसळधार पावसाचे पाणी अडवण्यासाठीही स्वतंत्र आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी जिल्ह्यातील विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खा. कपिल पाटील, आ. किसन कथोरे, सुभाष भोईर, शांताराम मोरे, रुपेश म्हात्रे, पांडुरंग बरोरा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भिमनवार आदी उपस्थित होते.श्रीमलंग गडाचा समावेश राज्य शासनाच्या तीर्थक्षेत्र विकासाच्या ब गटात करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसराचा नियोजनबद्ध विकास व्हावा, यासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे गेली तीन वर्षे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यासाठी जिल्हा परिषद तसेच वनविभागाकडे अनेक बैठकाही त्यांनी घेतल्या. मात्र, वनविभाग आणि जिल्हा परिषद यांच्या कार्यक्षेत्रातील वादामुळे या परिसराचा विकास रखडला होता.सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत खा. डॉ. शिंदे यांनी यासंदर्भात होणाऱ्या दिरंगाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. सातत्याने पाठपुरावा करून देखील प्रशासकीय पातळीवर उदासीनता दाखवली जात असल्याची तक्रार त्यांनी केली. श्रीमलंग गड हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे, तसेच येथे पर्यटन विकासालाही भरपूर वाव आहे. या परिसराचा विकास होण्याबरोबरच स्थानिकांनाही मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊन येथील अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर या परिसराच्या विकासासाठी नियोजनबद्ध आराखडा सादर करण्याची मागणी त्यांनी केली.या मागणीची दखल घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्हा परिषद आणि वनविभाग यांनी कार्यक्षेत्राचा बागुलबुवा उभा न करता या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी तातडीने १० कोटींचा आराखडा सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. तसेच, पावसाचे पाणी अडवण्यासाठीही सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.पाणीटंचाईबाबत खासदारांनी खडसावलेश्रीमलंगगड परिसरात पडणारे पावसाचे पाणी अडवण्याच्या संदर्भात प्रशासकीय यंत्रणेकडून दाखवल्या जात असलेल्या  उदासीनतेबाबतही खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. या परिसरात भरपूर पाऊस होऊनही दरवर्षी तीव्र पाणीटंचाई भेडसावते. गेल्या वर्षी मी स्वत: १० गावांमधले बंधारे आणि तलावांमधील गाळ काढला. त्यामुळे पाणी साठवण्याची क्षमता लाखो लीटरने वाढली. त्याचवेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी या परिसरातील बंधाऱ्यांची डागडुजी, त्यांची उंची वाढवणे, आवश्यक त्या ठिकाणी नव्या बंधाऱ्यांचे बांधकाम यांचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर गेले वर्षभर सातत्याने पाठपुरावा करूनही अद्याप याबाबत काहीही हालचाल झाली नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच, या परिसरातील गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई असूनही नादुरुस्त बोअर आणि हँडपंपची दुरुस्ती केली जात नाही. येथील काही गावांमध्ये नळपाणी योजना असल्याचे कागदोपत्री दाखवले गेले आहे, प्रत्यक्षात जागेवर नळपाणी योजना अस्तित्वात नाही, याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली.