शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

पोलिसांच्या सुटीसाठी आता ‘वर्षभराचा प्लॅन’

By admin | Updated: May 14, 2015 23:54 IST

तीस दिवस हक्काची रजा : नियोजन करण्याचे पोलीस अधीक्षकांचे आदेश

सातारा : प्रत्येक कर्मचाऱ्याला हक्काची रजा मिळालीच पाहिजे, यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोणत्या कर्मचाऱ्याला कोणत्या महिन्यात रजेवर सोडणार, याचा वषार्चा आढावाच सादर करण्याचे आदेश त्यांनी सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ही प्रक्रिया वेगात सुरू असल्याने रजा, सुट्ट्यांची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या पोलिसांना दिलासा मिळाला आहे. पोलीस अधीक्षकांच्या या निर्णयाने जुलमाने मिळणाऱ्या सुट्या पोलिसांना यंदा हक्काने मिळणार आहेत. यापूर्वी हक्काची रजा, अर्जित रजा मंजूर करण्यासाठी पोलीस अधीक्षकांकडे अर्ज करण्याची पद्धत होती. पोलीस ठाण्यापासून पोलीस मुख्यालयापर्यंतच्या या अर्जाच्या प्रवासात अनेकदा वेळ लागायचा. त्यामुळे आवश्यक त्यावेळी पोलिसांना रजा मिळत नव्हती. रजा मंजूर झाली नाही, अशीच उत्तरे यायची आणि अधीक्षकांना विचारायला जाणार कोण, असा प्रश्न असायचा. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मागील सप्टेंबरमध्ये सर्व कर्मचाऱ्यांना हक्काची व अर्जित रजा देण्याचे निर्देश डॉ. देशमुख यांनी दिले होते. तरीही अनेक प्रभारी अधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पुरेशा रजा दिल्या नाहीत. ही गोष्ट निर्दशनास आल्यामुळे डॉ. देशमुख यांनी यंदा सर्व प्रभारी अधिकऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांची यादीच तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. १५ दिवस हक्क व १५ दिवस अर्जित रजा याप्रमाणे तत्काळ प्लॅन तयार करायला सांगितला आहे. दर दिवशी दहा टक्के कर्मचारी रजेवर सोडायचे, यानुसार हे नियोजन केले जात आहेत. त्यामुळे नेहमी रजा नाकारणारे प्रभारी अधिकारी आता कर्मचाऱ्यांना तुला कधी रजा पाहिजे, असे विचारायला लागले आहेत. सुट्यांचे प्लॅनिंग करण्याची संधी मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)पोलिसांच्या रजांची सद्य:स्थिती अशी... सर्वसामान्यांच्या सणाचा दिवस तो पोलिसांच्या कडक ड्युटीचा दहा दिवसांची रजा मागितली, तर पाच किंवा चार दिवसांची मिळते मागेल तेवढी हक्काची रजा संपूर्ण नोकरीच्या कालावधीत क्वचितच मिळत असेल कोणतेही महत्त्वाचे काम असेल, तर आजारी पडण्याशिवाय पर्यायच नसतो हक्काच्या सुट्या शिल्लक असतानाही करावी लागतात आजारपणाची सोंगे साप्ताहिक सुटीच्या आदल्या दिवशी नाइट कंपल्सरी; त्यामुळे ती सुटी उपयोगशून्यच आता हक्काने रजेवर जा : डॉ. देशमुख एकाच आदेशाने जिल्ह्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या हक्क रजा मंजूर केल्या आहेत. तरीही काही प्रभारी अधिकारी कर्मचाऱ्यांना सुटीवर सोडत नाहीत. त्यामुळे निवडणुका, गणेशोत्सव व नवरात्रीचे बंदोबस्त विचारात घेऊन दर दिवशी दहा टक्के कर्मचाऱ्यांना रजेवर पाठविण्याचे नियोजन करण्यास सांगितले आहे. त्यातून सुटीवर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे येणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना हक्काने रजेवर जाता येईल, असे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.