शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

शिवस्मारकाच्या जागेवरून मच्छीमारांमधील मतभेद झाले दूर!

By admin | Updated: December 23, 2016 10:22 IST

त्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाच्या जागेबाबत मच्छीमारांचे राज्य सरकार बरोबर असलेले मतभेद काल रात्री वर्षावर झालेल्या मुख्यमंत्र्यांबरोबरच्या यशस्वी मध्यस्थी नंतर दूर झाले.

मनोहर कुंभेजकर, ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ -  अरबी समुद्रात ४२ एकरात भराव टाकून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाच्या जागेबाबत मच्छीमारांचे राज्य सरकार बरोबर असलेले मतभेद काल रात्री वर्षावर झालेल्या मुख्यमंत्र्यांबरोबरच्या यशस्वी मध्यस्थी नंतर दूर झाले. त्यामुळे  पूर्वी ठरलेले प्रखर आंदोलनाचा निर्णय महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती आणि कफपरेड येथील मच्छीमार सर्वोदय सहकारी सोसायटीने अखेर मागे घेतला अशी माहिती समितीचे मुंबई अध्यक्ष किरण कोळी यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांबरोबर गेल्या बुधवारी वर्षावर झालेली बैठक निष्फळ झाली होती.काल रात्री  उशिरा पावणे अकरा ते मध्यरात्री १२पर्यंत पुन्हा वर्षावर मुख्यमंत्र्यांबरोबर यशस्वी बैठक झाली. या बैठकीला मत्स्यव्यवसाय मंत्री जानकर,आमदार राम कदम, समितीचे कार्याध्यक्ष लिओ कोलासो, किरण कोळी, कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेशदादा पाटील, महेश तांडेल,रमेश मेहेर,मोरेश्वर पाटील,परशुराम मेहेर,लक्ष्मण धनू यांच्यासह मच्छीमारांचे ३५जणांचे शिष्ठमंडळ उपस्थित होते.
 
या बैठकीत मच्छीमारांच्या मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्या अध्य्क्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. तसेच या स्मारकामुळे कफपरेड येथील बाधीत ३५० मच्छीमारांना चारपट नुकसान भरपाई, शिवस्मारक झाल्यावर येथील पर्यटन क्षेत्रात मच्छीमारांसाठी रोजगार,तसेच या क्षेत्रात मच्छीमारांना मासेमारी करण्यास कोणतेही निर्बंध घालण्यात येणार नाहीत,सागरी पोलिस ठाण्यात ८० टक्के नोकऱ्या,राजभवन येथील २०० मीटर परिसरातील मासेमारीसाठी असलेली बंदी येथे संरक्षक भिंत बांधल्या नंतर मागे घेण्यात येईल. तसेच स्मारकासाठी टाकण्यात येणारा भराव कसा कमी करून मासेमारीसाठी अधिक क्षेत्र कसे उपलब्ध करता येईल याचा समिती निर्णय घेईल  असे महत्वाचे निर्णय या बैठकीत झाले.
 
मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक भूमिका आणि त्यांनी घेतलेले अनेक महत्वाचे निर्णय यामुळे हे आंदोलन मागे घेतल्याची माहिती किरण कोळी यांनी दिली.
 
उद्या या स्मारकाचा भूमिपूजन समारंभ पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते होणार आहे,त्यांमुळे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानासमोर मागील लोकसभा निवणुकीपूर्वी आपल्या जाहिरनाम्यात भाजपाने केंद्राच्या कृषीमंत्रालयाकडे असलेले मत्स्यव्यवसाय खाते वेगळे करा. तसेच सागरी मासेमारी कायदा-२०१६ मध्ये पारंपारिक क्षेत्र मच्छीमारांसाठी आरक्षित ठेवा या मच्छीमारांच्या दोन प्रमुख मागण्या मांडण्याची मागणी केली.त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती किरण कोळी यांनी दिली.