शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

शिवस्मारकाच्या जागेवरून मच्छीमारांमधील मतभेद झाले दूर!

By admin | Updated: December 23, 2016 10:22 IST

त्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाच्या जागेबाबत मच्छीमारांचे राज्य सरकार बरोबर असलेले मतभेद काल रात्री वर्षावर झालेल्या मुख्यमंत्र्यांबरोबरच्या यशस्वी मध्यस्थी नंतर दूर झाले.

मनोहर कुंभेजकर, ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ -  अरबी समुद्रात ४२ एकरात भराव टाकून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाच्या जागेबाबत मच्छीमारांचे राज्य सरकार बरोबर असलेले मतभेद काल रात्री वर्षावर झालेल्या मुख्यमंत्र्यांबरोबरच्या यशस्वी मध्यस्थी नंतर दूर झाले. त्यामुळे  पूर्वी ठरलेले प्रखर आंदोलनाचा निर्णय महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती आणि कफपरेड येथील मच्छीमार सर्वोदय सहकारी सोसायटीने अखेर मागे घेतला अशी माहिती समितीचे मुंबई अध्यक्ष किरण कोळी यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांबरोबर गेल्या बुधवारी वर्षावर झालेली बैठक निष्फळ झाली होती.काल रात्री  उशिरा पावणे अकरा ते मध्यरात्री १२पर्यंत पुन्हा वर्षावर मुख्यमंत्र्यांबरोबर यशस्वी बैठक झाली. या बैठकीला मत्स्यव्यवसाय मंत्री जानकर,आमदार राम कदम, समितीचे कार्याध्यक्ष लिओ कोलासो, किरण कोळी, कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेशदादा पाटील, महेश तांडेल,रमेश मेहेर,मोरेश्वर पाटील,परशुराम मेहेर,लक्ष्मण धनू यांच्यासह मच्छीमारांचे ३५जणांचे शिष्ठमंडळ उपस्थित होते.
 
या बैठकीत मच्छीमारांच्या मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्या अध्य्क्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. तसेच या स्मारकामुळे कफपरेड येथील बाधीत ३५० मच्छीमारांना चारपट नुकसान भरपाई, शिवस्मारक झाल्यावर येथील पर्यटन क्षेत्रात मच्छीमारांसाठी रोजगार,तसेच या क्षेत्रात मच्छीमारांना मासेमारी करण्यास कोणतेही निर्बंध घालण्यात येणार नाहीत,सागरी पोलिस ठाण्यात ८० टक्के नोकऱ्या,राजभवन येथील २०० मीटर परिसरातील मासेमारीसाठी असलेली बंदी येथे संरक्षक भिंत बांधल्या नंतर मागे घेण्यात येईल. तसेच स्मारकासाठी टाकण्यात येणारा भराव कसा कमी करून मासेमारीसाठी अधिक क्षेत्र कसे उपलब्ध करता येईल याचा समिती निर्णय घेईल  असे महत्वाचे निर्णय या बैठकीत झाले.
 
मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक भूमिका आणि त्यांनी घेतलेले अनेक महत्वाचे निर्णय यामुळे हे आंदोलन मागे घेतल्याची माहिती किरण कोळी यांनी दिली.
 
उद्या या स्मारकाचा भूमिपूजन समारंभ पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते होणार आहे,त्यांमुळे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानासमोर मागील लोकसभा निवणुकीपूर्वी आपल्या जाहिरनाम्यात भाजपाने केंद्राच्या कृषीमंत्रालयाकडे असलेले मत्स्यव्यवसाय खाते वेगळे करा. तसेच सागरी मासेमारी कायदा-२०१६ मध्ये पारंपारिक क्षेत्र मच्छीमारांसाठी आरक्षित ठेवा या मच्छीमारांच्या दोन प्रमुख मागण्या मांडण्याची मागणी केली.त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती किरण कोळी यांनी दिली.