शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

झिंगाट पावसात कणसाची गोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2016 00:32 IST

दोन्ही काठ गच्च भरून वाहणारी मुठा नदी... पाऊसधारांची सतत बरसात यांचा मनमुराद आनंद पुणेकरांनी शुक्रवारी दिवसभर लुटला

पुणे : दोन्ही काठ गच्च भरून वाहणारी मुठा नदी... पाऊसधारांची सतत बरसात यांचा मनमुराद आनंद पुणेकरांनी शुक्रवारी दिवसभर लुटला. पुण्यातील एकजात सगळ्या पुलांवर नदीचे वाहते पाणी पाहण्यासाठी सकाळपासूनच गर्दी झाली. धरणातून पाणी सोडण्याचे प्रमाण वाढले तसे मुठेचे पाणीही वाढले. त्यामुळे दुपारनंतर गर्दीत प्रचंड वाढ झाली. भाजलेल्या कणसांनी या गर्दीच्या आनंदात आणखी भर टाकली.गुरुवारी पावसाने विश्रांती घेतली. शुक्रवारी मात्र सकाळीच हजेरी लावली. सुरुवातीला तो हळुवार बरसत होता, नंतर मात्र त्याने जोर धरला. संततधारच सुरू झाली. धरणक्षेत्रातही असाच जोरदार पाऊस कोसळत होता. त्यामुळेच खडकवासला धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. मुठेचे पाणी वाढू लागले. राजाराम पूलापासून मुठा नदीवरच्या प्रत्येक पुलावर व कॉजवेवर आबालवृद्धांची गर्दी होऊ लागली. झेड ब्रिज युवकांचा अत्यंत आवडता पूल, मात्र पोलिसांनी तिथे बंदोबस्त लावला होता. नदीपात्रातून जाणारा भिडे पूल तर गुरुवारीच बंद करण्यात आला होता. तरीही या दोन्ही पुलांवर पाणी पाहण्यासाठी गर्दी झाली होती. वाहन पुलाच्या कडेला ठेवून तिथे सगळे पायीच जात होते. गरवारे महाविद्यालयामागील एस. एम. जोशी पूल, बालगंधर्वजवळचा वि. रा. शिंदे पूल, शनिवारवाड्यासमोरचा छत्रपती संभाजी पूल गर्दीने फुलून गेले. तरुणाईने जणू पाऊस अंगात भरून घेतला. वाहने पुलाच्या कडेला लावून गर्दीने सगळे जण वाहत्या पाण्याची गंमत अनुभवत होते. त्यांच्या जोडीने काही वयोवृद्ध पुणेकरही गर्दी करीत होते. त्यांच्यातील काहींनी पानशेतच्या पुराच्या आठवणी जागवल्या. त्या वेळी पाणी कुठपर्यंत होते, कधी आले, किती दिवस होते असे अनेक प्रश्न त्यांना तरुणांनी विचारले. काही मुलींनी दप्तरातील वह्यांचे कागद फाडून त्याच्या नावा तयार केल्या व पुलावरून नदीत सोडल्या. पाण्याच्या लोटात त्यांना शोधण्याचा खेळच मग जल्लोष करीत सुरू झाला.(प्रतिनिधी) >कचऱ्याबाबत जागृतीकाही अस्सल पुणेकरांनी नदीच्या पाण्यात वाहून येत असलेल्या कचऱ्याकडे लक्ष वेधले. प्लॅस्टिकच्या पिशव्यांची संख्या त्यात जास्त होती. नदीपात्राच्या कडेला या पिशव्या अडकून राहत होत्या. बंद करा या पिशव्या वापरणे, असे आवाहनही काही पुणेकरांनी जमलेल्या गर्दीला करण्यास सुरुवात केली.गर्दीही वाढलीचहा, गरम भजी, कोळशाच्या भट्टीत भाजलेली मक्याची गरमागरम कणसे यांच्या विक्रेत्यांनी या गर्दीच्या आनंदात भर टाकली. कणीस कुठे मिळते, अशी विचारणा करीत पुलाच्या कडेला थांबलेल्या विक्रेत्यांच्या गाड्यांवर झुंबड उडत होती. अनेक पालक बरोबरच्या मुलांना खांद्यावर घेऊन पाणी दाखवत होते. दुपारी ४ नंतर नदीचे पाणी वाढले व मग तर या गर्दीला बहरच आला. जत्रा असावी तसे नागरिक पुलावर येत होते व पावसाचा, वाहत्या पाण्याचा आनंद अनुभवत होते.