शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

झिंगाट पावसात कणसाची गोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2016 00:32 IST

दोन्ही काठ गच्च भरून वाहणारी मुठा नदी... पाऊसधारांची सतत बरसात यांचा मनमुराद आनंद पुणेकरांनी शुक्रवारी दिवसभर लुटला

पुणे : दोन्ही काठ गच्च भरून वाहणारी मुठा नदी... पाऊसधारांची सतत बरसात यांचा मनमुराद आनंद पुणेकरांनी शुक्रवारी दिवसभर लुटला. पुण्यातील एकजात सगळ्या पुलांवर नदीचे वाहते पाणी पाहण्यासाठी सकाळपासूनच गर्दी झाली. धरणातून पाणी सोडण्याचे प्रमाण वाढले तसे मुठेचे पाणीही वाढले. त्यामुळे दुपारनंतर गर्दीत प्रचंड वाढ झाली. भाजलेल्या कणसांनी या गर्दीच्या आनंदात आणखी भर टाकली.गुरुवारी पावसाने विश्रांती घेतली. शुक्रवारी मात्र सकाळीच हजेरी लावली. सुरुवातीला तो हळुवार बरसत होता, नंतर मात्र त्याने जोर धरला. संततधारच सुरू झाली. धरणक्षेत्रातही असाच जोरदार पाऊस कोसळत होता. त्यामुळेच खडकवासला धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. मुठेचे पाणी वाढू लागले. राजाराम पूलापासून मुठा नदीवरच्या प्रत्येक पुलावर व कॉजवेवर आबालवृद्धांची गर्दी होऊ लागली. झेड ब्रिज युवकांचा अत्यंत आवडता पूल, मात्र पोलिसांनी तिथे बंदोबस्त लावला होता. नदीपात्रातून जाणारा भिडे पूल तर गुरुवारीच बंद करण्यात आला होता. तरीही या दोन्ही पुलांवर पाणी पाहण्यासाठी गर्दी झाली होती. वाहन पुलाच्या कडेला ठेवून तिथे सगळे पायीच जात होते. गरवारे महाविद्यालयामागील एस. एम. जोशी पूल, बालगंधर्वजवळचा वि. रा. शिंदे पूल, शनिवारवाड्यासमोरचा छत्रपती संभाजी पूल गर्दीने फुलून गेले. तरुणाईने जणू पाऊस अंगात भरून घेतला. वाहने पुलाच्या कडेला लावून गर्दीने सगळे जण वाहत्या पाण्याची गंमत अनुभवत होते. त्यांच्या जोडीने काही वयोवृद्ध पुणेकरही गर्दी करीत होते. त्यांच्यातील काहींनी पानशेतच्या पुराच्या आठवणी जागवल्या. त्या वेळी पाणी कुठपर्यंत होते, कधी आले, किती दिवस होते असे अनेक प्रश्न त्यांना तरुणांनी विचारले. काही मुलींनी दप्तरातील वह्यांचे कागद फाडून त्याच्या नावा तयार केल्या व पुलावरून नदीत सोडल्या. पाण्याच्या लोटात त्यांना शोधण्याचा खेळच मग जल्लोष करीत सुरू झाला.(प्रतिनिधी) >कचऱ्याबाबत जागृतीकाही अस्सल पुणेकरांनी नदीच्या पाण्यात वाहून येत असलेल्या कचऱ्याकडे लक्ष वेधले. प्लॅस्टिकच्या पिशव्यांची संख्या त्यात जास्त होती. नदीपात्राच्या कडेला या पिशव्या अडकून राहत होत्या. बंद करा या पिशव्या वापरणे, असे आवाहनही काही पुणेकरांनी जमलेल्या गर्दीला करण्यास सुरुवात केली.गर्दीही वाढलीचहा, गरम भजी, कोळशाच्या भट्टीत भाजलेली मक्याची गरमागरम कणसे यांच्या विक्रेत्यांनी या गर्दीच्या आनंदात भर टाकली. कणीस कुठे मिळते, अशी विचारणा करीत पुलाच्या कडेला थांबलेल्या विक्रेत्यांच्या गाड्यांवर झुंबड उडत होती. अनेक पालक बरोबरच्या मुलांना खांद्यावर घेऊन पाणी दाखवत होते. दुपारी ४ नंतर नदीचे पाणी वाढले व मग तर या गर्दीला बहरच आला. जत्रा असावी तसे नागरिक पुलावर येत होते व पावसाचा, वाहत्या पाण्याचा आनंद अनुभवत होते.