शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

जातपंचायतीने घेतला पित्याचा बळी

By admin | Updated: November 21, 2015 02:05 IST

समाजातून केले बहिष्कृत, पाच लाखाचा दंड ठोठावल्यामुळे ह्रदयविकाराचा झटका.

विवेक चांदूरकर/ वाशिम : मुलीच्या गैरकृत्याबद्दल पित्याला समाजातून बहिष्कृत करून, पाच लाखाचा दंड ठोठावणार्‍या नाथजोगी समाजाच्या जात पंचायतीच्या निर्दयी कृत्याने या पित्याचा बळी घेतला. तब्बल पाच लाखांचा दंड आणि समाजातून बहिष्कृत करण्याची धमकी, यामुळे दबावाखाली आलेल्या ग्रामस्थाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. जात पंचायतीच्या आदेशामुळे या दुर्दैवी पित्याच्या अंतिम संस्कारासही कुणी गेले नाही, हे विशेष. रिसोड तालुक्यात गणेशपुर हे एक छोटेसे गाव असून, येथे नाथ जोगी समाजाचे लोक वास्तव्य करतात. शेती करून कुटुंबाचा उदहनिर्वाह भागविणार्‍या सुभाष सावंत यांच्या मुलीचा विवाह गावातीलच साईनाथ शितोडे यांच्यासोबत तीन वर्षापूर्वी झाला. लग्नानंतर दोन वर्षे तिला अपत्य झाले नाही. त्यामुळे संसारात कुरबूर सुरू होती. त्यानंतर पत्नी गरोदर राहीली; मात्र पतीने हा गर्भ आपला नसल्याचा संशय घेऊन तिला माहेरी पाठविले. यानंतर त्याने या प्रकाराची तक्रार मालेगाव तालुक्यातील कोल्ही येथील जात पंचायतीचे प्रमुख बापू चिमाजी सेगर यांच्याकडे केली. सेगर यांनी या तक्रारीवर निर्णय घेण्यासाठी २८ ऑक्टोबर रोजी पंचायत बोलविण्यात आली. त्याचे निमंत्रण सुभाष यांनाही मिळाले; मात्र काही गडबड होईल या भितीने ते पंचायतीला गेले नाही. सुभाष सावंत यांच्या मुलीने गैरव्यवहार केल्यामुळे तिने गर्भपात करून घ्यावा, असा निर्णय यावेळी पंचांनी दिला. तद्वतच, मुलीचा गैरव्यवहार आणि पंचायतीत अनुपस्थिती, या कारणांमुळे सुभाष सावंत यांना समाजातून बहिष्कृत करण्याचा निर्णयही यावेळी पंचांनी घेतला. समाजात परत यायचे असेल, तर त्यांनी पाच लाख रूपयांचा दंड भरावा, असे फर्मान पंचांनी सोडले. शिवाजी सेगर यांनी गणेशपूर येथे जाऊन सुभाष यांना हा निरोप दिला. नाथ जोगी समाजात पंचायतीला विशेष महत्व असून, समाजातून बहिष्कृत करण्यात आल्याचे शल्य सुभाष यांच्या मनाला बोचले. थोड्या-थोडक्या शेतीतून कुटुंबाचे पालनपोषण करीत असताना दंड भरण्यासाठी पाच लाख रूपये कुठून आणावे, हा प्रश्न त्यांना पडला. या विवंचनेत ६ नोव्हेंबर रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. जात पंचायतीची निर्दयता एवढय़ावर थांबली नाही. सुभाषच्या अंतिम संस्कारात कुणीही जाऊ नये, असे फर्मान पंचायतीने सोडले. त्यामुळे घरची मंडळी आणि नातेवाईकांनाच अंतिम संस्कार उरकावे लागले. पोलीसही याप्रकरणी कारवाई करण्यास तयार नसल्याने मृताचे कुटुंब प्रचंड दडपणात आहे.

**आत्महत्या हाच पर्याय

           जात पंचायतीने समाजातून बहिष्कृत केले आहे. पोलीस दखल घेण्यास तयार नाहीत. तक्रार दिल्यावरही कारवाई झाली नाही. आता जातीबाहेर कसे वास्तव्य करावे, मुलांचे विवाह कसे करावे, पंचायतीतील लोक सुखाने जगू देणार नाही, अशी भीती सुभाष यांच्या आई- वडिलांना असून, अशा स्थितीत आमच्यापुढे आता आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.