शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

जातपंचायतीने घेतला पित्याचा बळी

By admin | Updated: November 21, 2015 02:05 IST

समाजातून केले बहिष्कृत, पाच लाखाचा दंड ठोठावल्यामुळे ह्रदयविकाराचा झटका.

विवेक चांदूरकर/ वाशिम : मुलीच्या गैरकृत्याबद्दल पित्याला समाजातून बहिष्कृत करून, पाच लाखाचा दंड ठोठावणार्‍या नाथजोगी समाजाच्या जात पंचायतीच्या निर्दयी कृत्याने या पित्याचा बळी घेतला. तब्बल पाच लाखांचा दंड आणि समाजातून बहिष्कृत करण्याची धमकी, यामुळे दबावाखाली आलेल्या ग्रामस्थाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. जात पंचायतीच्या आदेशामुळे या दुर्दैवी पित्याच्या अंतिम संस्कारासही कुणी गेले नाही, हे विशेष. रिसोड तालुक्यात गणेशपुर हे एक छोटेसे गाव असून, येथे नाथ जोगी समाजाचे लोक वास्तव्य करतात. शेती करून कुटुंबाचा उदहनिर्वाह भागविणार्‍या सुभाष सावंत यांच्या मुलीचा विवाह गावातीलच साईनाथ शितोडे यांच्यासोबत तीन वर्षापूर्वी झाला. लग्नानंतर दोन वर्षे तिला अपत्य झाले नाही. त्यामुळे संसारात कुरबूर सुरू होती. त्यानंतर पत्नी गरोदर राहीली; मात्र पतीने हा गर्भ आपला नसल्याचा संशय घेऊन तिला माहेरी पाठविले. यानंतर त्याने या प्रकाराची तक्रार मालेगाव तालुक्यातील कोल्ही येथील जात पंचायतीचे प्रमुख बापू चिमाजी सेगर यांच्याकडे केली. सेगर यांनी या तक्रारीवर निर्णय घेण्यासाठी २८ ऑक्टोबर रोजी पंचायत बोलविण्यात आली. त्याचे निमंत्रण सुभाष यांनाही मिळाले; मात्र काही गडबड होईल या भितीने ते पंचायतीला गेले नाही. सुभाष सावंत यांच्या मुलीने गैरव्यवहार केल्यामुळे तिने गर्भपात करून घ्यावा, असा निर्णय यावेळी पंचांनी दिला. तद्वतच, मुलीचा गैरव्यवहार आणि पंचायतीत अनुपस्थिती, या कारणांमुळे सुभाष सावंत यांना समाजातून बहिष्कृत करण्याचा निर्णयही यावेळी पंचांनी घेतला. समाजात परत यायचे असेल, तर त्यांनी पाच लाख रूपयांचा दंड भरावा, असे फर्मान पंचांनी सोडले. शिवाजी सेगर यांनी गणेशपूर येथे जाऊन सुभाष यांना हा निरोप दिला. नाथ जोगी समाजात पंचायतीला विशेष महत्व असून, समाजातून बहिष्कृत करण्यात आल्याचे शल्य सुभाष यांच्या मनाला बोचले. थोड्या-थोडक्या शेतीतून कुटुंबाचे पालनपोषण करीत असताना दंड भरण्यासाठी पाच लाख रूपये कुठून आणावे, हा प्रश्न त्यांना पडला. या विवंचनेत ६ नोव्हेंबर रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. जात पंचायतीची निर्दयता एवढय़ावर थांबली नाही. सुभाषच्या अंतिम संस्कारात कुणीही जाऊ नये, असे फर्मान पंचायतीने सोडले. त्यामुळे घरची मंडळी आणि नातेवाईकांनाच अंतिम संस्कार उरकावे लागले. पोलीसही याप्रकरणी कारवाई करण्यास तयार नसल्याने मृताचे कुटुंब प्रचंड दडपणात आहे.

**आत्महत्या हाच पर्याय

           जात पंचायतीने समाजातून बहिष्कृत केले आहे. पोलीस दखल घेण्यास तयार नाहीत. तक्रार दिल्यावरही कारवाई झाली नाही. आता जातीबाहेर कसे वास्तव्य करावे, मुलांचे विवाह कसे करावे, पंचायतीतील लोक सुखाने जगू देणार नाही, अशी भीती सुभाष यांच्या आई- वडिलांना असून, अशा स्थितीत आमच्यापुढे आता आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.