शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

पुणेकरांच्या सेवेसाठी धावणार महिला रिक्षाचालकांची गुलाबी गँग..!

By admin | Updated: March 8, 2016 01:36 IST

आर्थिक सक्षमीकरणाच्या कालचक्रात विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवित महिलांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. आता तर रिक्षा परवाना मिळवून पुरुषांच्या बरोबरीने या व्यवसायतही आपला

पुणे : आर्थिक सक्षमीकरणाच्या कालचक्रात विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवित महिलांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. आता तर रिक्षा परवाना मिळवून पुरुषांच्या बरोबरीने या व्यवसायतही आपला ठसा उमटविण्यासाठी पुण्यातील गुलाबी गँग सज्ज झाली आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून पाच महिला रिक्षाधारकांना परवान्याचे वाटप केले जाणार आहे. त्यांची रिक्षाही काळी-पिवळी न राहता त्यांच्या रिक्षासाठी गुलाबी रंग निश्चित करण्यात आला असून, ही गुलाबी गँग लवकरच पुणेकरांच्या सेवेत धावणार आहे. पुणे शहरात तब्बल ८० हजारांहून अधिक रिक्षा असताना अवघ्या हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच महिला या व्यवसायात आहेत. त्यातही प्रामुख्याने या महिला प्रवासी वाहतूक करताना फारच कमी दिसतात. मात्र, रिक्षाचालकांच्या खाद्याला खांदा लावून महिलाही प्रवासी सेवेत उतरणार आहेत. परिवहन विभागाच्या आदेशानुसार पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात नव्याने तीन हजार २०८ परवान्यांचे वाटप केले जाणार आहे. त्यामध्ये महिलांसाठी पाच टक्के जागा आरक्षित ठेवल्या आहेत. गेले दोन महिने परवाना वाटपाची प्रक्रिया सुरू होती. वेळापत्रकानुसार उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या आहेत. त्यामुळे पात्र महिला उमेदवारांना मंगळवारपासून परवाना वाटप केले जाणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी सांगितली. राज्य शासनाकडून परवाना देण्यात आल्यानंतर या महिलांसाठीची रिक्षाही आगळीवेगळी असणार आहे. या रिक्षासाठी गुलाबी रंग निश्चित करण्यात आला असून, या महिलाचालकांचा गणवेशही याच रंगाचा असणार आहे. > मुलींना मिळणार थेट नोकरीपुणे : पुणे विभागाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून तब्बल २00 मुलींना थेट नोकरी देऊन आणि खऱ्या अर्थाने स्वावलंबी बनवून महिला दिन साजरा केला जाणार आहे.व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षणाचे पुणे विभागीय सहसंचालक चंद्रकांत निनाळे यांनी महिला दिनानिमित्त मंगळवारी (दि. ८) मयूर कॉलनी येथील बाल शिक्षण मंडळाच्या सभागृहात १४ नामवंत कंपन्यांंच्या माध्यमातून नोकरी मेळाव्याचे आयोजन केले आले. नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या मुलींना भरतीद्वारे त्याच ठिकाणी नियुक्तीपत्र दिले जाणार आहे. निनाळे म्हणाले, आयटीआय उत्तीर्ण अथवा किमान बारावी उत्तीर्ण असणाऱ्या मुलींना या मेळाव्यात नोकरीची संधी दिली जाणार आहे. याबाबत संबंधित कंपन्यांशी चर्चा झाली असून, त्याची प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.