शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

पिंपरी-चिंचवडनगरीत तरुण-तरूणी होताहेत ‘सैराट’

By admin | Updated: June 28, 2016 01:43 IST

उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे.

पिंपरी : उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. दुसरीकडे युवक-युवतींच्या बेपत्ता होण्याचेही प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात दिवसाआड बेपत्ता होण्याची तक्रार दाखल होत असून, गेल्या पाच महिन्यांत परिमंडळ तीनच्या हद्दीतून तब्बल १०० तरुण-तरुणी बेपत्ता झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये ३० तरुण आणि ७० तरुणींचा समावेश आहे.गेल्या काही वर्षांत येथील उद्योगनगरीचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाल्याने, रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी राज्यासह इतर राज्यांतीलही नागरिक शहरात स्थायिक होत आहेत. त्यामुळे शहराची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येतून बेपत्ता होणाऱ्यांची संख्यादेखील वाढत आहे. विशेष म्हणजे यामध्ये युवक-युवतींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने पालकांसह पोलिसांच्याही चिंतेचा विषय झालेला आहे. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिमंडळ तीनच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी, निगडी, चिंचवड, एमआयडीसी, चतु:शृंगी, हिंंजवडी, सांगवी, वाकड या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून या वर्षी जानेवारी ते मेअखेर १०० जण बेपत्ता झाले आहेत. यामध्ये ३० तरुण व ७० तरुणींचा समावेश आहे. या ३०पैकी २४ तरुणांचा शोध लागला असून, ६ जणांचा तपास सुरू आहे. तर ७० तरुणींपैकी ६० जणींचा तपास लागला असून, उर्वरित १० जणांचा तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले. तसेच या जून महिन्यातही प्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये बेपत्ता होण्याच्या तक्रारी दाखल असून, त्यांची आकडेवारी घेण्याचे काम सुरू असल्याचे ठाणे अंमलदारांनी सांगितले.मागील वर्षी जानेवारी ते डिसेंबरअखेर परिमंडळ तीनच्या हद्दीतून २१२ तरुण-तरुणी बेपत्ता झाले असल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. यामध्ये ६३ तरुण आणि १४९ तरुणींचा समावेश आहे. या ६३ पैकी ५८ जणांचा तपास लागला असून, उर्वरित ५ जणांचा वर्ष उलटूनही तपास लागलेला नाही. तर १४९ पैकी १२८ तरुणींचा तपास लागला असून, त्या घरीदेखील परतल्या आहेत. मात्र, २१ तरुणींचा शोध अद्यापही सुरूच आहे. दरम्यान, या बेपत्ता झालेल्यांमध्ये १८ ते २५ वयोगटातील तरुण-तरुणींचा समावेश असून, १६ वर्षांच्या आतील बेपत्ता झालेल्या संबंधी अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. दरम्यान, काही दिवसांनंतर हे तरुण-तरुणी घरीदेखील परततात. मात्र, पालकांकडून माहिती दिली जात नाही. तरी पालकांनी आपला मुलगा घरी आल्यावर ताबडतोब पोलिसांना कळविणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांतर्फे दर वर्षी आॅपरेशन मुस्कान ही शोध मोहीम राबवली जाते. (प्रतिनिधी)पोलीस दप्तरी बेपत्ता होण्याची कारणे मुलगा किंवा मुलगी घरी न परतल्यावर बहुतांश पालक पोलीस तक्रार नोंदवितात. बेपत्ता होण्यामागे त्यांनी नोंदविलेल्या तक्रारीनुसार, घरात भांडण होऊन निघून जाणे, व्यसनाच्या आहारी गेल्याने घर सोडणे, मानसिक आजार असल्याने घरातून निघून जाणे अशा तक्रारी पोलीस ठाण्यांमध्ये आहेत. यामध्ये सर्वाधिक तक्रारी प्रेमप्रकरणातून घर सोडल्याच्या आहेत, तर अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याच्या तक्रारींचे प्रमाणदेखील मोठ्या प्रमाणावर आहे.