शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

अक्षयकुमार घेणार यवतमाळमधील पिंप्री बुटी गाव दत्तक

By admin | Updated: November 5, 2016 20:06 IST

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त गाव दत्तक घेण्याचा निर्णय खिलाडी अक्षयकुमारने सरकारकडे व्यक्त केला होता.

ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. 5 - जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त गाव दत्तक घेण्याचा निर्णय खिलाडी अक्षयकुमारने सरकारकडे व्यक्त केला होता. यानुसार राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला सर्वाधिक आत्महत्या झालेले गाव सूचविण्यास सांगितले होते. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी पिंप्री बुटी गाव निश्चित केले असून प्रस्तावावर स्वाक्षरीही केली आहे. हा प्रस्ताव शनिवारी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. 
 
२६ ऑक्टोबरला अक्षय कुमार यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली होती. यावेळी अक्षय कुमार यांनी शेतकरी आत्महत्येवर चिंता व्यक्त केली होती. यासोबतच सर्वाधिक आत्महत्याग्रस्त गाव दत्तक घेण्याचा विचारही व्यक्त केला होता. 
यामुळे राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त गावाचे नाव सूचविण्यास सांगितले होते. जिल्हा प्रशासनाने अशा गावांच्या संदर्भात विचारविमर्श करून पिंप्री बुटी गावाचे नाव सूचविले आहे. या प्रस्तावावर जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी शनिवारी स्वाक्षरी केली. यामुळे दत्तक गावासंदर्भात कामकाज करण्याच्या प्रक्रियेला गती येणार आहे. 
 
मुख्यमंत्री, विरोधी पक्षातील दिग्गज आणि शरद पवारांची भेट 
पिंप्री बुटी गावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकºयांशी संवाद साधत मुक्काम केला होता. मुख्यमंत्र्यांच्या दौºयानंतरही या ठिकाणी शेतकरी आत्महत्या झाली. यानंतर विरोधी पक्षातील मंडळी आणि स्वत: शरद पवार यांनी भेट घेऊन शेतकºयांच्या आणि युवकांच्या व्यथा जाणून घेतल्या. राज्यमंत्री मदन येरावार यांनी हे गाव दत्तक घेतले आहे. आता अक्षयकुमारही पिंप्रीबुटीलला दत्तक घेणार आहेत.