शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
3
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
4
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
5
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
6
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
7
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
8
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
9
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
10
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
11
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
12
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
13
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
14
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
15
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
16
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
17
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
18
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
19
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
20
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स

तीर्थयात्रा लवकरच होणार सुपरफास्ट !

By admin | Updated: March 27, 2016 03:27 IST

रस्त्यांच्या विकासासाठी मिळालेल्या तब्बल २७ हजार कोटींच्या पॅकेजमधून सोलापूर शहरासह जिल्ह्याचाही चेहरामोहरा बदलणार आहे. सोलापुरात दोन उड्डाणपूल होणार असून, अनेक वर्षांपासून

- शिवाजी सुरवसे,  सोलापूर रस्त्यांच्या विकासासाठी मिळालेल्या तब्बल २७ हजार कोटींच्या पॅकेजमधून सोलापूर शहरासह जिल्ह्याचाही चेहरामोहरा बदलणार आहे. सोलापुरात दोन उड्डाणपूल होणार असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पालखी मार्गाचेही चौपदीकरण या पॅकेजमधून होणार आहे. पंढरपूरसह तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर या तीर्थक्षेत्रांशी सोलापूरची असलेली कनेक्टिव्हिटी लक्षात घेऊन रस्त्यांचा विकास करण्यावर भर देण्यात आला आहे.भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यासाठी दिलेल्या या रस्ते पॅकेज कामाचा कोनशिला समारंभ केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी येथे पार पडला़ या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह आमदार, खासदार उपस्थित होते़ जुना पुणे नाका ते विजापूर रोडवरील सोरेगावपर्यंत आणि हैदराबाद रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समिती ते विजापूर रोडवरील पत्रकार भवनापर्यंत अशा दोन प्रमुख मार्गांवर सुमारे १ हजार कोटी रुपये खर्चून दोन उड्डाण पूल बांधले जाणार आहेत़ सोलापूर-विजापूर तसेच सोलापूर-अक्कलकोट-गाणगापूर, सोलापूर ते कोल्हापूर, पंढरपूर ते देहू आणि पंढरपूर ते आळंदी हे पालखी मार्ग, तुळजापूर ते अक्कलकोट या नवीन महामार्गांची घोषणा गडकरी यांनी भाषणात केली़सोलापूर ते पुणे या राष्ट्रीय महामार्गाचे १११० कोटींचे काम १०० टक्के पूर्ण झाले असून सोलापूर ते येडशी (उस्मानाबाद) या १०० किलोमीटरचे ९७२ कोटींचे काम वेगाने सुरू आहे़ सोलापूर ते संगारेड्डी (हैदराबाद) या १०० किमी मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम (९२३ कोटींचे) गतीने सुरू आहे़ याशिवाय सोलापूर ते विजापूर (११४७ कोटी), सोलापूर ते अक्कलकोट-गाणगापूर (१००० कोटी) आणि सोलापूर ते सांगली-कोल्हापूर (२२५० कोटी) , टेंभुर्णी शहरातील रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम (१०७ कोटी) देण्यात आले आहे. ही सर्व कामे येत्या तीन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित असून, त्यानंतर सोलापूरहून पुणे, उस्मानाबाद, हैदराबाद, विजापूर, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी ये-जा करणे सहज आणि सुपरफास्ट होणार आहे़ असे आहेत २७ हजार कोटींचे महामार्ग- भूमिपूजन झालेल्या सहा कामांची (४६३ किमी) किंमत ५,७५४ कोटी - सध्या सुरू असलेल्या कामांची (४११ किमी) किंमत ३,८९८ कोटी - जिल्ह्यातील नऊ राष्ट्रीय महामार्गांना तत्त्वत: मंजुरी (१५५९ किमी)़ किंमत १७ हजार कोटी - केंद्राच्या निधीतून (सीआरएफ) महामार्गांची कामे करणे ११३ कोटी - महामार्गांच्या वार्षिक देखभाल-दुरुस्तीसाठी ४१ कोटी