शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी धनगर समाजाची पदयात्र

By admin | Updated: July 8, 2014 23:05 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटनेतच धनगर समाजाला आरक्षणाची तरतूद केली आहे.

बारामती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटनेतच धनगर समाजाला आरक्षणाची तरतूद केली आहे. देशात महाराष्ट्र वगळता सर्व राज्यात त्याची अंमलबजावणी केली जात आहे. या महाराष्ट्रातच मात्र, धनगर समाजाला आरक्षणाच्या सवलतीपासून दूर ठेवले जात आहे. 
राज्य सरकारला 21 जुलै र्पयतच मुदत दिली आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्रच देण्याची तरतूद करावी, अन्यथा 
आम्ही आमची निणार्यक भूमिका 
घेऊ, असा इशारा धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने आज देण्यात आला. 
आज पत्रकार परिषदेत कृती समितीचे प्रमुख हनुमंतराव सुळ, अॅड. जी. बी. गावडे, अविनाश मोटे आदींनी परिषदेत भूमिका स्पष्ट केली. अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्यासाठी 15 ते 21 जुलै दरम्यान पंढरपूर ते बारामती मोर्चाचे आयोजन केले आहे. 2क्क्9 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीरनाम्यात धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू, असे स्पष्ट केले होते. 
त्यामुळे त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला समाजाने पाठिंबा दिला. मात्र, 5 वर्षात या पक्षाच्या नेत्यांनी ठोस भूमिका घेतली नाही. तरी देखील पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावर आमचा विश्वास आहे. त्यांनीच हलचाली करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर दबाव आणून धनगर समाजाचा 6क् वर्षापासून प्रलंबित आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. महाराष्ट्र वगळता इतर सर्व राज्यात त्याची अंमलबजावणी सुरुवातीपासूनच झाली आहे. फक्त या भागातच आम्हाला न्याय मिळत नाही. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाच्या सवलती देऊन डोंगर, द:यात फिरणा:या धनगर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, आजर्पयतच्या सर्व राजकत्र्यानी धनगर समाजाला आरक्षणाच्या सवलतींपासून दूर ठेवले आहे. आता राज्याने केंद्राकडे शिफारस करावी, अशी आमची मागणीच नाही. राज्य घटनेतच आरक्षणाची तरतूद आहे. थेट आता आम्हाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्रच मिळावे, यासाठी आमचा लढा आहे, असे सुळ यांनी सांगितले. (वार्ताहर)