शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पीएच.डी. विद्यावेतन पूर्ववत

By admin | Updated: April 6, 2017 01:07 IST

यूजीसीकडून दिला जाणारा निधी बंद झाला असला तरी विद्यापीठ फंडातून त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पीएच.डी. व एम.फिल. करीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनासाठी (स्टायपेंड) यूजीसीकडून दिला जाणारा निधी बंद झाला असला तरी विद्यापीठ फंडातून त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे पीएच.डी व एम.फिलच्या अभ्यासक्रमासाठी नव्याने प्रवेश घेणाऱ्यांना विद्यार्थ्यांनाही यापुढे विद्यावेतन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.यूजीसीकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्याला महिना ८ हजार (४ वर्षे) तर एम.फिल करणाऱ्या विद्यार्थ्याला महिना ५ हजार (१८ महिने) विद्यावेतन दिले जाते. दरम्यान यूजीसीकडून विद्यावेतनासाठी दिला जाणारा निधी बंद झाल्याने नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळणार का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र यूजीसीचा निधी बंद झाला असला तरी विद्यापीठ फंडातून यासाठी निधी उपलब्ध करून देऊन विद्यावेतन सुरूच ठेवणार असल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांना संशोधनामध्ये मदत म्हणून त्यांना विद्यापीठाकडून विद्यावेतन दिले जाते. विद्यार्थ्यांनी पूर्णवेळ संशोधनासाठी देऊन दर्जेदार संशोधन करावे, यासाठी विद्यापीठाकडून ही मदत केली जात आहे. यूजीसीने यासाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यातून अनेक विद्यार्थ्यांना विद्यावेतन उपलब्ध करून देण्यात आले. आगामी शैक्षणिक वर्षाच्या (२०१७-१८) पीएच.डी व एम.फिल अभ्यासक्रमासाठी लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. विद्यापीठाकडून विद्यावेतन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एम.फिल व पीएच.डी करू इच्छिणाऱ्या अनेक गरजू विद्यार्थ्यांना या निर्णयाने मोठी मदत होणार आहे. (प्रतिनिधी)विद्यावेतनामुळे पुण्यात राहण्याच्या खर्चाच्या प्रश्न मिटणार असल्यामुळे बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांना एम.फिल व पीएच.डी़ प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहेत.एम़ए़, एमएस्सी पूर्ण झाल्यानंतर एम.फिल करीत नेट/सेटची तयारी करण्यावर विद्यार्थ्यांकडून प्राधान्य दिले जाते. नेट/सेट व एम.फिलची डिग्री एकाच वेळी मिळवून प्राध्यापक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास त्यांना विद्यावेतनामुळे मदत होणार आहे.