शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

फडणीस, सरवटे यांना ‘जीवनगौरव’

By admin | Updated: April 17, 2016 02:14 IST

अखिल भारतीय व्यंगचित्रकार संस्था ‘कार्टूनिस्ट्स कंबाइन’ आयोजित ‘व्यंगदर्शन २०१६’ या व्यंगचित्रकारांच्या संमेलनात ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द.फडणीस आणि वसंत सरवटे

मुंबई : अखिल भारतीय व्यंगचित्रकार संस्था ‘कार्टूनिस्ट्स कंबाइन’ आयोजित ‘व्यंगदर्शन २०१६’ या व्यंगचित्रकारांच्या संमेलनात ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द.फडणीस आणि वसंत सरवटे यांना व्यंगचित्रकलेतील अमूल्य योगदानाबाबत ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते हे दोन्ही पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्या वतीने हा पुरस्कार त्यांच्या कन्या मंजिरी आणि अंजली यांनी स्वीकारला, तर ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी आपल्या पत्नीच्या साथीने बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. सन्मानचिन्ह, मानपत्र, ५० हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.शनिवारी सावरकर स्मारकात पार पडलेल्या या संमेलनाचे उद्घाटन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आले. व्यंगचित्रकला हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. चार ते पाच अग्रलेखांत जे काम होत नाही, ते केवळ एका चित्रातून साध्य करता येते. हे संमेलन केवळ व्यंगचित्रकारांचे नाही, तर साहित्यिकांचेसुद्धा आहे. व्यंगचित्रकारसुद्धा विशेष शैलीतून रेषांच्या माध्यमातून साहित्यनिर्मिती करत असतात, अशा शब्दांत महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यंगचित्रकलेची प्रशंसा केली. या वेळी मनसे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे, संस्थेचे अध्यक्ष चारुहास पंडित उपस्थित होते. पुरंदरे पुढे म्हणाले की, ‘व्यंगचित्रकलेला प्रतिभेची नितांत आवश्यकता असते. या कलेसाठी परमेश्वरांचे देणं असणे महत्त्वाचे आहे. बुद्धी आणि कल्पकतेचा संगम जिथे होतो, तिथे व्यंगचित्रकलेचा जन्म होतो. या कलेत खूप मोठे सामर्थ्य आहे.’ या संमेलनात ज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंत सरवटे आणि शि. द. फडणीस यांच्या व्यंगचित्रकलेच्या क्षेत्राचा आढावा घेणारी दृकश्राव्य फित दाखविण्यात आली. या वेळी सरवटे यांनी दृकश्राव्य माध्यमातून उपस्थितांचे आभार मानत आपले बालमित्र फडणीस यांना शुभेच्छा दिल्या. (प्रतिनिधी)आनंद अपुराच -शि.द.फडणीस‘७० वर्षे मी व्यंगचित्रकलेच्या क्षेत्रात आहे. ही व्यंगचित्र कशी वाटतात, याची पोचपावती या पुरस्काराच्या माध्यमातून मिळाली. पुरस्कार मिळूनही आनंद अपुराच आहे. बालमित्र वसंत सरवटे याला पुरस्कार मिळाला. मात्र, तो मंचावर आज उपस्थित राहू शकला नाही, याची खंत वाटते आहे. आम्हाला लेखक व्हायचे होते. यासाठी एका वृत्तपत्रात दोघांनी कथा पाठविल्या होत्या. त्या कथा पाठवून ७५ वर्षे उलटली. मात्र, तरीही त्यावर उत्तर आले नाही. यामागे सुप्त संदेश होता, हे आमच्या लक्षात आले. आम्हाला व्यक्त होण्यासाठी शब्दांची गरज नाही, हे कळून चुकले. तेव्हापासून मी, कॅनव्हास आणि माझा मित्र एकमेकांची साथ देतो आहोत. चित्रे लहान असली तरी चालेल, पण मनाचा कॅनव्हास मोठा ठेवा,’ असा सल्ला फडणीस यांनी दला.अमोल ठाकूरने मारली बाजी! या संमेलनात घेण्यात आलेल्या व्यंगचित्र स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा शनिवारी पार पडला. या स्पर्धेसाठी मोबाइलचे वेड, सेल्फी, स्मार्ट सिटी आणि असहिष्णुता असे विषय देण्यात आले होते. या पारितोषिक वितरण समारंभात प्रथम पारितोषिक विजेत्या अमोलने राज ठाकरे यांचे व्यंगचित्र रेखाटले. हे व्यंगचित्र समारंभात राज यांना दाखवून त्यावर त्यांची स्वाक्षरी घेतली. या प्रसंगी राज यांनीही त्याने चितारलेल्या व्यंगचित्राला दाद दिली. १० उत्तेजनार्थ विजेत्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

प्रथम क्रमांक : अमोल ठाकूर, (२५ हजार, सन्मानचिन्ह)द्वितीय क्रमांक : रवीश धनावडे (१५ हजार, सन्मानचिन्ह)तृतीय क्रमांक : रवींद्र राणे (१० हजार, सन्मानचिन्ह)