शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

फडणवीसजी ‘फिटलं’ म्हणा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 02:07 IST

राज्य सरकार दात कोरून कर्जमाफी देत आहे. ही दिशाभूल आहे. तत्त्वत:, अंशत: हे शब्द वापरण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी कर्ज ‘फिटलं’ हा शब्द शेतक-यांना

अहमदनगर : राज्य सरकार दात कोरून कर्जमाफी देत आहे. ही दिशाभूल आहे. तत्त्वत:, अंशत: हे शब्द वापरण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी कर्ज ‘फिटलं’ हा शब्द शेतकºयांना द्यावा, अशा शब्दांत राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरसकट कर्जमाफीची मागणी सरकारकडे केली.उत्तर प्रदेशात कर्जमाफी चालते मग, मोदींना महाराष्टÑात याचा बोजा का वाटतो? असा सवालही त्यांनी भेंडा (ता. नेवासा) येथे संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सर्वपक्षीय सत्कार समारंभात केला.पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री सर्वश्री बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे, जयंत पाटील, बबनराव पाचपुते तसेच यशवंतराव गडाख आदी उपस्थित होते.भाषणात पवारांनी क्रांतिसिंह नाना पाटलांची आठवण सांगितली. बीडमधून नाना पाटील हे लोकसभेवर विजयी झाले होते. मला निवडून दिल्यास तुमचं ‘फिटलं’ म्हणून समजा, असे आश्वासन त्यांनी शेतकºयांना गावोगावी दिले होते. त्या एका शब्दावर ते विजयी झाले. फडणविसांनीही सगळ्या शेतकºयांचे सरसकट कर्ज माफ करावे. तेव्हाच कर्ज ‘फिटलं’ असे म्हणता येईल, असे ते म्हणाले.कालच केंद्र सरकारने उद्योजकांचे ८२ हजार कोटींचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. त्याची चर्चा नाही. शेतकºयांच्या कर्जमाफीची मात्र लगेच चर्चा होते. शेतमालाला भाव दिल्यास शेतकरी कर्जमाफी मागणार नाही.मात्र, सरकार दोन्ही गोष्टी करत नसल्याने ही परिस्थिती उद्भवली. नाशिकचे अतिरिक्त पाणी गोदावरी खोºयात वळविता येईल. पण त्याबाबत केंद्र पातळीवर निर्णय होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.मी करंगळीचे माप शोधतोयनरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशला कर्जमाफीचे आश्वासन दिले व प्रत्यक्षात दिलीही. महाराष्टÑाची कर्जमाफी मात्र त्यांना ओझे वाटते. पंतप्रधानांचे धोरण हे राज्यानुसार कसे बदलते? हा प्रश्न आपणाला पडतो. हेच मोदी ‘पवारांची करंगळी पकडून आपण राजकारण करतो,’ असे सांगतात. त्यांच्या या म्हणण्यामुळे मी सध्या दररोज माझ्या करंगळीचे माप घेतोय, असा मिश्किल टोला पवार यांनी लगावला.आपण पवारांसोबत - राधाकृष्ण विखेआपल्याबाबत सर्व राज्यात उत्सुकता आहे. मात्र, काही होणार नाही, काळजी करू नका, असे राधाकृष्ण विखे भाषणात म्हणाले. माझ्याबाबत तुम्हाला कोणी काहीही सांगेल. पण आम्ही तुमच्यासोबत आहोत, असेही ते पवारांना उद्देशून म्हणाले.