शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

शेतकर्‍यांच्या आर्थिक लूटप्रकरणी याचिका

By admin | Updated: May 10, 2014 19:11 IST

धुळे : शेतीपंपासाठी नवीन वीज जोडणी मागणार्‍या शेतकर्‍यांना तातडीने जोडणी (कनेक्शन) हवी असेल तर विद्युत खांब, वाहिनीसह जोडणीचा सर्व खर्च स्वत: करावा लागेल,

 

धुळे : शेतीपंपासाठी नवीन वीज जोडणी मागणार्‍या शेतकर्‍यांना तातडीने जोडणी (कनेक्शन) हवी असेल तर विद्युत खांब, वाहिनीसह जोडणीचा सर्व खर्च स्वत: करावा लागेल, हा महावितरण कंपनीने काढलेला फतवा रद्द करण्यासाठी महाराष्टÑ वीज ग्राहक संघटनेने महाराष्टÑ विद्युत नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी आयोगाच्या आदेशाचा भंग केल्याबद्दल कंपनी व सर्व संबंधित अधिकार्‍यांविरुद्ध शिक्षेची कठोर कारवाई करून हा फतवाही रद्द करावा, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. या संदर्भात संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे व प्रा.श्याम पाटील यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, महावितरण कंपनी पूर्वी आॅऊट राईट कॉन्ट्रिब्युशन (ओआरसी) नावाने अशी वसुली करीत होती. परंतु नवीन वीज कायदा आल्यानंतर आयोगाने सप्टेंबर ०६ मध्ये आकारांची अनुसूची जाहीर केली व अशी वसुली करता येणार नाही, हे स्पष्ट केले. तरीही अशी बेकायदा वसुली सुरूच राहिल्याने संघटनेने आयोगासमोर याचिका दाखल केली. त्या वेळी आयोगाने कंपनीस दोन लाख रुपये दंड ठोठावला होता. तसेच बेकायदेशीररीत्या घेतलेल्या रकमाही परत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कंपनीने दोन परिपत्रके जाहीर करून अशी वसुली थांबविली. त्यामुळे शेतकर्‍यांनी खांब, वाहिनी आदी खर्च केला तरी त्या रकमांचा परतावा मिळू लागला. त्यामुळे शेतकर्‍यांना तातडीने वीज जोडणी घेणे शक्य झाले. त्यानंतर २००८ पासून गेल्या सहा वर्षात कायदा, विनिमय व आदेश यात कोणताही बदल झालेला नसताना सरकारी मुजोर प्रवृत्तीच्या कंपनी अधिकार्‍यांनी चालू वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात हा बेकायदा फतवा काढला. त्यानुसार शेतकर्‍यांस विनाखर्च जोडणी हवी असेल तर ती शासकीय योजनांमधून चार/पाच वर्षांनी केव्हाही उपलब्धतेनुसार मिळेल. खर्च परतावा (नॉन डीडीएफ) योजनेंतर्गत जोडणी मिळणार नाही, असे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे राज्यातील नवीन वीज जोडणी घेणार्‍या शेतकर्‍यांची तसेच जोडणी अर्ज प्रलंबित असलेल्या अंदाजे एक लाख ग्राहकांची बेकायदेशीर आर्थिक लूट होणार आहे.