शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

शेतकर्‍यांच्या आर्थिक लूटप्रकरणी याचिका

By admin | Updated: May 10, 2014 19:11 IST

धुळे : शेतीपंपासाठी नवीन वीज जोडणी मागणार्‍या शेतकर्‍यांना तातडीने जोडणी (कनेक्शन) हवी असेल तर विद्युत खांब, वाहिनीसह जोडणीचा सर्व खर्च स्वत: करावा लागेल,

 

धुळे : शेतीपंपासाठी नवीन वीज जोडणी मागणार्‍या शेतकर्‍यांना तातडीने जोडणी (कनेक्शन) हवी असेल तर विद्युत खांब, वाहिनीसह जोडणीचा सर्व खर्च स्वत: करावा लागेल, हा महावितरण कंपनीने काढलेला फतवा रद्द करण्यासाठी महाराष्टÑ वीज ग्राहक संघटनेने महाराष्टÑ विद्युत नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी आयोगाच्या आदेशाचा भंग केल्याबद्दल कंपनी व सर्व संबंधित अधिकार्‍यांविरुद्ध शिक्षेची कठोर कारवाई करून हा फतवाही रद्द करावा, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. या संदर्भात संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे व प्रा.श्याम पाटील यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, महावितरण कंपनी पूर्वी आॅऊट राईट कॉन्ट्रिब्युशन (ओआरसी) नावाने अशी वसुली करीत होती. परंतु नवीन वीज कायदा आल्यानंतर आयोगाने सप्टेंबर ०६ मध्ये आकारांची अनुसूची जाहीर केली व अशी वसुली करता येणार नाही, हे स्पष्ट केले. तरीही अशी बेकायदा वसुली सुरूच राहिल्याने संघटनेने आयोगासमोर याचिका दाखल केली. त्या वेळी आयोगाने कंपनीस दोन लाख रुपये दंड ठोठावला होता. तसेच बेकायदेशीररीत्या घेतलेल्या रकमाही परत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कंपनीने दोन परिपत्रके जाहीर करून अशी वसुली थांबविली. त्यामुळे शेतकर्‍यांनी खांब, वाहिनी आदी खर्च केला तरी त्या रकमांचा परतावा मिळू लागला. त्यामुळे शेतकर्‍यांना तातडीने वीज जोडणी घेणे शक्य झाले. त्यानंतर २००८ पासून गेल्या सहा वर्षात कायदा, विनिमय व आदेश यात कोणताही बदल झालेला नसताना सरकारी मुजोर प्रवृत्तीच्या कंपनी अधिकार्‍यांनी चालू वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात हा बेकायदा फतवा काढला. त्यानुसार शेतकर्‍यांस विनाखर्च जोडणी हवी असेल तर ती शासकीय योजनांमधून चार/पाच वर्षांनी केव्हाही उपलब्धतेनुसार मिळेल. खर्च परतावा (नॉन डीडीएफ) योजनेंतर्गत जोडणी मिळणार नाही, असे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे राज्यातील नवीन वीज जोडणी घेणार्‍या शेतकर्‍यांची तसेच जोडणी अर्ज प्रलंबित असलेल्या अंदाजे एक लाख ग्राहकांची बेकायदेशीर आर्थिक लूट होणार आहे.