शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

‘समृद्धी’विरोधात याचिका , शेतकरी संघर्ष समिती उच्च न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 05:31 IST

तालुक्यातील २७ गावांतील शेतकरी, आदिवासी, भूधारकांनी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष विनायक पवार यांच्यामार्फत समृद्धी प्रकल्पाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे.

शहापूर : तालुक्यातील २७ गावांतील शेतकरी, आदिवासी, भूधारकांनी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष विनायक पवार यांच्यामार्फत समृद्धी प्रकल्पाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. याचिकेमध्ये राज्यसरकारने पारित केलेला महाराष्टÑ महामार्ग अधिनियम, २०१६ आणि त्यातील तरतुदींना आव्हान दिले आहे. हा कायदा घटनाबाह्य असून केंद्र शासनाचा भूसंपादन, पुनर्वसन, पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ च्या तरतुदींचे उल्लंघन करणारा असल्याचे जाहीर करून तो मिळण्याची मागणी याचिकेत केली आहे. या महामार्गाला सुरु वातीपासूनच शेतकºयांचा विरोध आहे. त्यासाठी धरणे, मोर्चा, आंदोलने अशा मार्गाने विरोध झाला. असे असूनही शेतकºयांकडून जमिनी खरेदी करण्यात येत आहेत. ‘समृद्धी’साठी देखील ‘महसूल शेतकºयांच्या दारी’, असे अभियान राबवण्यात आले.शहापुर तालुक्यातील २७ गावांनी प्रकल्पाविरोधात ठराव देऊन तसेच शेकडो शेतकºयांनी, भूधारकांनी लेखी हरकती देऊनही त्यांना सरकारी अधिकाºयांनी सुनावणीची कुठलीही संधी दिलेली नाही. त्यामुळे पेसा कायद्याचे देखील सरकारने उल्लंघन केले आहे. जमीन मालकाची संमती नसतानाही जबरदस्तीने आणि पोलिसी बळाचा वापर करून धमकावून सह्या घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ही जनिहत याचिका दाखल करण्यात आल्याचे संघर्ष समितीचे विनायक पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Courtन्यायालय