अतुल कुलकर्णी - मुंबई
कोणाच्या कितीही जागा आल्या तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच होतील, असे विधान मनोहर जोशी यांनी केले आहे, पण जोशी सरांचे त्यांच्या पक्षात किती ऐकले जाते हे मी सांगण्याची गरज आहे का? असा टोमणा लगावत निवडणुकीनंतर कोणाच्या किती जागा येतात त्यावरच नेता ठरवला जाईल, असे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
लोकमतच्या संपादकीय विभागाशी वार्तालाप करताना ते बोलत होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाला बहुजनी चेहरा दिला. ती ओळख आम्ही कायम ठेवण्याचा प्रय} करू. त्यासाठी राज्यात सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग आम्ही राबवू. आपल्यासह एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार असे आम्ही चौघे मिळून जो पक्षांतर्गत निर्णय घेऊ, असे तावडे यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना किती जागा लढवेल हे महत्त्वाचे नाही, तर कोणाच्या कोणत्या जागा निवडून येतात हे पाहून जागांचे वाटप होणो महत्त्वाचे आहे. त्यामुळे अनेक जागांमध्ये मोठय़ा प्रमाणावर फेरबदल होतील, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली.
‘असेल मोदी तर मिळेल गादी’ या भ्रमात आम्ही नाही. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार रोज सह्याद्री विश्रमगृहावर, पक्षाच्या कार्यालयात बसून बैठका घेत आहेत, प्रत्येकाशी बोलून टिपणं काढत आहेत. त्यामुळे आम्ही कोठेही हवेत नाही. आमचे पाय जमिनीवर आहेत आणि शेतक:यांच्या नावावर बँका आणि साखर कारखान्यांच्या भ्रष्ट संचालकांना पैसा उपलब्ध करून देण्याचे त्यांचे राजकारण आम्ही जनतेसमोर आणू, असेही एका प्रश्नाला उत्तर देताना तावडे म्हणाले.
काँग्रेस कधीच निधर्मी नव्हती मात्र त्यांची स्वत:ची तशी प्रतिमा तयार केली होती, असे सांगून तावडे म्हणाले, दोन्ही काँग्रेसने कायम मुस्लीम, दलित आणि मराठा समाजाच्या मतांचे राजकारण केले. पंतप्रधान मोदींनी ‘सबका साथ, सबका विकास’ हा नारा दिला आहे. हाच विचार घेऊन आम्ही विधानसभा निवडणुकीला समोरे जाणार
आहोत, असे तावडे यांनी
सांगितले.