शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
3
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
4
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
5
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
6
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
7
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
8
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
9
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
10
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
12
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
13
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
14
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
15
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
16
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
17
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
19
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
20
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले

कोणाच्या जागा किती, यावरच नेता ठरेल - तावडे

By admin | Updated: June 20, 2014 03:32 IST

निवडणुकीनंतर कोणाच्या किती जागा येतात त्यावरच नेता ठरवला जाईल, असे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

अतुल कुलकर्णी - मुंबई
कोणाच्या कितीही जागा आल्या तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच होतील, असे विधान मनोहर जोशी यांनी केले आहे, पण जोशी सरांचे त्यांच्या पक्षात किती ऐकले जाते हे मी सांगण्याची गरज आहे का? असा टोमणा लगावत निवडणुकीनंतर कोणाच्या किती जागा येतात त्यावरच नेता ठरवला जाईल, असे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
लोकमतच्या संपादकीय विभागाशी वार्तालाप करताना ते बोलत होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाला बहुजनी चेहरा दिला. ती ओळख आम्ही कायम ठेवण्याचा प्रय} करू. त्यासाठी राज्यात सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग आम्ही राबवू. आपल्यासह एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार असे आम्ही चौघे मिळून जो पक्षांतर्गत निर्णय घेऊ, असे तावडे यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना किती जागा लढवेल हे महत्त्वाचे नाही, तर कोणाच्या कोणत्या जागा निवडून येतात हे पाहून जागांचे वाटप होणो महत्त्वाचे आहे. त्यामुळे अनेक जागांमध्ये मोठय़ा प्रमाणावर फेरबदल होतील, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली.
‘असेल मोदी तर मिळेल गादी’ या भ्रमात आम्ही नाही. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार रोज सह्याद्री विश्रमगृहावर, पक्षाच्या कार्यालयात बसून बैठका घेत आहेत, प्रत्येकाशी बोलून टिपणं काढत आहेत. त्यामुळे आम्ही कोठेही हवेत नाही. आमचे पाय जमिनीवर आहेत आणि शेतक:यांच्या नावावर बँका आणि साखर कारखान्यांच्या भ्रष्ट संचालकांना पैसा उपलब्ध करून देण्याचे त्यांचे राजकारण आम्ही जनतेसमोर आणू, असेही एका प्रश्नाला उत्तर देताना तावडे म्हणाले. 
काँग्रेस कधीच निधर्मी नव्हती मात्र त्यांची स्वत:ची तशी प्रतिमा तयार केली होती, असे सांगून तावडे म्हणाले, दोन्ही काँग्रेसने कायम मुस्लीम, दलित आणि मराठा समाजाच्या मतांचे राजकारण केले. पंतप्रधान मोदींनी ‘सबका साथ, सबका विकास’ हा नारा दिला आहे. हाच विचार घेऊन आम्ही विधानसभा निवडणुकीला समोरे जाणार 
आहोत, असे तावडे यांनी 
सांगितले.