शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

कोणाच्या जागा किती, यावरच नेता ठरेल - तावडे

By admin | Updated: June 20, 2014 03:32 IST

निवडणुकीनंतर कोणाच्या किती जागा येतात त्यावरच नेता ठरवला जाईल, असे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

अतुल कुलकर्णी - मुंबई
कोणाच्या कितीही जागा आल्या तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच होतील, असे विधान मनोहर जोशी यांनी केले आहे, पण जोशी सरांचे त्यांच्या पक्षात किती ऐकले जाते हे मी सांगण्याची गरज आहे का? असा टोमणा लगावत निवडणुकीनंतर कोणाच्या किती जागा येतात त्यावरच नेता ठरवला जाईल, असे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
लोकमतच्या संपादकीय विभागाशी वार्तालाप करताना ते बोलत होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाला बहुजनी चेहरा दिला. ती ओळख आम्ही कायम ठेवण्याचा प्रय} करू. त्यासाठी राज्यात सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग आम्ही राबवू. आपल्यासह एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार असे आम्ही चौघे मिळून जो पक्षांतर्गत निर्णय घेऊ, असे तावडे यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना किती जागा लढवेल हे महत्त्वाचे नाही, तर कोणाच्या कोणत्या जागा निवडून येतात हे पाहून जागांचे वाटप होणो महत्त्वाचे आहे. त्यामुळे अनेक जागांमध्ये मोठय़ा प्रमाणावर फेरबदल होतील, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली.
‘असेल मोदी तर मिळेल गादी’ या भ्रमात आम्ही नाही. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार रोज सह्याद्री विश्रमगृहावर, पक्षाच्या कार्यालयात बसून बैठका घेत आहेत, प्रत्येकाशी बोलून टिपणं काढत आहेत. त्यामुळे आम्ही कोठेही हवेत नाही. आमचे पाय जमिनीवर आहेत आणि शेतक:यांच्या नावावर बँका आणि साखर कारखान्यांच्या भ्रष्ट संचालकांना पैसा उपलब्ध करून देण्याचे त्यांचे राजकारण आम्ही जनतेसमोर आणू, असेही एका प्रश्नाला उत्तर देताना तावडे म्हणाले. 
काँग्रेस कधीच निधर्मी नव्हती मात्र त्यांची स्वत:ची तशी प्रतिमा तयार केली होती, असे सांगून तावडे म्हणाले, दोन्ही काँग्रेसने कायम मुस्लीम, दलित आणि मराठा समाजाच्या मतांचे राजकारण केले. पंतप्रधान मोदींनी ‘सबका साथ, सबका विकास’ हा नारा दिला आहे. हाच विचार घेऊन आम्ही विधानसभा निवडणुकीला समोरे जाणार 
आहोत, असे तावडे यांनी 
सांगितले.