शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात परराज्यातील बीफ बाळगायला परवानगी

By admin | Updated: May 6, 2016 17:28 IST

महाराष्ट्र सरकारने केलेला बीफ (गोवंश) हत्या बंदीचा कायदा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. मात्र परराज्यातील बीफ बाळगायला न्यायालयाने परवानगी दिली आहे.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. ६ - महाराष्ट्र सरकारने केलेला बीफ (गोवंश) हत्या बंदीचा कायदा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. मात्र परराज्यातील बीफ बाळगायला न्यायालयाने परवानगी दिली आहे. कलम ५ डी न्यायालयाने असंवैधानिक ठरवले आहे. या कलमामुळे नागरीकांच्या मूलभूत हक्कावर गदा येते असे न्यायालयाने म्हटले आहे. 
 
मुंबई उच्च न्यायालयाने राज्यामध्ये गाईची हत्या करण्यास बंदी आहेच, हे अधोरेखीत केले असून गोवंश हत्या बंदीचा सरकारचा कायदाही वैध ठरवला आहे. न्यायालयाने 5 सी व 5 डी ही दोन कलमं एकत्र केली आहेत. त्यामुळे 5 डी अंतर्गत , बीफ बाळगल्यास 9 बीची शिक्षा, 2000 रुपये दंड व एक वर्ष तुरुंगवास आता लागू होणार नाही. तर, गोवंशाच्या हत्येसाठी, विक्रीसाठी 5 वर्षापर्यंत तुरुंगवास व 10 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो, हे स्पष्ट झाले आहे.
 
त्यामुळे ज्या राज्यांमध्ये गोवंश हत्येवर बंदी नाही अशा राज्यातून एखाद्या व्यक्तिने बीफ आणलं आणि तुमच्या घरी ठेवलं, तर तुम्हाला शिक्षा होणार नाही. तर त्या परराज्यातून बीफ आणणाऱ्या व्यक्तिला 5 सी अंतर्गत शिक्षा होईल.
उच्च न्यायालयाच्या या निवाड्यामुळे महाराष्ट्रात बीफ बंदी असल्याचे स्पष्ट झाले आहे, आणि अजाणतेपणी एखाद्याकडे बीफ असेल तर त्याचा बळी जाणार नाही हे देखील स्पष्ट झाले आहे.
बीफ बाळगण्याला गुन्ह्याच्या कक्षेतून वगळू नये यासाठी राज्य सरकारने याचिका दाखल केली होती. मात्र न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती सुरेश गुप्ते यांनी याचिका फेटाळून लावली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रात अजाणतेपणी बीफ बाळगण गुन्हा ठरणार नाही.
 
थोडक्यात काय सांगतो न्यायालयाचा निकाल :
 
-  महाराष्ट्रात गोवंशाच्या हत्येस अथवा बीफ बाळगण्यास बंदी कायम.
- परराज्यातूनही राज्यात बीफ आणता येणार नाही.
- जाणतेपणी राज्यातील अथवा परराज्यातील बीफ बाळगण्यास बंदी.
- अजाणतेपणी बीफ बाळगलं असेल तर तो गुन्हा नाही.
- गोवंशाची हत्या केल्यास, हत्येसाठी विक्री केल्यास 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास व 10 हजार रुपयांचा दंड.
 
बीफ बॅनचा घटनाक्रम:
 
- केंद्रात व राज्यात भाजपा आघाडीचं सरकार आल्यावर, महाराष्ट्रात बीफ बॅन करण्याच्या कायद्यावर राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी स्वाक्षरी केली आणि 3 मार्च 2015 रोजी बीफ बॅन लागू झाला.
- तब्बल 19 वर्षांनंतर हा कायदा प्रस्तावित केल्यानंतर अस्तित्वात आला.
- या बंदीमुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या 3 लाख लोकांचा रोजगार बुडेल असा आक्षेप घेण्यात आला.
- बीफच्या व्यवसायात मुस्लीम समाज मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे हा निर्णय घेतल्याची टीका झाली.
- मात्र, हा निर्णय कुणा धर्मीयांच्या विरोधात नसून शेतकऱ्यांच्या हितासाठी असल्याचा भाजपाचा दावा.
- बंदीविरोधात संबंधितांनी न्यायालयात धाव घेतली.
- अखेर न्यायालयाने बीफ बंदी कायम ठेवली, पण अजाणतेपणी बीफ बाळगलं तर तो गुन्हा नसेल हे स्पष्ट केलं.
 
काय आहे सेक्शन ५ डी