शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
4
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
7
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
8
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
11
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
12
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
13
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
14
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
15
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
16
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
17
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
18
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
19
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
20
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम

महाराष्ट्रात परराज्यातील बीफ बाळगायला परवानगी

By admin | Updated: May 6, 2016 17:28 IST

महाराष्ट्र सरकारने केलेला बीफ (गोवंश) हत्या बंदीचा कायदा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. मात्र परराज्यातील बीफ बाळगायला न्यायालयाने परवानगी दिली आहे.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. ६ - महाराष्ट्र सरकारने केलेला बीफ (गोवंश) हत्या बंदीचा कायदा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. मात्र परराज्यातील बीफ बाळगायला न्यायालयाने परवानगी दिली आहे. कलम ५ डी न्यायालयाने असंवैधानिक ठरवले आहे. या कलमामुळे नागरीकांच्या मूलभूत हक्कावर गदा येते असे न्यायालयाने म्हटले आहे. 
 
मुंबई उच्च न्यायालयाने राज्यामध्ये गाईची हत्या करण्यास बंदी आहेच, हे अधोरेखीत केले असून गोवंश हत्या बंदीचा सरकारचा कायदाही वैध ठरवला आहे. न्यायालयाने 5 सी व 5 डी ही दोन कलमं एकत्र केली आहेत. त्यामुळे 5 डी अंतर्गत , बीफ बाळगल्यास 9 बीची शिक्षा, 2000 रुपये दंड व एक वर्ष तुरुंगवास आता लागू होणार नाही. तर, गोवंशाच्या हत्येसाठी, विक्रीसाठी 5 वर्षापर्यंत तुरुंगवास व 10 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो, हे स्पष्ट झाले आहे.
 
त्यामुळे ज्या राज्यांमध्ये गोवंश हत्येवर बंदी नाही अशा राज्यातून एखाद्या व्यक्तिने बीफ आणलं आणि तुमच्या घरी ठेवलं, तर तुम्हाला शिक्षा होणार नाही. तर त्या परराज्यातून बीफ आणणाऱ्या व्यक्तिला 5 सी अंतर्गत शिक्षा होईल.
उच्च न्यायालयाच्या या निवाड्यामुळे महाराष्ट्रात बीफ बंदी असल्याचे स्पष्ट झाले आहे, आणि अजाणतेपणी एखाद्याकडे बीफ असेल तर त्याचा बळी जाणार नाही हे देखील स्पष्ट झाले आहे.
बीफ बाळगण्याला गुन्ह्याच्या कक्षेतून वगळू नये यासाठी राज्य सरकारने याचिका दाखल केली होती. मात्र न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती सुरेश गुप्ते यांनी याचिका फेटाळून लावली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रात अजाणतेपणी बीफ बाळगण गुन्हा ठरणार नाही.
 
थोडक्यात काय सांगतो न्यायालयाचा निकाल :
 
-  महाराष्ट्रात गोवंशाच्या हत्येस अथवा बीफ बाळगण्यास बंदी कायम.
- परराज्यातूनही राज्यात बीफ आणता येणार नाही.
- जाणतेपणी राज्यातील अथवा परराज्यातील बीफ बाळगण्यास बंदी.
- अजाणतेपणी बीफ बाळगलं असेल तर तो गुन्हा नाही.
- गोवंशाची हत्या केल्यास, हत्येसाठी विक्री केल्यास 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास व 10 हजार रुपयांचा दंड.
 
बीफ बॅनचा घटनाक्रम:
 
- केंद्रात व राज्यात भाजपा आघाडीचं सरकार आल्यावर, महाराष्ट्रात बीफ बॅन करण्याच्या कायद्यावर राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी स्वाक्षरी केली आणि 3 मार्च 2015 रोजी बीफ बॅन लागू झाला.
- तब्बल 19 वर्षांनंतर हा कायदा प्रस्तावित केल्यानंतर अस्तित्वात आला.
- या बंदीमुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या 3 लाख लोकांचा रोजगार बुडेल असा आक्षेप घेण्यात आला.
- बीफच्या व्यवसायात मुस्लीम समाज मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे हा निर्णय घेतल्याची टीका झाली.
- मात्र, हा निर्णय कुणा धर्मीयांच्या विरोधात नसून शेतकऱ्यांच्या हितासाठी असल्याचा भाजपाचा दावा.
- बंदीविरोधात संबंधितांनी न्यायालयात धाव घेतली.
- अखेर न्यायालयाने बीफ बंदी कायम ठेवली, पण अजाणतेपणी बीफ बाळगलं तर तो गुन्हा नसेल हे स्पष्ट केलं.
 
काय आहे सेक्शन ५ डी