शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

‘मेक इन इंडिया’च्या कार्यक्रमाला नाकारली परवानगी

By admin | Updated: January 29, 2016 01:57 IST

भाजप सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या ‘मेक इन इंडिया’ला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने झटका दिला. ‘मेक इन इंडिया’मध्ये राज्याचे अस्तित्त्व दाखवण्यासाठी राज्य सरकारने

मुंबई : भाजप सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या ‘मेक इन इंडिया’ला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने झटका दिला. ‘मेक इन इंडिया’मध्ये राज्याचे अस्तित्त्व दाखवण्यासाठी राज्य सरकारने १ फेब्रुवारीपासून १५ फेब्रुवारीपर्यंत मुंबईत वेगवेगळया ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले आहेत. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून १४ फेब्रुवारी रोजी ‘महाराष्ट्र नाइट’ हा सांस्कृतिक कार्यक्रम गिरगाव चौपाटीवर आयोजित करण्यात येणार होता. मात्र गिरगाव चौपाटीवर हा कार्यक्रम आयोजित करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. हे आयोजन अपावादात्मक नसल्याचे सांगून न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले.देशातील व परदेशातील महत्त्वाच्या व्यक्ती येणार यासाठी यापूर्वी न्यायालयाने स्वीकारलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे म्हणत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका दिला.राज्य सरकारतर्फे महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांनी युक्तिवाद करताना म्हटले की, हा कार्यक्रम ‘अपवादात्मक कार्यक्रम’ करून गिरगाव चौपाटीवर आयोजित करण्याची परवानगी द्यावी. राज्याचा अमृतोत्सव साजरा करण्यासाठी उच्च न्यायालयाने गिरगाव चौपाटीवर कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी दिली होती. या कार्यक्रमासाठी तीन देशांचे पंतप्रधान येणार आहेत. आपल्या देशाच्या पंतप्रधानांसह परदेशातील ५७ अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीही उपस्थित असणार आहेत. दोन लाख चौ. फूट जागा या कार्यक्रमासाठी लागणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम गिरगाव चौपटीवर साजरा करण्याची परवानगी द्यावी,’ असेही अ‍ॅड. अणे यांनी खंडपीठाला सांगितले.‘२००१ मध्ये नियुक्त केलेल्या समितीने या ठिकाणी केवळ रामलीला, कृष्णलीला, गणेश व दुर्गा मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी परवानगी दिली आहे. याठिकाणी राजकीय सभा व अन्य कार्यक्रम साजरे करण्यास मनाई केली आहे. समितीने आखलेली मार्गदर्शक तत्त्वे राज्य सरकारनेही मंजूर केली होती. त्यामुळे राज्य सरकारने या कार्यक्रमाची गणती ‘अपवादात्मक कार्यक्रमात’ व्हावी, याऐवजी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करण्यासाठी अर्ज करायला हवा होता. या कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात आली तर अनेकजण पुन्हा न्यायालयात परवानगी मागण्यासाठी येतील. तसेच न्यायालयाचा निर्णय मार्गदर्शक तत्त्वांशी विसंगत ठरेल, असे न्यायलय म्हणाले. (प्रतिनिधी)