शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

कायमस्वरूपी अन्न आयोग ३ महिन्यांत

By admin | Updated: February 5, 2016 03:57 IST

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, २०१३ अंतर्गत प्रत्येक राज्यात कायमस्वरूपी अन्न आयोगाची स्थापना करणे आवश्यक आहे. मात्र, महाराष्ट्रात सध्या हंगामी तत्त्वावर अन्न आयोगाची स्थापना करण्यात आली आहे

मुंबई : राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, २०१३ अंतर्गत प्रत्येक राज्यात कायमस्वरूपी अन्न आयोगाची स्थापना करणे आवश्यक आहे. मात्र, महाराष्ट्रात सध्या हंगामी तत्त्वावर अन्न आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. या संदर्भात उच्च न्यायालयाने सुनावल्यानंतर गुरुवारी राज्य सरकाने कायमस्वरूपी अन्न आयोग येत्या तीन महिन्यांत स्थापण्यात येणार असल्याची माहिती दिली. आदिवासी भागातील नागरिकांना त्यांच्या घरापर्यंत अन्नधान्य पोहोचवण्याची सुविधा आहे. मात्र, शिधावाटप केंद्रे ही सुविधा पुरवत नाहीत, तसेच अन्नधान्याचा साठाही शिधावापट केंद्रात कमी येत असल्याने, आदिवासी नागरिकांना पुरेसे धान्यवाटप करण्यात येत नाही. त्या शिवाय कायद्याने बंधनकारक असलेला अन्न आयोग हंगामी तत्त्वावर नेमण्यात आल्याने, श्रम मुक्ती संघटनेने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती. गुरुवारच्या सुनावणीच्या वेळी मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी येत्या तीन महिन्यांत कायमस्वरूपी अन्न आयोगाची स्थापना करण्यात येईल, अशी माहिती खंडपीठाला दिली. (प्रतिनिधी)