शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
2
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
3
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
4
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
5
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
6
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
7
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
8
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
9
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
10
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
11
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
12
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
13
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
14
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?
15
नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
16
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
17
अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
18
‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...
19
मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!
20
RBI नं एका वर्षात १२ बँकांचे लायसन्स केले रद्द, जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा

परसबाग फुलवून ‘अ‍ॅनिमिया’मुक्ती!

By admin | Updated: April 24, 2017 03:28 IST

गावागावात ‘पारसबाग’ फुलवून, त्यातून सेंद्रीय पद्धतीने पोषक भाजीपाला पिकवून अ‍ॅनिमियावर मात करण्याचा प्रयोग विदर्भात यशस्वी झाला आहे

जीवन रामावत /नागपूरगावागावात ‘पारसबाग’ फुलवून, त्यातून सेंद्रीय पद्धतीने पोषक भाजीपाला पिकवून अ‍ॅनिमियावर मात करण्याचा प्रयोग विदर्भात यशस्वी झाला आहे. स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन उभारलेला हा ‘अ‍ॅनिमिया’ मुक्तीचा लढा उभारला आहे.भारत जागातील ७६ कुपोषित (उपाशी) देशांच्या सूचीमध्ये ५५ व्या क्रमांकावर आहे. देशात १९६० मध्ये जेव्हा हरित क्रांतीची सुरुवात झाली, तेव्हा केवळ काहीच राज्यात नगदी पिके घेतली जात होती. त्यात कापूस हे मुख्यत: कोरडवाहू जमिनीत घेतल्या जात होते. विदर्भातील ते पारंपरिक पीक होते. मात्र, शेतकरी या पिकासोबतच ज्वारी, भुईमूग, तूर, भाजीपाला व बाजरी यासारखी पारंपरिक पिके घेऊन आपल्या कुटुंबाची पोषक आहाराची गरज पूर्ण करीत होते. मात्र, हरित क्रांतीनंतर शेतकऱ्यांनी या पोषक अन्नपिकांकडे पाठ फिरवून सोयाबीन आणि कापूस या नगदी पिकांना प्राधान्य दिले. त्यामुळे स्वत: शेतकरी आपल्या कुटुंबाच्या अन्नाची गरज भागविण्यासाठी बाजारातून धान्य विकत घेऊ लागला. यामुळे शेतीचा खर्च वाढला, कर्ज वाढले आणि शेतकऱ्यांचा तोटाही वाढला. एवढेच नव्हे, तर शेतकरी कुटुंबाच्या ताटातील पोषक अन्नही गायब झाले. रासायनिक खते व विषारी औषधाचा भडिमार करून पिकविलेले अन्नधान्य बाजारात आले. कुपोषण आणि अ‍ॅनिमिया यांसारख्या समस्या तयार झाल्या.या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी सर्वांत सरळ आणि सोपा उपाय म्हणजे, आहारात बदल करणे. भाजीपाल्याने ‘अ‍ॅनिमिया’ची कमतरता भरून काढता येते. ही गोष्ट लक्षात घेऊन, विदर्भातील तब्बल २० स्वयंसेवी संस्थांमधील महिला आणि किशोरवयीन मुलींनी शाळा व ग्रामीण भागात पोषक आणि सेंद्रीय ‘परसबाग’ विकासाचे काम हाती घेतले आहे. त्या परसबागेतून ग्रामीण भागातील लोकांना पोषक आणि सेंद्रीय भाजीपाला उपलब्ध होऊन ‘अ‍ॅनिमिया’ची समस्या सोडविण्यास मदत होत आहे.