शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
4
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
5
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
6
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
7
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
8
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
9
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
10
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
11
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
12
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
13
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
14
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
15
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
16
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
17
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
19
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
20
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार

अभ्यासक्रमाचा कालबद्ध आढावा आवश्यक - मुख्यमंत्री

By admin | Updated: May 29, 2017 04:39 IST

विद्यापीठात शिकवले जाणारे अभ्यासक्रम आणि उद्योगजगताची आवश्यकता यात समन्वय असणे आवश्यक आहे. राज्य सरकारच्या

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विद्यापीठात शिकवले जाणारे अभ्यासक्रम आणि उद्योगजगताची आवश्यकता यात समन्वय असणे आवश्यक आहे. राज्य सरकारच्या नव्या विद्यापीठ कायद्यामुळे विद्यापीठांना आवश्यकतेनुसार अभ्यासक्रमात कालानुरूप बदल करणे शक्य होणार आहे. विद्यापीठ कायद्यातील सुधारणा आणि अ‍ॅपे्रंटिसशिप कायद्यातील बदलांमुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमात फडणवीस यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमाचा आराखडा, नवीन विद्यापीठ कायद्यातील सुधारणा, अ‍ॅप्रेंटिसशिप कायद्यातील बदलामुळे रोजगाराच्या उपलब्ध संधी आदी विषयांवर भाष्य केले. मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्या शिक्षणपद्धतीत आतापर्यंत पुस्तकी ज्ञानावरच अधिक भर देण्यात आला आहे. सध्याचा बदलता काळ आणि बाजारपेठेमधली सद्य:स्थिती याचा विचार केला असता, आजच्या विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच विविध कंपन्यामध्ये जाऊन प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे, दर दहा वर्षांनी शहराचा विकास आराखडा तयार केला जातो, त्याच धर्तीवर शिक्षणक्षेत्रात होणारे बदल लक्षात घेत, दर पाच वर्षांनी अभ्यासक्रमाचा आढावा घेणे आवश्यक आहे. महाविद्यालयांना स्वायत्तता दिल्यास ती अधिक चांगल्या पद्धतीने विकास करू शकतात. जोपर्यंत विद्यापीठ अभ्यासक्रमामध्ये बदल करीत नाही, तोपर्यंत महाविद्यालयांना किंवा शैक्षणिक संस्थांना बदल करता येत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र, सध्या तरी अभ्यासक्रमाच्या सूत्रात बदल करण्यात येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कलमापन चाचणीमुळे योग्य ते करिअर निवडण्याचा विश्वास विद्यार्थ्यांना मिळणार आहे. अभ्यासाप्रमाणे खेळातही चांगले करिअर होऊ शकते. राज्यात चांगले खेळाडू घडावेत, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कायद्यानुसार शाळांना मैदान असणे अनिवार्य करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कौशल्य विकास हाच आधारकौशल्य विकासाच्या आधारेच रोजगार व स्वयंरोजगाराचे प्रश्न सोडविणे शक्य होणार आहे. अ‍ॅप्रेंटिसशिप कायद्यात बदल केल्याने राज्यात सर्वाधिक अ‍ॅप्रेंटिस आहेत. यापूर्वी या कायद्यामधील काही जाचक अटींमुळे कोणीही अ‍ॅप्रेंटिस ठेवायला तयार नसायचे. पहिल्या वर्षी ६९ हजार, तर गेल्या वर्षी एक लाख अ‍ॅप्रेंटिस होते. उद्योगांशी विविध २४ सामंजस्य करारानुसार, आतापर्यंत आठ लाख तरुणांना विशेष कौशल्य प्रशिक्षण देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शेती आणि शेतीपूरक उद्योगातील प्रशिक्षणासाठी अभ्यासक्रम तयार करण्यात आल्याचेही फडणवीस यांनी या कार्यक्रमादरम्यान विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.