शहरं
Join us  
Trending Stories
1
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
2
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
3
ट्रम्प टॅरिफमुळे GST मध्ये बदल केला का? अर्थमंत्र्यांचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, "गेल्या दीड वर्षांपासून..."
4
उमेश कामत-प्रिया बापटच्या यशस्वी संसाराचं रहस्य काय? म्हणाले, "आम्ही वैयक्तिक स्तरावर..."
5
अल्काराझ-सिनर जोडीसमोर निभाव लागेना! प्रत्येक वेळी दोघांपैकी एक येतोय जोकोच्या आडवा
6
‘सीसीएमपी’ अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना दिलासा, होमिओपॅथी डॉक्टर ‘एमएमसी’मध्ये नोंद करू शकणार
7
Viral Video : पोर्शमध्ये आई तर फॉर्च्युनरमध्ये मुलगा, रस्त्यावर लागली भन्नाट रेस! व्हिडीओ बघून व्हाल थक्क
8
घोड्यांचे रक्त पाजून ब्राझीलच्या फॅक्टरीत दररोज तयार केले जातात कोट्यवधी मच्छर; कारण काय?
9
ते ‘ट्रम्प’ आणि हे ‘पिपाण्या’…एवढाच काय तो फरक; भाजपानं उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक कौतुक करताच पंतप्रधान मोदी यांनीही मानले आभार! म्हणाले...
11
"मोदी आणि मी कायम मित्र राहू..."; अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
12
कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदली, लाल किल्ल्यात मौल्यवान वस्तूवर चोरट्याचा डल्ला, कोट्यवधीमध्ये आहे किंमत   
13
राष्ट्रसंत मोरारी बापू यांना राज्य सरकारकडून अतिथी दर्जा!
14
OBC Reservation: ओबीसी आरक्षण संपविणारा काळा कागद म्हणजे सरकारचा मराठा जीआर!
15
१ लाख रुपयांचे झाले १ कोटी, या स्टॉकनं केलं मालामाल; मोटरसायकल आणि थ्री व्हिलर बनवते कंपनी, तुमच्याकडे आहे का?
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा रद्द, आता एस. जयशंकर करणार UNGA मध्ये भारताचं प्रतिनिधित्व
17
"घाबरू नका, प्रत्येक समस्येचे निराकरण होईल"; CM योगी आदित्यनाथ यांनी नागरिकांना दिला धीर
18
केवळ ₹१५०० पासून सुरू करू शकता गुंतवणूक; तयार होईल ₹५९,०३,२५३ चा फंड, नफा पाहून विश्वासच बसणार नाही
19
"पाठीत खंजीर खुपसणारे..."; विराट कोहली-युवराज मैत्रीबाबत युवीच्या वडिलांचे धक्कादायक विधान
20
आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२५, व्यवसायात लाभ होईल, कुटुंबात सुख- शांती लाभेल, रमणीय ठिकाणी प्रवासाला जा

सत्तेच्या समीकरणांचा वेध

By admin | Updated: February 27, 2017 02:52 IST

रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्याने शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता स्थापन करणार आहे.

आविष्कार देसाई,

अलिबाग - रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्याने शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता स्थापन करणार आहे. सर्व तर्क-वितर्कांना खोटे ठरवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे याच अध्यक्षपदी का विराजमान होतील. तसेच सत्ता उपभोगण्याचा शेकापचे जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे या दोन धुरंदर नेत्यांची पुढील राजकीय गणित काय असू शकतील? याचा हा घेतलेला वेध.राजकारण जरी क्षणाक्षणाला बदलत असले, तरी पक्षाचे नेतृत्व नेहमीच सत्तेचे व्हिजन डोळ््यासमोर ठेवून वाटचाल करीत असतात. ध्येयप्राप्तीसाठी ‘थोडे द्यायचे आणि थोडे घ्यायचे’ या फॉर्म्युल्याची अंमलबजावणी केली जाते. आजच्या राजकारणात सत्ताप्राप्ती हेच अंतिम ध्येय असल्याने राजकारणातील उलट-सुलट युत्या, आघाड्या यांच्या माध्यमातून यशस्वी होताना दिसत आहे.रायगडच्या राजकारणातील शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे हे धुरंदर नेते आहेत. त्यांच्याच व्यूहरचनेतून नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लढल्या गेल्या. दोन्ही पक्षांनी निवडणूकपूर्व युती केली होती. शेकापने या निवडणुकीत सर्वांचाच सफाया करत २३ जागा जिंकल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त १२ जागांवर समाधान मानावे लागले. दोन्ही पक्षांनी सर्वाधिक जागा जिंकून सत्तेच ध्येय प्राप्त केले आहे. गेल्या वर्षीपेक्षा या निवडणुकीत शेकापने चार जागा अधिक जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची ८ जागांनी पिछेहाट झाली. दोघांच्या युतीचा फायदा हा शेकापला झाला, तर राष्ट्रवादी काँग्रेसला तोटा झाल्याचे दिसते. राष्ट्रवादी काँग्रेसची पिछेहाट का झाली याचे आत्मचिंतन तटकरे यांना करावे लागणार आहे. दुसरीकडे शिवसेना-काँग्रेस-भाजपा यांची आघाडी झाली होती. शिवसेनेला १८ तर, काँग्रेस, भाजपाला प्रत्येकी तीन जागा प्राप्त झाल्या. शिवसेनेच्या चार जागा वाढल्या, तर भाजपाच्या दोन, तर काँग्रेसच्या चार जागा कमी झाल्या. आघाडी केल्याचा तोटा काँग्रेसला झाला आणि फायदा मात्र शिवसेना, भाजपाला झाला हे निकालवरून दिसून येते.>आदिती या २०१९ सालापर्यंत रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान राहतील. त्यानंतर २०१९ साली होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना शेकापच्या मदतीने निवडून आणायचे. तसेच लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनाही शेकापच्या ताकदीने लोकसभेत विराजमान करायचे. तर शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपत आल्यावर त्यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर विधान परिषदेत पाठवायचे, असे राजकीय समिकरण रायगडच्या राजकारणात सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून घडेल, असा राजकीय निरीक्षकांचा व्होरा आहे.>सर्व समिकरणे खरी ठरली, तर रायगडच्या राजकारणात शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा कायम राहील. मात्र, विरोधकांसाठी ही धोक्याची घंटा ठरणारी आहे. यासाठी त्यांनी आधीच आपापली राजकीय समिकरणे पडताळून पुढील राजकारणाची वाटचाल केल्यास त्यांना शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस पुढे आव्हान उभे करता येईल.शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिळून ३५ जागा आल्या आहेत. त्यामुळे तेच सत्तेमध्ये बसणार आहेत. सर्व तर्क-वितर्कांना खोटे ठरवत आदिती तटकरे याच अध्यक्षपदी विराजमान होतील, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शेकापचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांना कोकण शिक्षक मतदार संघातून निवडून आणण्यास पुरेपूर मदत केली होती. त्याचप्रमाणे शेकापचे आस्वाद पाटील यांचा जिल्हा परिषद मतदार संघ राखीव झाल्याने त्यांना निवडणूक लढविण्यात अडचण निर्माण झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभुत्व असलेला रोहे तालुक्यातील खारगाव मतदार संघ आस्वाद यांना सोडण्यात आला. त्यांना तेथून प्रचंड मताधिक्याने राष्ट्रवादी काँग्रेसने निवडूनही आणले. हा सर्व समझोता केवळ आदिती तटकरे यांनाच अध्यक्षपदी विराजमान करण्यासाठीच होता, असे आता स्पष्ट होत आहे.