शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेच्या समीकरणांचा वेध

By admin | Updated: February 27, 2017 02:52 IST

रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्याने शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता स्थापन करणार आहे.

आविष्कार देसाई,

अलिबाग - रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्याने शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता स्थापन करणार आहे. सर्व तर्क-वितर्कांना खोटे ठरवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे याच अध्यक्षपदी का विराजमान होतील. तसेच सत्ता उपभोगण्याचा शेकापचे जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे या दोन धुरंदर नेत्यांची पुढील राजकीय गणित काय असू शकतील? याचा हा घेतलेला वेध.राजकारण जरी क्षणाक्षणाला बदलत असले, तरी पक्षाचे नेतृत्व नेहमीच सत्तेचे व्हिजन डोळ््यासमोर ठेवून वाटचाल करीत असतात. ध्येयप्राप्तीसाठी ‘थोडे द्यायचे आणि थोडे घ्यायचे’ या फॉर्म्युल्याची अंमलबजावणी केली जाते. आजच्या राजकारणात सत्ताप्राप्ती हेच अंतिम ध्येय असल्याने राजकारणातील उलट-सुलट युत्या, आघाड्या यांच्या माध्यमातून यशस्वी होताना दिसत आहे.रायगडच्या राजकारणातील शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे हे धुरंदर नेते आहेत. त्यांच्याच व्यूहरचनेतून नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लढल्या गेल्या. दोन्ही पक्षांनी निवडणूकपूर्व युती केली होती. शेकापने या निवडणुकीत सर्वांचाच सफाया करत २३ जागा जिंकल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त १२ जागांवर समाधान मानावे लागले. दोन्ही पक्षांनी सर्वाधिक जागा जिंकून सत्तेच ध्येय प्राप्त केले आहे. गेल्या वर्षीपेक्षा या निवडणुकीत शेकापने चार जागा अधिक जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची ८ जागांनी पिछेहाट झाली. दोघांच्या युतीचा फायदा हा शेकापला झाला, तर राष्ट्रवादी काँग्रेसला तोटा झाल्याचे दिसते. राष्ट्रवादी काँग्रेसची पिछेहाट का झाली याचे आत्मचिंतन तटकरे यांना करावे लागणार आहे. दुसरीकडे शिवसेना-काँग्रेस-भाजपा यांची आघाडी झाली होती. शिवसेनेला १८ तर, काँग्रेस, भाजपाला प्रत्येकी तीन जागा प्राप्त झाल्या. शिवसेनेच्या चार जागा वाढल्या, तर भाजपाच्या दोन, तर काँग्रेसच्या चार जागा कमी झाल्या. आघाडी केल्याचा तोटा काँग्रेसला झाला आणि फायदा मात्र शिवसेना, भाजपाला झाला हे निकालवरून दिसून येते.>आदिती या २०१९ सालापर्यंत रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान राहतील. त्यानंतर २०१९ साली होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना शेकापच्या मदतीने निवडून आणायचे. तसेच लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनाही शेकापच्या ताकदीने लोकसभेत विराजमान करायचे. तर शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपत आल्यावर त्यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर विधान परिषदेत पाठवायचे, असे राजकीय समिकरण रायगडच्या राजकारणात सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून घडेल, असा राजकीय निरीक्षकांचा व्होरा आहे.>सर्व समिकरणे खरी ठरली, तर रायगडच्या राजकारणात शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा कायम राहील. मात्र, विरोधकांसाठी ही धोक्याची घंटा ठरणारी आहे. यासाठी त्यांनी आधीच आपापली राजकीय समिकरणे पडताळून पुढील राजकारणाची वाटचाल केल्यास त्यांना शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस पुढे आव्हान उभे करता येईल.शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिळून ३५ जागा आल्या आहेत. त्यामुळे तेच सत्तेमध्ये बसणार आहेत. सर्व तर्क-वितर्कांना खोटे ठरवत आदिती तटकरे याच अध्यक्षपदी विराजमान होतील, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शेकापचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांना कोकण शिक्षक मतदार संघातून निवडून आणण्यास पुरेपूर मदत केली होती. त्याचप्रमाणे शेकापचे आस्वाद पाटील यांचा जिल्हा परिषद मतदार संघ राखीव झाल्याने त्यांना निवडणूक लढविण्यात अडचण निर्माण झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभुत्व असलेला रोहे तालुक्यातील खारगाव मतदार संघ आस्वाद यांना सोडण्यात आला. त्यांना तेथून प्रचंड मताधिक्याने राष्ट्रवादी काँग्रेसने निवडूनही आणले. हा सर्व समझोता केवळ आदिती तटकरे यांनाच अध्यक्षपदी विराजमान करण्यासाठीच होता, असे आता स्पष्ट होत आहे.