शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

गर्भपाताचा टक्का वाढतोय, प्रसूतिदरम्यान असणा-या धोक्यामुळे गर्भपाताची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 01:30 IST

पुणे : मातेच्या जिवाला अथवा आरोग्याला असणारा गंभीर धोका, अर्भकातील व्यंग अशा विविध कारणांमुळे गर्भपाताच्या आकड्यात वाढ होत असून, गेल्या पाच वर्षांत हा टक्का १५ वरून ३०वर पोहोचला असल्याची माहिती समोर आली आहे.

विशाल शिर्केपुणे : मातेच्या जिवाला अथवा आरोग्याला असणारा गंभीर धोका, अर्भकातील व्यंग अशा विविध कारणांमुळे गर्भपाताच्या आकड्यात वाढ होत असून, गेल्या पाच वर्षांत हा टक्का १५ वरून ३०वर पोहोचला असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी (२०१६-१७) शहरात सरकारी रुग्णालयांत २६ हजार ४०२, तर खासगी रुग्णालयात २४ हजार २९८ अशा ५० हजार ७०० प्रसूती झाल्या होत्या. याच काळात १८ हजार ६०५ गर्भपाताची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे झाली आहे. यातील १२ हजार ९३४ गर्भपात हे गर्भ नको असल्यामुळे झाले आहेत. मातेच्या जीवितीला अथवा आरोग्याला असलेला धोका, जन्माला आल्यानंतर मुलामध्ये असलेला संभाव्य धोका, बलात्कारामुळे गर्भधारणा झाल्यास गर्भपाताची वेळ आली आहे. शहरात होणाºया एकूण गर्भपाताच्या आकड्याशी तुलना केल्यास हा टक्का तब्बल ३० टक्के इतका भरतो.शहरात २०१३-१४ मध्ये १८ हजार ३७४ गर्भपाताच्या घटना घडल्या होत्या. त्यापैकी १५ हजार ७८३ गर्भपात गर्भ नको असल्याने झाले होते, तर २५९१ गर्भपात अर्भकातील व्यंग, मातेच्या जिवाला अथवा आरोग्याला असणारा धोका यामुळे झालेले होते. म्हणजेच अवघ्या चार वर्षांत धोक्यातील हे प्रमाण दुप्पट झाल्याचे दिसून येत आहे.शहरात १६० गर्भपात केंद्रांना १२ आठवड्यापर्यंत, तर १८३ केंद्रांना २० आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्याची परवानगी आहे. एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ दरम्यान बारा आठवड्यांपर्यंतचे १७ हजार ९५८, तर २० आठवड्यापर्यंतचे ६४७ गर्भपात करण्यात आले आहेत, माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर खान यांनी ही आकडेवारी समोर आणली आहे.याबाबत माहिती देताना प्रसूतिरोगतज्ज्ञ वैजयंती पटवर्धन म्हणाल्या, गर्भाचे ठोके पाचव्या आठवड्यात समजू शकतात. मात्र, गर्भाचे सर्व अवयव विकसित व्हायला १६ ते १७ आठवड्यांचा कालावधी लागतो. गर्भाच्या मेंदूचा विकास झाला नसेल, अर्भकाला व्यंगत्व असेल, मेंदूत पाणी असेल अशा गंभीर स्थितीत गर्भपाताचा सल्ला दिला जातो. जिवाला धोका असल्यासही गर्भपात करण्यास सांगितले जाते. हा टक्का साधारण २०च्या आसपास असेल. गर्भ नको असल्याने गर्भपात करणाºयांची संख्या अधिक आहे. गर्भपाताच्या संख्येला अनेक सामाजिक बाजूदेखील आहेत.।‘पीसीपीएनडीटी’च्याचार वर्षांत ४ तक्रारीगर्भलिंगनिदान कायद्यानुसार (पीसीपीएनडीटी) महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे २०१४ ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत १८००२३३६०९९ या टोल फ्री क्रमांकावर अवघ्या ४ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यातील दोन तक्रारी या २०१४मधील आहेत. पीसीएनडीटी कायद्यानुसार २०१३ नंतर एकाही गर्भनिदान केंद्राचा परवाना रद्द करण्यात आलेला नाही.।गर्भपाताची कारणे २०१३-१४ २०१४-१५ २०१५-१६ २०१६-१७ एप्रिल ते आॅगस्ट २०१७मातेला जीवघेणा धोका ९३२ १७७७ १८२३ २५९६ ६९०मानसिक आरोग्याला धोका १००० ९५७ ५६१ १६३४ ४०२जीवितास धोका २४१ ५६० ६२३ १९१ ११८बाळाच्या जीवितास धोका ३९४ ४२० ५८९ १२१० १६९

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिला