शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

गर्भपाताचा टक्का वाढतोय, प्रसूतिदरम्यान असणा-या धोक्यामुळे गर्भपाताची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 01:30 IST

पुणे : मातेच्या जिवाला अथवा आरोग्याला असणारा गंभीर धोका, अर्भकातील व्यंग अशा विविध कारणांमुळे गर्भपाताच्या आकड्यात वाढ होत असून, गेल्या पाच वर्षांत हा टक्का १५ वरून ३०वर पोहोचला असल्याची माहिती समोर आली आहे.

विशाल शिर्केपुणे : मातेच्या जिवाला अथवा आरोग्याला असणारा गंभीर धोका, अर्भकातील व्यंग अशा विविध कारणांमुळे गर्भपाताच्या आकड्यात वाढ होत असून, गेल्या पाच वर्षांत हा टक्का १५ वरून ३०वर पोहोचला असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी (२०१६-१७) शहरात सरकारी रुग्णालयांत २६ हजार ४०२, तर खासगी रुग्णालयात २४ हजार २९८ अशा ५० हजार ७०० प्रसूती झाल्या होत्या. याच काळात १८ हजार ६०५ गर्भपाताची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे झाली आहे. यातील १२ हजार ९३४ गर्भपात हे गर्भ नको असल्यामुळे झाले आहेत. मातेच्या जीवितीला अथवा आरोग्याला असलेला धोका, जन्माला आल्यानंतर मुलामध्ये असलेला संभाव्य धोका, बलात्कारामुळे गर्भधारणा झाल्यास गर्भपाताची वेळ आली आहे. शहरात होणाºया एकूण गर्भपाताच्या आकड्याशी तुलना केल्यास हा टक्का तब्बल ३० टक्के इतका भरतो.शहरात २०१३-१४ मध्ये १८ हजार ३७४ गर्भपाताच्या घटना घडल्या होत्या. त्यापैकी १५ हजार ७८३ गर्भपात गर्भ नको असल्याने झाले होते, तर २५९१ गर्भपात अर्भकातील व्यंग, मातेच्या जिवाला अथवा आरोग्याला असणारा धोका यामुळे झालेले होते. म्हणजेच अवघ्या चार वर्षांत धोक्यातील हे प्रमाण दुप्पट झाल्याचे दिसून येत आहे.शहरात १६० गर्भपात केंद्रांना १२ आठवड्यापर्यंत, तर १८३ केंद्रांना २० आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्याची परवानगी आहे. एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ दरम्यान बारा आठवड्यांपर्यंतचे १७ हजार ९५८, तर २० आठवड्यापर्यंतचे ६४७ गर्भपात करण्यात आले आहेत, माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर खान यांनी ही आकडेवारी समोर आणली आहे.याबाबत माहिती देताना प्रसूतिरोगतज्ज्ञ वैजयंती पटवर्धन म्हणाल्या, गर्भाचे ठोके पाचव्या आठवड्यात समजू शकतात. मात्र, गर्भाचे सर्व अवयव विकसित व्हायला १६ ते १७ आठवड्यांचा कालावधी लागतो. गर्भाच्या मेंदूचा विकास झाला नसेल, अर्भकाला व्यंगत्व असेल, मेंदूत पाणी असेल अशा गंभीर स्थितीत गर्भपाताचा सल्ला दिला जातो. जिवाला धोका असल्यासही गर्भपात करण्यास सांगितले जाते. हा टक्का साधारण २०च्या आसपास असेल. गर्भ नको असल्याने गर्भपात करणाºयांची संख्या अधिक आहे. गर्भपाताच्या संख्येला अनेक सामाजिक बाजूदेखील आहेत.।‘पीसीपीएनडीटी’च्याचार वर्षांत ४ तक्रारीगर्भलिंगनिदान कायद्यानुसार (पीसीपीएनडीटी) महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे २०१४ ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत १८००२३३६०९९ या टोल फ्री क्रमांकावर अवघ्या ४ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यातील दोन तक्रारी या २०१४मधील आहेत. पीसीएनडीटी कायद्यानुसार २०१३ नंतर एकाही गर्भनिदान केंद्राचा परवाना रद्द करण्यात आलेला नाही.।गर्भपाताची कारणे २०१३-१४ २०१४-१५ २०१५-१६ २०१६-१७ एप्रिल ते आॅगस्ट २०१७मातेला जीवघेणा धोका ९३२ १७७७ १८२३ २५९६ ६९०मानसिक आरोग्याला धोका १००० ९५७ ५६१ १६३४ ४०२जीवितास धोका २४१ ५६० ६२३ १९१ ११८बाळाच्या जीवितास धोका ३९४ ४२० ५८९ १२१० १६९

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिला