शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

टक्का वाढला ; धक्का कुणाला ?

By admin | Updated: October 16, 2014 00:59 IST

नागपूर जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांसाठी जिल्ह्यात सरासरी ६१ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान काटोलमध्ये (७१ टक्के) तर सर्वात कमी पश्चिम, दक्षिण आणि मध्य मध्ये (५७ टक्के) मतदान झाले.

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांसाठी जिल्ह्यात सरासरी ६१ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान काटोलमध्ये (७१ टक्के) तर सर्वात कमी पश्चिम, दक्षिण आणि मध्य मध्ये (५७ टक्के) मतदान झाले. जिल्ह्यातील ३७०५३६५ मतदारांपैकी २२४३१८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २००९ च्या निवडणुकीच्या तुलनेत (५५.८१ टक्के) ५.१९ टक्के मतदानात वाढ झाली आहे. किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. सर्वच प्रमुख पक्षातील दिग्गज उमेदवारांसह एकूण २११ जणांचे भाग्य मतदान यंत्रात (ईव्हीएम) बंद झाले असून रविवारी १२ विविध ठिकाणी मतमोजणी होणार आहे.पावसाचा व्यत्ययसकाळी मतदानाच्या पहिल्या सत्रात पवासाने हजेरी लावल्याने सर्वच ठिकाणी तारांबळ उडाली. केंद्रावर मतदारांची, बुथवर कार्यकर्त्यांची धावपळ उडाली. मतदान संथ झाले.पण दुपारनंतर गर्दी वाढल्याने अधिकाऱ्यांचा ताण वाढला. पाऊस आल्यावरही अनेकांनी छत्री घेऊन मतदान केंद्र गाठले.सर्वत्र अफवांचे पीकशहरात आज सकाळपासूनच अफवांचे पीक आले. कुठे गोळीबार, कुठे लाठीमार तर कुठे तोडफोड झाल्याची अफवा होती. कुठे पैसे वाटले जात असल्याची तर कुठे दारू मिळत असल्याचीही चर्चा होती. काही ठिकाणी प्रमूख उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीच्या घटना घडल्या. मात्र, पोलिसांकडे अनेक घटनांची नोंद नाही. हेल्पलाईनवर तक्रारींचा पाऊसप्रशासनाने मतदारांच्या समस्या निराकरणासाठी सुरू केलेल्या हेल्पलाईनवरून दिवसभर तक्रारींचा पाऊस पडत राहिला. बहुतेक मतदारांची तक्रार मतदार यादीत नाव नसल्याची होती. हेल्पलाईनवरील कर्मचारी संगणकीय प्रोग्रॅममधून तक्रारकर्त्याचे नाव, अनुक्रमांक, मतदान केंद्र इत्यादी माहिती शोधून देत होते. मतदान केंद्रात अनुचित प्रकार सुरू आहे, ईव्हीएम मशीन बंद पडली आहे, सुरक्षा व्यवस्था तोकडी आहे इत्यादी प्रकारच्या कोणत्याही तक्रारी आल्या नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.दिग्गजांच्या भाग्याचा फैसला रविवारीजिल्ह्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणीस (दक्षिण पश्चिम), काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत (उत्तर नागपूर), सतीश चतुर्वेदी (दक्षिण नागपूर), अनिस अहमद (मध्य नागपूर), सुबोध मोहिते (रामटेक), राजेंद्र मुळक (कामठी), राष्ट्रवादीचे अनिल देशमुख (काटोल), रमेश बंग ( हिंंगणा) रिंगणात आहेत. त्यांचे राजकीय भवितव्य सध्या ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. त्यांच्या राजकीय भाग्याचा फैसला रविवारी होणाऱ्या मतदानाच्या वेळी होणार आहे.मतदान केंद्राधिकाऱ्याला मारहाणपक्षपातीपणाचा आरोप लावून मनसेच्या उमेदवाराने मतदान केंद्रावरील एका अधिकाऱ्याच्या श्रीमुखात भडकावली. या घटनेमुळे झिंगाबाई टाकळी (गिट्टीखदान) परिसरातील एका मतदान केंद्रावर काही काळ तणाव होता. सकाळच्या पावसाच्या व्यत्ययानंतर मतदानाने गती घेतली. शहरातील सहा आणि ग्रामीणमधील सहा अशा एकूण बाराही मतदारसंघात मतदानासाठी उत्साह दिसून आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, खासदार अजय संचेती, काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांच्यासह विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांच्यासह इतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. सांयकाळपर्यंत जिल्ह्यात ६१ टक्के मतदान झाल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले. (प्रतिनिधी)