शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

जनताच मुश्रीफांना राजकारणातून हद्दपार करेल

By admin | Updated: October 20, 2015 00:51 IST

‘ताराराणी’चा पलटवार : तुम्ही जिल्हा बँक बुडवली त्याचे काय..?

कोल्हापूर : ‘महाडिक शहाणे की, कोल्हापूरकर मूर्ख’ असा प्रश्न आमदार हसन मुश्रीफ यांनी उपस्थित करून जनतेचा आणि लोकशाहीचा अवमान केला आहे. कोल्हापूरची जनता मुश्रीफांच्या दावणीला बांधलेली नाही, याचे भान ठेवावे; अन्यथा जनता तुम्हाला राजकीय जीवनातून हद्दपार करेल, असा प्रतिटोला ताराराणी आघाडीचे प्रवक्ते माजी महापौर सुनील कदम यांनी सोमवारी प्रसिद्धीपत्रकातून लगावला. आगामी महापालिका निवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीला बहुमत देऊन जनता शहाणी आहे, याचा प्रत्यय मुश्रीफांना येईल, असेही त्यांनी म्हटले आहे. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महापालिका निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना दसरा चौकात झालेल्या सभेत आमदार मुश्रीफ यांनी एकाच घरात तीन वेगवेगळ््या पक्षांतून निवडून आलेल्या महाडिक यांच्यावर ‘महाडिक शहाणे की कोल्हापूरकर मूर्ख’ अशी उपरोधिक टीका केली होती. मुश्रीफांनी केलेली ही टीका ‘ताराराणी’ला चांगलीच झोंबली. त्यामुळे तिचा खरपूस समाचार घेताना कदम यांनी पत्रकात म्हटले आहे की, ज्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँक बुडवली, उद्योजकांना हैराण केले, त्यांनी महापालिकेत काय दिवे लावले हे सर्वांना माहीत आहे. दहा वर्षांत महापालिकेतील भोंगळ कारभारामुळेच कोल्हापूरचा स्मार्ट सिटीत समावेश होऊ शकला नाही. त्यांनी जनतेला भूलवण्याचे काम बंद करावे. महाडिक कुटुंबातील तिघांना जनतेने विश्वासाने निवडून दिले आहे. जनता दूधखुळी नसते तर सुज्ञ असते, याचे भान लोकप्रतिनिधींनी ठेवावे. भाजप-ताराराणी महायुतीकडे विकासाची दृष्टी आहे. येत्या निवडणुकीत महायुतीला कौल देऊन जनता आपले शहाणपण सिद्ध करेल. पक्षीय पातळीवर निवडणूक होत आहे. असे असताना माजी मंत्र्यांना केवळ भाजप-ताराराणी आघाडीवर बोलावेसे वाटत आहे. याचा अर्थ त्यांनी आघाडीचा धसका घेतल्याचे स्पष्ट होते. ते वैफल्यातून अशी विधाने करत आहेत. नियोजनबद्ध विकास आराखडा घेऊन आघाडी निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यामुळे जनता पाच वर्षांसाठी महापालिकेची एकहाती सत्ता भाजप-ताराराणी महायुतीकडे देईल, यात शंका नाही.जनतेने खासदार केले...कोणतीही सत्ता नसताना केलेले काम डोळ्यांसमोर ठेवून जनतेने धनंजय महाडिक यांना खासदार केले. खासदार महाडिक हे जनतेचा विश्वास सार्थ ठरवत, प्रामाणिकपणे काम करत आहेत. आमदार महादेवराव महाडिक, आमदार अमल महाडिक यांनी जनतेशी प्रतारणा केली नाही, म्हणून त्यांना विजय संपादन करता आला, असेही सुनील कदम यांनी पत्रकात म्हटले आहे.