शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जनतेने चीनवर सर्जिकल स्ट्राईक करावा

By admin | Updated: November 13, 2016 21:59 IST

दहशतवादी तळांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर जगाची भारताकडे पाहण्याची नजर बदलली आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 13 - दहशतवादी तळांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर जगाची भारताकडे पाहण्याची नजर बदलली आहे. चीन वगळता जगातील सर्व देशांनी भारताला पाठिंबा दिला आहे. चीनला धडा शिकविण्यासाठी आपल्याला मिसाईल किंवा इतर शस्त्रांची आवश्यकता नाही. स्वदेशी वस्तूंचा जास्तीत जास्त वापर करुन जनतेनेच चीनच्या अर्थव्यवस्थेला फटका देणारा सर्जिकल स्ट्राईक करावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीची सदस्य व मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे राष्ट्रीय संरक्षक इंद्रेशकुमार यांनी व्यक्त केले. मैत्री परिवार संस्थेतर्फे रविवारी हेमंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  देशाच्या वर्तमान बौद्धिक व युद्धजन्य स्थितीसमोरील आव्हाने व समाधान या विषयावर ते बोलत होते. गेल्या ७० वर्षांपासून पाकिस्तानला समजविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून कुरापती वाढल्या होत्या. सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तानला झटका बसला आहे. मात्र चीनने पाकिस्तानचे समर्थन केले आहे. त्यामुळे चीनलादेखील धक्का देण्याची आवश्यकता आहे. दिवाळीच्या निमित्ताने अनेकांनी चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकला. हे प्रमाण व्यापक स्वरुपात व्हायला हवे. प्रत्येक धर्म, पंथाने यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे इंद्रेशकुमार म्हणाले.देशातील भ्रष्टाचार व काळा पैसा यांच्यावर आळा आणण्यासाठी केंद्र शासनाने ह्यनोटह्णबंदी केली आहे. यानंतर अनेक जणांकडून निरनिराळ्या अफवा पसरविल्या जात आहेत. मात्र हा निर्णय देशहितासाठी होता व अशा अफवा किंवा उद्भविलेल्या परिस्थितीमुळे घाबरण्याची आवश्यकता नाही. उलट जनतेने थोडा संयम दाखवून भ्रष्टाचाऱ्यांवर अंकुश आणण्याच्या प्रयत्नांना सहकार्य केले पाहिजे, असे इंद्रेशकुमार म्हणाले.