शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

माणसाला सुसंगतीची गरज

By admin | Updated: September 18, 2014 00:47 IST

गुन्ह्यांच्या वाढलेल्या घटना या कुसंगतीचा परिणाम आहे. माणूस जशा वातावरणात वावरतो, तसा तो घडतो. तुमची संगत जर वाईटांशी असेल, तर तुमच्या स्वभावात, कृतीत, व्यवहारात त्याचा परिणाम होतो.

मुनीश्री सुवीरसागर महाराज यांचे विचारनागपूर : गुन्ह्यांच्या वाढलेल्या घटना या कुसंगतीचा परिणाम आहे. माणूस जशा वातावरणात वावरतो, तसा तो घडतो. तुमची संगत जर वाईटांशी असेल, तर तुमच्या स्वभावात, कृतीत, व्यवहारात त्याचा परिणाम होतो. त्यामुळे आपले कुटुंब, समाज आणि हे राष्ट्र सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाने चांगली संगत करावी. आज समाजात जी परिस्थिती आहे, ती लक्षात घेता, प्रत्येकाला सुसंगतीची गरज आहे, असे उद्बोधन मुनीश्री सुवीरसागर महाराज यांनी चिटणीस पार्क येथे सुरू असलेल्या प्रवचनमालेत केले. प्रवचनमालेत ‘सद्संगती से सदगती’ या विषयावर त्यांनी श्रावकांना उद्बोधित केले. श्री सैतवाळ जैन संघटन मंडळातर्फे मुनीश्री सुवीरसागरजी महाराज यांच्या प्रवचनमालेला सुरुवात झाली आहे. या प्रवचनमालेत दुसरे पुष्प त्यांनी गुंफले. यात त्यांनी सुसंगतीवर आपले विचार मांडले. ते म्हणाले की, मनुष्य चुकीच्या संगतीत असेल तर तो राक्षस बनतो. मात्र चांगली संगत त्याला देवरूप प्राप्त करून देऊ शकते. जगण्यातील साधेपणामुळे विचारात पवित्रता येते. साध्या वागण्यातून अधिक सुखाची प्राप्ती होते. आजचे युग आकर्षित करणारे आहे, जरा काही वेगळे दिसले, त्याच्या मोहात पडतो आहे. त्याचा परिणाम महिलांच्या पेहराव्यावर झाला आहे. पेहराव्यामुळे महिलांकडे वाईट नजरेने बघितले जाते. मात्र यात आपली मुलगी, घरची कुणीतरी स्त्री असेल, याचा विचार केला जात नाही. तरीही घरातूनच स्त्रियांना साध्या पेहराव्यासाठी आग्रह होणे गरजेचे आहे. बालपणी चांगले संस्कार झाल्यास, त्याचे चरित्र चांगले बनते, असे मुनीश्री म्हणाले. त्यांनी सेवा परम कर्तव्य यावरही उद्बोधन केले. मोठ्या संख्येने श्रावकांनी प्रवचनाचा लाभ घेतला. प्रवचनाला प्रमुख अतिथी म्हणून आ. दीनानाथ पडोळे, पोलीस उपायुक्त अरुण जगताप, नगरसेवक बंडू राऊत, कुलभूषण डहाळे, सुनील जैन, हिराचंद मिश्रीकोटकर, संतोष जैन, डॉ. विनय रोडे, कमलकांत गोंदवाले, कुणाल गडेकर, नीरज पळसापुरे, अमोल बंड, महावीर मिश्रीकोटकर, विजय सोईतकर आदी उपस्थित होते.